शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
4
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
5
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
6
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
7
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
8
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
9
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
10
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
11
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
12
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
13
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
14
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
15
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
16
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
17
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
18
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
19
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
20
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच

मेडिकलमधील ऑक्सिजन जनरेशन प्लांट त्वरित सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:27 IST

गोंदिया : जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होऊन रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी ...

गोंदिया : जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होऊन रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी अदानी वीज प्रकल्पाच्या सीएसआर निधीतून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (मेडिकल) मंजूर करण्यात आलेले ऑक्सिजन जनरेशन प्लांट त्वरित सुरू करा, जिल्ह्यातील रुग्णांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेण्याचे निर्देश खा. प्रफुल्ल पटेल यांनी जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना यांना दिले.

जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झाला असून रुग्ण संख्येत दररोज भर पडत आहे, तर ऑक्सिजन, रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाल्याच्या तक्रारीत वाढ झाली आहे. याचीच दखल घेत खा. प्रफुल्ल पटेल यांनी सोमवारी जिल्हाधिकारी मीना यांच्याशी चर्चा केली. आ. मनोहर चंद्रिकापुरे व माजी आ. राजेंद्र जैन यांनासुद्धा या विषयावर चर्चा करून जिल्ह्यातील नागरिकांना आरोग्य सुविधा कशा उपलब्ध होतील या दृष्टीने जिल्हाधिकाऱ्यांसह चर्चा करण्यास सांगितले होते. यानंतर चंद्रिकापुरे व जैन यांनी जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना यांची भेट घेऊन त्यांच्याशी आरोग्यविषयक सोयीसुविधांबाबत चर्चा केली. कोरोनाच्या गंभीर रुग्ण संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे रेमडेसिविर इंजेक्शनच्या मागणीत एकाच वेळी वाढ झाल्याने तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे त्याचा काळाबाजार सुरू असून अतिरिक्त दराने त्याची विक्री केली जात असल्याने सर्वसामान्य आणि गोरगरीब रुग्णांना त्याचा फटका बसत आहे. त्यामुळे जिल्ह्यात रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरेसा साठा उपलब्ध करून ठेवण्यास सांगितले. तसेच अदानी वीज प्रकल्पाच्या सीएसआर निधीतून मेडिकलमध्ये ऑक्सिजन जनरेशन प्लांट मंजूर करण्यात आला आहे. तो त्वरित सुरू केल्यास ऑक्सिजन तुटवड्याची समस्या निर्माण होणार नाही. त्यासाठी युद्धपातळीवर काम करण्यास सांगितले. तसेच सनफ्लकमधून ऑक्सिजन पुरवठा करण्याची मागणी केली. खा. पटेल यांनी जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना यांच्याशी दूरध्वनीवरून सविस्तर चर्चा केली. जिल्ह्यातील कोविड परिस्थितीचा आढावा घेतला. आरोग्य व्यवस्थेसह काेविड नियंत्रणासाठी उपाययोजना करण्याकरिता आपले सदैव सहकार्य राहील, अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली. यावेळी आ. मनोहर चंद्रिकापुरे आणि माजी आ. राजेंद्र जैन यांनीसुद्धा जिल्ह्यातील कोविड परिस्थिती आरोग्यविषयक सोयी सुविधांचा आढावा घेत रुग्णांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेण्यास जिल्हा प्रशासनाला सांगितले.

........

दोन्ही जिल्ह्यांत परिस्थितीवर माझे लक्ष

गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यांत कोविड रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे परिस्थिती बिकट होत चालली आहे. मी जरी बाहेर असलो तरी या दोन्ही जिल्ह्यांतील सर्व परिस्थितीवर बारीक नजर ठेवून असून दररोज जिल्हाधिकारी व आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांकडून याचा आढावा घेऊन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. तसेच रुग्णांना आरोग्यविषयक सोयी सुविधा वेळेत मिळतील याची काळजी घेण्याचे निर्देशसुद्धा मी प्रशासनाला दिले असल्याचे खा. प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले.