शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
4
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
5
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
6
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
7
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
8
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
9
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
10
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
11
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
12
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
13
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
14
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
15
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
16
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
17
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
18
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
19
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
20
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 

‘स्टिंग’ने प्रशासनासह नागरिकही झाले जागृत

By admin | Updated: June 22, 2016 01:36 IST

नळाद्वारे लाखो लोकांच्या घरी पोहोचणाऱ्या पाण्याची शुद्धता कायम राहावी आणि कोणताही घातपात होऊ नये यासाठी संबंधित प्रशासनाला जागे करण्याचा उद्देश...

गोंदिया : नळाद्वारे लाखो लोकांच्या घरी पोहोचणाऱ्या पाण्याची शुद्धता कायम राहावी आणि कोणताही घातपात होऊ नये यासाठी संबंधित प्रशासनाला जागे करण्याचा उद्देश ‘लोकमत’च्या स्टिंग आॅपरेशनने साध्य केला. सोमवारी केलेल्या स्टिंगचे वृत्त मंगळवारच्या लोकमतमध्ये प्रकाशित होताच महाराष्ट्र जीवन प्राधीकरण आणि ग्रामीण पाणी पुरवठा विभागात एकच खळबळ उडाली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने शहानिशा करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार गोंदिया शहरासह अनेक ठिकाणच्या टाक्यांची तपासणी करण्यात आली. त्यात ‘लोकमत’चे वृत्त तंतोतंत खरे असल्याचे लक्षात आल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांना चांगलाच धक्का बसला. महाराष्ट्र जीवन प्राधीकरणच्या सिव्हील लाईन व भीमनगर या दोन्ही नवीन टाक्यांवरची झाकणं गायब होती. रामनगर टाकीवरचे झाकण मात्र शाबूत होते. इतर जुन्या टाक्यांचीही तपासणी केली जात आहे.बहुतांश टाक्यांच्या कडक सुरक्षेसाठी कोणत्याही विभागाकडे कोणतीही तरतूद नाही. रात्रीच्या वेळी ८-९ वाजेपर्यंत वॉचमन असतो. त्यानंतर खाली कंपाऊंडच्या फाटकाला कुलूप लावून तो निघून जातो. विशेष म्हणजे जीवन प्राधीकरणकडे पूर्वीसारखे या विभागाचे सुरक्षा गार्डही आता नाहीत. आधीचे सुरक्षा गार्ड निवृत्त झाल्यानंतर त्यांच्याजागी कंत्राटी गार्ड नियुक्त केले परंतू ते सुद्धा कमी आहेत. त्यामुळे मंगळवारी पोलिसांना पत्र देऊन रात्रीच्या गस्तीदरम्यान पाण्याच्या टाकीच्या परिसरात कोणी जाणार नाही यासाठी लक्ष ठेवण्याची विनंती जीवन प्राधीकरणकडून करण्यात आल्याचे या विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. एवढेच नाही तर टाकीच्या परिसरात जाण्यास सक्त मनाई असल्याचा फलक लावण्यात येत असल्याचेही सांगण्यात आले.विशेष म्हणजे लोकमतचा वृत्तांत मंगळवारच्या अंकात वाचल्यानंतर ग्रामीण भागातील नागरिकही जागृत झाले. अनेक लोकांनी आपल्या भागातील टाक्यांवर चढून तिथे झाकणं आहेत किंवा नाही याची शहानिशा केली. दुर्दैवाने बऱ्याच टाक्यांच्या बाबतीत सारखीच परिस्थिती दिसून आल्यामुळे नागरिकांनी लोकमतकडे त्या टाक्यांचे फोटो पाठविले. संबंधित ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना व ग्रामविकास अधिकाऱ्यांना काही नागरिकांनी यासंदर्भात जाब विचारला. त्यांनी तातडीने कार्यवाही करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना विचारणा केली.दरम्यान जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने काय कारवाई केली यासाठी कार्यकारी अभियंता शिवकुमार शर्मा यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. (जिल्हा प्रतिनिधी)अर्जुनीतील जलकुंभ सताड उघडे खातिया : ग्राम अर्जुनी येथे जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या वतीने नळ पाणी पुरवठा योजनेसाठी सन २०१३-१४ मध्ये ६५ हजार लिटर क्षमतेचे जलकुंभ तयार करण्यात आले, पण त्या जलकुंभावर अद्याप झाकन लावण्यात आले नसल्याची बाब काही जागरूक नागरिकांनी मंगळवारी निदर्शनास आणून दिली. लोकमतमधील स्टिंग आॅपरेशनची बातमी वाचल्यानंतर अर्जुनी येथील सामाजिक कार्यकर्ता नरेंद्र गजभिये यांनी त्वरीत सकाळी पाणी टाकीवर जाऊन पाहणी केली. टाकीवर झाकन नसल्याचे त्यांना आढळले. त्यांनी त्वरित ही बाब ‘लोकमत’ला सांगितली. तसेच ग्राम पंचायतला या संदर्भात लेखी निवेदन देऊन कोणतीही अप्रिय घटना टाळण्यासाठी त्वरीत टाकीचे झाकन बनविण्याची मागणी केली.(वार्ताहर)कंत्राटदाराची चूक की झाकणांची चोरी?जीवन प्राधिकरणमार्फत संचालित गोंदिया शहरातील पाणी पुरवठा योजनेच्या सिव्हील लाईन आणि भीमनगर येथील टाक्या दोनच वर्षापूर्वी कार्यान्वित झाल्या आहेत. या नवीन टाक्यांवर वजनदार अशी लोखंडी झाकणे होती. ती गायब कशी आणि केव्हा झाली, असा प्रश्न मंगळवारी जीवन प्राधीकरणच्या अधिकाऱ्यांना पडला. कदाचित ही संबंधित कंत्राटदाराची चूक असावी किंवा ती झाकणं भुरट्या चोरट्यांनी पळविली असावी, अशी शंका त्यांनी व्यक्त केली. दोनपैकी कोणतीही शक्यता असली तरी ती गंभीरच आहे. त्यामुळे तातडीने नवीन झाकणं तयार करण्यासाठीची प्रक्रिया सुरू करण्यास सांगितले असल्याची माहिती, उपविभागीय अभियंता आर.एस. मडके यांनी ‘लोकमत’ला दिली.