शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

दहावीच्या उत्तरपत्रिकांना संपाचा फटका

By admin | Updated: March 21, 2015 01:58 IST

गेल्या १० मार्चपासून सुरू झालेल्या पोस्टाच्या उपडाकपालांच्या संपाचा दहावीच्या परीक्षेतील उत्तरपत्रिकांना फटका बसला आहे.

गोंदिया/सडक-अर्जुनी : गेल्या १० मार्चपासून सुरू झालेल्या पोस्टाच्या उपडाकपालांच्या संपाचा दहावीच्या परीक्षेतील उत्तरपत्रिकांना फटका बसला आहे. जिल्हाभरातील शंभरावर शाखा डाकघरांमध्ये हे पेपरचे गठ्ठे पडले आहेत. त्यावर तोडगा म्हणून आता संबंधित पेपर तपासणी करणाऱ्या शिक्षकांनी स्वत:च ते गठ्ठे तेथून घेऊन जाण्याचा आदेश शिक्षण मंडळाने दिला आहे.ग्रामीण भागातील डाक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्यामुळे उत्तरपत्रिकांचे गठ्ठे डाकघरातच पडून आहेत. संप केव्हा संपेल व उत्तरपत्रिका तपासणीकरिता कधी बोर्डात जातील, अशी समस्या निर्माण झाली आहे. सडक-अर्जुनीसह जिल्ह्यातील अनेक उपडाकघरांमध्ये आणि त्याअंतर्गत येणाऱ्या जवळपास १०० शाखा डाकघरांमध्ये उत्तरपत्रिकांचे गठ्ठे तसेच पडून असल्याने निकाल प्रभावित होण्याची शक्यता आहे.प्रत्येक वर्षी दहावी-बारावी परीक्षेच्या वेळी काही ना काही वाद उभा होतोच. कधी शिक्षकांचा संप तर कधी उत्तरपत्रिकांच्या मूल्यांकणावर बहिष्कार, या दरवर्षीच्या बाबी आहेत. मात्र यंदा ग्रामीण भागातील डाकसेवकांनी संप पुकारल्याने उत्तरपत्रिकांची तपासणीच होईल किंवा नाही, याची शंका व्यक्त केली जात आहे. तसेच यावर तोडगा काढण्याची मागणीसुद्धा होत आहे. ग्रामीण भागातील अनेक डाकघरांत गठ्ठे पडून आहेत. यावर तोडगा म्हणून आता ज्या शिक्षकाकडे ते पेपर पोहोचवायचे आहेत त्या शिक्षकानेच ते पोस्ट आॅफिसमधून घेऊन जावेत, असे निर्देश शिक्षण मंडळाने दिले आहेत.दहावीची परीक्षा ३ मार्चपासून सुरू झाली आणि ग्रामीण भागातील डाक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी १० मार्चपासून संप सुरू केला. त्यांच्या मागण्यांमध्ये डाकसेवकांना सातव्या वेतन आयोगात सामील करणे, केंद्रीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देणे, कामाचे आठ तास घेवून खात्यात समाविष्ट करणे, सेवकांच्या वारसाला १०० टक्के अनुकंपा नियुक्ती देणे, सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नती देणे, पदोन्नती पगार देणे आदी मागण्यांचा समावेश आहे. सडक-अर्जुनी डाक विभागांतर्गत बडोले, गहाणे, रामरामे, वर्मा, मेश्राम, वाढीवे, कापगते, मुंगतोडे, येळे, बिसेन, चौरागडे, मेश्राम, वैद्य, जनबंधू, धमगाये, मौजे, काळसर्पे, उंदिरवाडे आदी डाकसेवक संपावर असल्याची माहिती आहे. या संपामुळे ग्रामीण भागात अनेक कामे प्रभावित झाली आहेत. डाक घरातील डाकसेवकांशिवाय त्याला सहकार्य करण्यासाठी कर्मचारी नसल्याने नियमित व महत्त्वाची कामे प्रभावित झाली. दहावीच्या पेपरचे गठ्ठे कस्टडीतून डाकघरात जमा केले जातात. डाकघरातून सदर गठ्ठे पुढील ठिकाणी पोहोचते झाले नाही. मागील वर्षी बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर प्राध्यापकांनी बहिष्कार घातल्याने निकाल विलंबाने लागला होता. (प्रतिनिधी/शहर प्रतिनिधी)