शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा कर्णधार दहशतवाद्यांना, मसूद अझहरला मॅच फी दान करणार; तशी घोषणाच केली...
2
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
3
Tata Capital IPO: गुंतवणूकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक, टाटा कॅपिटलनं सेट केला प्राईज बँड; GMP पण सुस्साट, पाहा डिटेल्स
4
"वडिलांची जागा मी कधीच घेऊ शकत नाही, पण..."; ठाकरेंच्या आमदाराने घेतले श्वेताचे पालकत्व 
5
मुंब्रा अपघात काळ्या बॅगेमुळेच! तीन महिन्यांच्या चौकशी अहवालात कारण स्पष्ट
6
कोण आहेत मोहसिन नकवी? जे टीम इंडियाची ट्रॉफी घेऊन पळून गेले; 'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारताविरोधात...
7
तुमची मुलगी म्हणेल Thank You! या ६ बेस्ट स्कीम्स देतील जबरदस्त नफा, ५ नंबरच्या स्कीमनं तर पक्कं होईल तिचं भविष्य सुरक्षित
8
संतापजनक! आधी मारहाण, नंतर शाळेच्या खिडकीला उलटे टांगले; ७ वर्षाच्या मुलावर क्रूरता
9
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
10
सोशल मीडियावरील ती पोस्ट! ...अन् टीम इंडियानं अख्ख्या जगासमोर घेतला पाक मंत्र्याचा बदला
11
IND vs Pak: "अभिषेक बच्चन चांगला खेळलास", भारताने आशिया कप जिंकल्यानंतर बिग बींचा शोएब अख्तरला टोला
12
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
13
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
14
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
15
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
16
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
17
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
18
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
19
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
20
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर

ओबीसी आरक्षणासाठी राज्य सरकारने पुढाकार घ्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:27 IST

अर्जुनी मोरगाव : राज्य निवडणूक आयोगाने सहा जिल्हा परिषदेतील ओबीसी आरक्षण रद्द केल्याने ओबीसी आरक्षणावर गंडांतर तर येणार नाही ...

अर्जुनी मोरगाव : राज्य निवडणूक आयोगाने सहा जिल्हा परिषदेतील ओबीसी आरक्षण रद्द केल्याने ओबीसी आरक्षणावर गंडांतर तर येणार नाही ना? अशी भीती राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. राज्य शासनाने ओबीसी आरक्षण कायम ठेवण्यासाठी पुढाकार घेण्याची मागणी माजी जि. प. सदस्य गंगाधर परशुरामकर यांनी केली आहे.

महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ मधील १२(२)मध्ये जिल्हा परिषदेच्या एकूण जागांपैकी २७ टक्के जागा ओबीसी प्रवर्गासाठी राखून ठेवावयाच्या आहेत. मात्र सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण कलम रद्द केल्याने ओबीसीसाठी एकही जागा राहणार नाही. गोंदिया जिल्हा परिषदेत एकूण ५३ जागा आहेत. यापूर्वी १४ जागा ओबीसीसाठी राखीव असते. आता या १४ जागा सर्वसाधारण समजून ५० टक्के महिलांचे आरक्षण काढले जाईल व उर्वरित जागा सर्वसाधारण राहतील असे त्यांनी सांगितले.

........

असे राहील आरक्षण

गोंदिया जिल्ह्याची एकूण लोकसंख्या १० लक्ष ८२ हजार २७० आहे. यात १ लक्ष ३२ हजार ८८ अनुसूचित जाती व १ लक्ष ९८ हजार १९५ अनुसूचित जमाती मतदार आहेत. एकूण ५३ सदस्यांतून सर्वसाधारण २३ व यातील १२ महिला असतील. अनुसूचित जाती ६ यातील ३ महिला, ओबीसी १४ यातील ७ महिला,अनुसूचित जमाती १० यातील ५ महिला याप्रमाणे आरक्षण होते. आता अनुसूचित जाती ६ यात महिला ३, जमाती १० यात महिला ५ व सर्वसाधारण ३७ यात महिला १९ याप्रमाणे आरक्षण असेल.

......

राज्य शासनाने ओबीसीचे आरक्षण कायम ठेवा

राज्य निवडणूक आयोगाने नागपूर, वाशिम,अकोला,धुळे, नंदुरबार व पालघर जिल्हा परिषदेचे आरक्षण रद्द केल्याने येथील रिक्त जागेसाठी २३ मार्चला महिला आरक्षण काढण्याचे जाहीर केले आहे. भंडारा व गोंदिया जिल्हा परिषदेच्या निवडणुका घोषित व्हायला आहेत. त्यामुळे ओबीसीचे आरक्षण रद्द करून त्या जागा सर्वसाधारण धरून ३७ पैकी १९ सर्वसाधारण महिला असे आरक्षण काढले जाईल. यामुळे ओबीसी प्रवर्ग संपुष्टात येतो की काय? अशा चर्चांना उत आला आहे. राज्य शासनाने ओबीसीचे आरक्षण कायम ठेवण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी परशुरामकर यांनी केली आहे.