शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

दुधात भेसळ सुरूच

By admin | Updated: June 12, 2017 01:30 IST

या धावपळीच्या युगात जो तो कमीत कमी श्रम करुन लवकर कसे श्रीमंत होता येईल यासाठी धडपडत असल्याचे चित्र दिसत आहे.

दुर्लक्ष : अन्न व औषध प्रशासन विभागाचेलोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया: या धावपळीच्या युगात जो तो कमीत कमी श्रम करुन लवकर कसे श्रीमंत होता येईल यासाठी धडपडत असल्याचे चित्र दिसत आहे. मात्र अधिक नफा मिळविण्याच्या भारात आपण आपल्याच लोकांच्या जीवनाशी खेळ करित आहोत ही बाब कदाचित विसरली जात आहे. दैनंदिन जिवनात प्रत्येकाची गरज असलेल्या दुधामध्ये रासायनिक द्रव्यांची भेसळ केली जात असल्याचे प्रकार अनेकदा सामोर आले आहे. मात्र अन्न व औषध प्रशासन विभागाकडून त्यांच्यावर कारवाई होत नसल्याचे दिसून येते. दूध हा प्रत्येकाच्या दैनंदिन वापरातील पदार्थ आहे. प्रत्येकाच्या दिवसाची सुरूवात देखील दुधापासून तयार केलेल्या चहानेच होते. तसेच डॉक्टर देखील आजारी असलेल्या रुग्णांना व लहान मुलांना दूध पिण्याचा सल्ला देतात. दुधामध्ये असलेले प्रथिने मानवी आरोग्यकरिता लाभदायक असतात.दुधाच्या पावित्रामुळेच दुधाला पुजा, होमहवन यामध्ये उपयोग केला जातो. मात्र सध्या मिळणाऱ्या दुधाच्या शुध्दीकरणावर त्यातील भेसळीमुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आपण दररोज सेवन करित असलेल्या दुधामध्ये प्रथिने कमी व भेसळ युक्त पदार्थांचा वापर अधिक प्रमाणत केल्या जात असल्याचे प्रकार बऱ्याच ठिकाणी उघडकीस आले आहे. काही दूध विक्रेत्यांनी दुधामध्ये भेसळ करुन विक्री करण्याला आपला व्यवसाय केला आहे. हा व्यवसाय करताना आपण आपल्याच लोकांच्या जीवनाशी खेळ करित असल्याची बाब ही ते विसरत चालले आहे. अन्न औषध व प्रशासन विभागाने जिल्ह्यात अनेक दूध डेअरी व खोवा तयार करणाऱ्यांवर धाड टाकून दोन तीन हजार किलो भेसळयुक्त खोवा जप्त केला होता. तर गोंदिया शहरातील एका दूध विक्रेत्यांच्या घरी शहर पोलिसांनी धाड टाकून हजारो लिटर भेसळ युक्त दूध जप्त केले होते. सदर दुधविक्रेत्यांच्या घरून सॉकरीन, मॉल्टोवेट पावडर, कपडे धुण्याचे पावडर,शॉम्पू, फोटो धुण्याचे रसायनाचा मोठ्या प्रमाणात साठा सापडला होता. सदर दूध विक्रेत्याने हे सर्व पदार्थ दुधामध्ये भेसळ करित असल्याचे सांगितले होते. या पदार्थाच्या भेसळीमुळे दुधाची डिग्री व फॅट वाढविली जाते. याचबरोबर यामध्ये युरिया मिक्स करुन रासायनिक दूध देखील तयार केले जाते.हे रासायनिक दूध शुध्द दुधासारखे दिसते व त्याची चव देखील सारखीच असते. त्यामुळे कुणीही सदर दूध भेसळयुक्त असल्याची कल्पना करु शकत नाहीत. दुधामध्ये या रासानिक पदार्थांची भेसळ केल्याने दूध विक्रेत्यांना मोठ्या प्रमाणात नफा मिळते व रासानिक पदार्थांची किमत देखील कमी असल्याने आणि ते बाजारपेठेत सहज उपलब्ध होत असल्याने मोठ्या प्रमाणात दुधाची भेसळ केली जाते. हा प्रकार जिल्ह्यातही अजुनही बिनधास्तपणे सुरूच आहे. मात्र असे एखादे प्रकरण उघडकीस आले की अन्न औषध व प्रशासन विभाग त्यांच्यावर कारवाई करते. मागील पाच ते सहा महिन्याच्या कालावधीत एकाही दूध विक्रेत्यावर कारवाई करण्यात आल्याचे ऐकिवात नाही. त्यामुळे दूधभेसळ खोरांची हिम्मत वाढत चालली आहे. मात्र यामुळे मानवी आरोग्याचा प्रश्न बिकट होत चालला आहे. आपण नकळत जहर सेवन करित आहोत याची थोडीशी कल्पनाही या भोळ्या लोकांना नसते. दुधामध्ये भेसळ करणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.