शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
2
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
3
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
6
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
7
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
8
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
9
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
10
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
11
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
12
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
13
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
14
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
15
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
16
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
17
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
18
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
19
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
20
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?

रामपूरच्या शाळेला अजूनही कुलूप

By admin | Updated: March 18, 2017 01:54 IST

जोपर्यंत गावकऱ्यांची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत शाळेचे कुलूप उघडणार नाही,

आंदोलन चिघळले : गटशिक्षणाधिकारी म्हणतात, टीसी देवून टाका ! साखरीटोला : जोपर्यंत गावकऱ्यांची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत शाळेचे कुलूप उघडणार नाही, असा ठाम निर्णय रामपूर येथील शाळा समितीच्या पदाधिकारी व गावकऱ्यांनी घेतला आहे. दरम्यान आमगावचे गटशिक्षणाधिकारी के.वाय. सर्याम यांनी भ्रमणध्वनीवरुन विद्यार्थ्यांना टी.सी. देवून टाका, असा अफलातून आदेश मुख्याध्यापकाला दिल्याने हे आंदोलन अधिक चिघळले आहे. आमगाव पं.स. अंतर्गत रामपूर (पानगाव) येथील जि.प. वरिष्ठ प्राथमिक शाळेला शिक्षकाची बदली न करण्याच्या मागणीकरिता १६ मार्चला सकाळी १०.३० वाजता गावकऱ्यांनी कुलूप ठोको आंदोलन केले. शिक्षण विभागाला याबाबतीत माहिती देऊनही एकही अधिकारी तिकडे फिरकला नव्हता. यासंबंधी ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच १७ मार्चला गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार शिक्षण विस्तार अधिकारी सी.बी. पचारे यांनी शाळेला भेट देवून परिस्थिती जाणून घेतली. त्यावेळी क्षेत्राचे जि.प. सदस्य जियालाल पंधरे उपस्थित होते. यावेळी गावकऱ्यांनी शाळेतील शिक्षक हेमने यांची बदली करु नये, तसेच नेहमी गैरहजर राहणाऱ्या शिक्षकाला हटविण्यात यावे व वर्गसंख्येनुसार शिक्षक नियुक्त करावे, अशी मागणी केली. त्यावर पचारे यांनी मी निर्णय देवू शकत नाही, अहवाल पाठविला जाईल, अशी भूमिका घेतल्याने गावकऱ्यांनी गटशिक्षणाधिकारी यांना बोलवा व लेखी आश्वासन द्या, अशी मागणी केली. जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असा ठाम निर्णय घेतला व मागणी पूर्ण न झाल्यास सर्व पालक टी.सी. काढून घेतील, असा निर्णय घेतला. यावर जि.प. सदस्य जियालाल पंधरे यांनी गटशिक्षणाधिकारी सर्याम यांना भ्रमणध्वनीवर ही बाब सांगितली. त्यावर सर्याम यांनी त्यांच्या टी.सी. देवून टाका, असे उलट उत्तर देवून मुख्याध्यापक बिरणवार यांना लगेच भ्रमणध्वनीवरुन विद्यार्थ्यांच्या टीसी देवून द्या, असा तोंडी आदेश दिल्याने पालक वर्ग अधिकच चिडला व आंदोलन सुरुच ठेवण्याची भूमिका घेतली. संबंधित अधिकाऱ्यांच्या अशा वागण्याची व जनप्रतिनिधीचा मान न ठेवणाऱ्या अधिकाऱ्याची तक्रार जि.प. सदस्य पंधरे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडे केली. या आंदोलनात विद्यार्थी शाळेच्या बाहेर आमगाव-देवरी मुख्य मार्गाला लागून असलेल्या ठिकाणी ज्ञानाचे धडे घेत आहेत. सदर मार्गावर नेहमी वाहने चालत असतात. अशावेळी विद्यार्थ्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे, यासाठी शिक्षण विभागाचे अधिकारी जबाबदार आहेत, असा आरोप गावकरी करीत आहेत.