शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
5
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
6
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
7
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
8
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
9
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
10
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
11
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
12
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
13
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
14
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
15
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
16
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
17
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
18
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
19
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
20
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला

कर्मचाºयांच्या संपाने प्रवाशांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2017 22:02 IST

एसटी कर्मचाºयांचे मागील तीन दिवसांपासून संप सुरु आहे. शुक्रवारी संपाचा चौथा दिवस होता. शासन आणि एस.टी.कर्मचारी यांच्यात मागण्यांवरुन चर्चा फिस्कटली.

ठळक मुद्देसर्व गाड्या बसस्थानकात जमा : काळपिवळी चालकांची मनमानी

लोकमत न्यूज नेटवर्कतिरोडा : एसटी कर्मचाºयांचे मागील तीन दिवसांपासून संप सुरु आहे. शुक्रवारी संपाचा चौथा दिवस होता. शासन आणि एस.टी.कर्मचारी यांच्यात मागण्यांवरुन चर्चा फिस्कटली. त्यामुळे हा संप चिघळला आहे. दरम्यान दिवाळीच्या कालावधीत या संपामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे.स्थानिक आगारातील चालक, वाहक इतर कर्मचारी संपात सहभागी झाल्याने प्रवाश्यांची फारच गैरसोय होत आहे. दिवाळी व भाऊबिजनिमित्त बाहेरगावी जातात. ग्रामीण भागात एसटीच प्रवासाचे साधन असून प्रवाशांच्या सोयीचे आहे. मात्र गेल्या तीन दिवसांपासून एसटी कर्मचाºयांचा संप सुरू असल्याने त्याचा फटका ग्रामीण भागातील प्रवाश्यांना बसत आहे.तिरोडा आगारातील ७४ वाहक, ७० चालक, तांत्रिक सहायक २५, इतर ३२ असे २०१ कर्मचारी संपात सहभागी असल्याचे सांगण्यात आले. तसेच अकोला, पुसद, आकोट, नागपूर, माहूर, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया या ठिकाणी गेलेले ८ चालक, ८ वाहक त्या ठिकाणीच गाडीसोबत अडकून पडलेले आहेत. संपाला कर्मचाºयांनी शंभर टक्के पाठींबा दर्शविला असून तिरोडा आगारातील सर्व ४४ गाड्या आगारात जमा करण्यात आल्या आहेत. एसटी कामगारांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात यावा, यासह विविध मागण्यासाठी कर्मचाºयांनी संप पुकारला आहे. त्यात विविध संटघटना व कृती समितीच्या पदाधिकाºयांचा सहभाग आहे. मागण्या पूर्ण होईपर्यंत संप मागे घेणार नसल्याचे कर्मचाºयांनी सांगितले. एसटी कर्मचाºयांच्या मंडपाला तालुका काँग्रेस अध्यक्ष राधेलाल पटले यांनी भेट देऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. संपात संघटनेचे पदाधिकारी, कृती समितीच अध्यक्ष कलाम बाबा शेख, सदस्य असीम खान, हंसराज वैद्य, शिवकुमार कनोजे, ओमप्रकाश कावळे, विनायक मारकंड, राजू टेकाम, दत्ता बकरे, पाडुरंग शेंडे, एजाज खान पठान, शामा गाते, दिपक चौधरी, नरेश तिडके, राजेश झगेकार, विलास चव्हाण, महेश सपाटे, गणेश टेंभरे, सादिक पठान, अनिल सार्वे, नाशिक मेश्राम सहभागी झाले आहेत.गोंदिया आगारातील बस सेवा ठप्पचराज्य परिवहन महामंडळाच्या कामगारांनी १६ आॅक्टोबरच्या मध्यरात्रीपासून पुकारलेल्या संपाला गोंदिया आगारातील कामगारांनीसुद्धा १०० टक्के पाठींबा दिला आहे. शुक्रवार (दि.२०) संपाच्या चौथ्या दिवशीसुद्धा गोंदिया आगारातील कामकाज बंदच होते. वाहक, चालक, यांत्रिक आदी सर्व कामगार संपात सहभागी झाले असून जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत संप सुरूच राहील, असा पवित्रा त्यांनी घेतला आहे. दिवाळी सणानिमित्त बाहेरगावी ये-जा करणाºया प्रवाशांना मोठाच मनस्ताप होत आहे. काळीपिवळी वाहनधारकांनी चांगलीच चांदी झाली आहे. एसटी बंदमुळे प्रवासी आता मिळेल त्या साधनाने आपला प्रवास करीत आहेत.संपाकडे विद्यार्थ्यांच्या पालकांचे लक्षसुदैवाने दिवाळीनिमित्त शाळांना सुट्टी असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर संपाचा परिणाम झाला नाही. अन्यथा मानव विकास कार्यक्रमांतर्गत धावणाºया ‘स्कूल बसेस’ बंदचा फटका विद्यार्थ्यांच्या विद्यार्जनावर पडला असता व त्यांचे शाळेत ये-जा करणे बंद झाले असते. एका आठवड्यानंतर शाळा सुरू होणार आहेत. जर एसटी कामगारांचा संप असाच सुरू राहिला तर ग्रामीण भागातून शिक्षणासाठी शहरात येणाºया विद्यार्थिनी व विद्यार्थ्यांची मोठीच गैरसोय होणार आहे. विशेष म्हणजे एसटी कामगारांचा संप कधी मार्गी लागतो याकडे आता विद्यार्थ्यांच्या पालकांसह, व्यापारी, मंडईनिमित्त इतरत्र जाणारे प्रवासी आदी सर्वांचेच लक्ष लागले आहे.