शहरं
Join us  
Trending Stories
1
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
2
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
3
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
4
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
5
"PM मोदींकडून अपेक्षा होती पण त्यांनी..."; पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शुभमच्या पत्नीने व्यक्त केली नाराजी
6
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
7
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
8
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
9
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
10
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
11
World Lipstick Day : हे ऐकाच! ओठ एकदम भारी दिसतील पण नंतर वांदे होतील; 'अशी' करा योग्य लिपस्टिकची निवड
12
Surya Grahan 2025: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!
13
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग
14
दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...
15
Aditya Infotech IPO: इश्यू उघडताच GMP मध्ये तुफान तेजी; गुंतवणुकदारांना मिळू शकतो जबरदस्त नफा
16
महाराष्ट्रासाठी काँग्रेसने रणनीती आखली; रमेश चेन्नीथेला आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर मोठी जबाबदारी
17
"हा माझा नवरा"; इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर हायव्होल्टेज ड्रामा; मृतदेहासाठी २ बायका भिडल्या, अखेर...
18
NSDL IPO: ८०० रुपये प्राईज बँड, १२७ रुपये GMP; LIC नं केली गुंतवणूक, तुमचा विचार काय?
19
सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण
20
रश्मिका मंदानाची कॉपी? छत्रपती संभाजीनगरची लेक, विजय देवरकोंडासोबत करणार रोमान्स

रामपूरच्या शाळेला अजूनही कुलूप

By admin | Updated: March 18, 2017 01:54 IST

जोपर्यंत गावकऱ्यांची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत शाळेचे कुलूप उघडणार नाही,

आंदोलन चिघळले : गटशिक्षणाधिकारी म्हणतात, टीसी देवून टाका ! साखरीटोला : जोपर्यंत गावकऱ्यांची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत शाळेचे कुलूप उघडणार नाही, असा ठाम निर्णय रामपूर येथील शाळा समितीच्या पदाधिकारी व गावकऱ्यांनी घेतला आहे. दरम्यान आमगावचे गटशिक्षणाधिकारी के.वाय. सर्याम यांनी भ्रमणध्वनीवरुन विद्यार्थ्यांना टी.सी. देवून टाका, असा अफलातून आदेश मुख्याध्यापकाला दिल्याने हे आंदोलन अधिक चिघळले आहे. आमगाव पं.स. अंतर्गत रामपूर (पानगाव) येथील जि.प. वरिष्ठ प्राथमिक शाळेला शिक्षकाची बदली न करण्याच्या मागणीकरिता १६ मार्चला सकाळी १०.३० वाजता गावकऱ्यांनी कुलूप ठोको आंदोलन केले. शिक्षण विभागाला याबाबतीत माहिती देऊनही एकही अधिकारी तिकडे फिरकला नव्हता. यासंबंधी ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच १७ मार्चला गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार शिक्षण विस्तार अधिकारी सी.बी. पचारे यांनी शाळेला भेट देवून परिस्थिती जाणून घेतली. त्यावेळी क्षेत्राचे जि.प. सदस्य जियालाल पंधरे उपस्थित होते. यावेळी गावकऱ्यांनी शाळेतील शिक्षक हेमने यांची बदली करु नये, तसेच नेहमी गैरहजर राहणाऱ्या शिक्षकाला हटविण्यात यावे व वर्गसंख्येनुसार शिक्षक नियुक्त करावे, अशी मागणी केली. त्यावर पचारे यांनी मी निर्णय देवू शकत नाही, अहवाल पाठविला जाईल, अशी भूमिका घेतल्याने गावकऱ्यांनी गटशिक्षणाधिकारी यांना बोलवा व लेखी आश्वासन द्या, अशी मागणी केली. जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असा ठाम निर्णय घेतला व मागणी पूर्ण न झाल्यास सर्व पालक टी.सी. काढून घेतील, असा निर्णय घेतला. यावर जि.प. सदस्य जियालाल पंधरे यांनी गटशिक्षणाधिकारी सर्याम यांना भ्रमणध्वनीवर ही बाब सांगितली. त्यावर सर्याम यांनी त्यांच्या टी.सी. देवून टाका, असे उलट उत्तर देवून मुख्याध्यापक बिरणवार यांना लगेच भ्रमणध्वनीवरुन विद्यार्थ्यांच्या टीसी देवून द्या, असा तोंडी आदेश दिल्याने पालक वर्ग अधिकच चिडला व आंदोलन सुरुच ठेवण्याची भूमिका घेतली. संबंधित अधिकाऱ्यांच्या अशा वागण्याची व जनप्रतिनिधीचा मान न ठेवणाऱ्या अधिकाऱ्याची तक्रार जि.प. सदस्य पंधरे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडे केली. या आंदोलनात विद्यार्थी शाळेच्या बाहेर आमगाव-देवरी मुख्य मार्गाला लागून असलेल्या ठिकाणी ज्ञानाचे धडे घेत आहेत. सदर मार्गावर नेहमी वाहने चालत असतात. अशावेळी विद्यार्थ्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे, यासाठी शिक्षण विभागाचे अधिकारी जबाबदार आहेत, असा आरोप गावकरी करीत आहेत.