शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

भरडाईचे नियोजन करून त्वरित धान खरेदी केंद्र सुरू करा ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:22 IST

गोंदिया : रब्बी हंगामातील शासकीय धान खरेदी करण्यास मंजुरी दिल्यानंतरही जिल्ह्यात पर्याप्त प्रमाणात धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले ...

गोंदिया : रब्बी हंगामातील शासकीय धान खरेदी करण्यास मंजुरी दिल्यानंतरही जिल्ह्यात पर्याप्त प्रमाणात धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले नाही. त्यामुळे शेतकरी चांगलेच अडचणीत आले आहेत. ही बाब खा. प्रफुल पटेल यांच्या माध्यमातून माजी आमदार राजेंद्र जैन व आ. मनोहर चंद्रिकापुरे यांनी अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या निदर्शनास आणून दिली. यामुळे विभागाचे सचिव भोसले हे जिल्ह्यात आले होते. दरम्यान जिल्हाधिका-यांच्या उपस्थितीत घेतलेल्या आढाव्यात भरडाईचे नियोजन करून त्वरित सर्व केंद्र सुरू करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

गोंदिया जिल्ह्यातील धान खरेदी संदर्भातील येणा-या अडी-अडचणी दूर करण्यासाठी अन्न व नागरी पुरवठा विभागाचे सचिव भोसले हे बुधवारी जिल्ह्याच्या दौ-यावर आले होते. दरम्यान त्यांनी जिल्हा मार्केटिंग फेडरेशन, आदिवासी विकास महामंडळ, नागरी पुरवठा विभाग तसेच जिल्हा प्रशासनाकडून आढावा घेतला. याप्रसंगी माजी आमदार राजेंद्र जैन, आ. मनोहर चंद्रिकापुरे, आ.सहषराम कोरोटे यांनी जिल्ह्यात कोणत्याही परिस्थितीत धान खरेदी केंद्र त्वरित सुरू करण्यात यावे, अशी मागणी लावून धरली. आढाव्यानुसार जिल्ह्यात सन २०२०-२१ च्या खरीप हंगामात ४३ लाख ९७ हजार २४७.७३ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे रब्बी हंगामात ६४ हजार ९९८ हेक्टर क्षेत्रामध्ये धानाची लागवड करण्यात आली आहे. कृषी विभागाच्या अहवालानुसार प्रति हेक्टर ४३.९३ क्विंटल उत्पादन होणार आहे. यानुरूप जवळपास २९ लाख क्विंटल धान रब्बी हंगामातून उत्पादन होणार आहे. मात्र, एवढे साठवणूक ठेवण्यासाठी गोदाम उपलब्ध नसल्याची माहिती पुढे आली. भरडाईसाठी धानाची उचल करण्यात आली नसल्याने ही अडचण निर्माण झाली आहे.

......

५६१ राईस मिलर्ससह करार नामे

खरीप हंगामात खरेदी केलेल्या धानाची भरडाई करण्यासाठी ५६१ करारनामे केलेल्या राईस मिलर्सपैकी ११० मिलर्स भरडाईचे काम करीत आहेत. तर उर्वरित मिलर्सकडून अद्यापही लॉटची उचल करण्यात आलेली नाही. अशी माहिती सचिवांकडे सादर करण्यात आली. यावर सचिव भोसले यांनी ज्या मिलर्संनी अद्याप धानाची उचल केली नाही. त्यांच्या अडचणी दूर करून त्यांना धान उचल करण्यासाठी प्रेरित करावे, शिवाय साठवणुकीचे पर्यायी नियोजन करून इतर सर्व धान खरेदी केंद्र सुरू करावे, असे निर्देशही दिले. सद्यस्थितीत रब्बी हंगामातील ४० धान खरेदी केंद्र सुरु करण्यात आले आहे.