शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

ओबीसी आरक्षणासाठी राज्य सरकारने पुढाकार घ्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:27 IST

अर्जुनी मोरगाव : राज्य निवडणूक आयोगाने सहा जिल्हा परिषदेतील ओबीसी आरक्षण रद्द केल्याने ओबीसी आरक्षणावर गंडांतर तर येणार नाही ...

अर्जुनी मोरगाव : राज्य निवडणूक आयोगाने सहा जिल्हा परिषदेतील ओबीसी आरक्षण रद्द केल्याने ओबीसी आरक्षणावर गंडांतर तर येणार नाही ना? अशी भीती राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. राज्य शासनाने ओबीसी आरक्षण कायम ठेवण्यासाठी पुढाकार घेण्याची मागणी माजी जि. प. सदस्य गंगाधर परशुरामकर यांनी केली आहे.

महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ मधील १२(२)मध्ये जिल्हा परिषदेच्या एकूण जागांपैकी २७ टक्के जागा ओबीसी प्रवर्गासाठी राखून ठेवावयाच्या आहेत. मात्र सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण कलम रद्द केल्याने ओबीसीसाठी एकही जागा राहणार नाही. गोंदिया जिल्हा परिषदेत एकूण ५३ जागा आहेत. यापूर्वी १४ जागा ओबीसीसाठी राखीव असते. आता या १४ जागा सर्वसाधारण समजून ५० टक्के महिलांचे आरक्षण काढले जाईल व उर्वरित जागा सर्वसाधारण राहतील असे त्यांनी सांगितले.

........

असे राहील आरक्षण

गोंदिया जिल्ह्याची एकूण लोकसंख्या १० लक्ष ८२ हजार २७० आहे. यात १ लक्ष ३२ हजार ८८ अनुसूचित जाती व १ लक्ष ९८ हजार १९५ अनुसूचित जमाती मतदार आहेत. एकूण ५३ सदस्यांतून सर्वसाधारण २३ व यातील १२ महिला असतील. अनुसूचित जाती ६ यातील ३ महिला, ओबीसी १४ यातील ७ महिला,अनुसूचित जमाती १० यातील ५ महिला याप्रमाणे आरक्षण होते. आता अनुसूचित जाती ६ यात महिला ३, जमाती १० यात महिला ५ व सर्वसाधारण ३७ यात महिला १९ याप्रमाणे आरक्षण असेल.

......

राज्य शासनाने ओबीसीचे आरक्षण कायम ठेवा

राज्य निवडणूक आयोगाने नागपूर, वाशिम,अकोला,धुळे, नंदुरबार व पालघर जिल्हा परिषदेचे आरक्षण रद्द केल्याने येथील रिक्त जागेसाठी २३ मार्चला महिला आरक्षण काढण्याचे जाहीर केले आहे. भंडारा व गोंदिया जिल्हा परिषदेच्या निवडणुका घोषित व्हायला आहेत. त्यामुळे ओबीसीचे आरक्षण रद्द करून त्या जागा सर्वसाधारण धरून ३७ पैकी १९ सर्वसाधारण महिला असे आरक्षण काढले जाईल. यामुळे ओबीसी प्रवर्ग संपुष्टात येतो की काय? अशा चर्चांना उत आला आहे. राज्य शासनाने ओबीसीचे आरक्षण कायम ठेवण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी परशुरामकर यांनी केली आहे.