शहरं
Join us  
Trending Stories
1
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
2
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
3
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
4
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
5
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
7
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
8
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
9
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
10
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
11
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
12
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
13
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
14
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
15
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
16
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
17
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
18
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?
19
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ
20
‘’२०२७ चा वर्ल्डकप खेळायला मिळाला तर…’’, बोलता बोलता रोहित झाला होता भावूक, तो व्हिडीओ होतोय व्हायरल  

सुरक्षित व आरामदायी प्रवासामुळेच एसटीला पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:18 IST

गोंदिया : ‘कशाला करता विषाची परीक्षा, एसटी बरी खासगीपेक्षा’ या म्हणीनुसार जिल्हावासी राज्य रस्ते परिवहन महामंडळाच्या एसटीवरच भरवसा ठेवत ...

गोंदिया : ‘कशाला करता विषाची परीक्षा, एसटी बरी खासगीपेक्षा’ या म्हणीनुसार जिल्हावासी राज्य रस्ते परिवहन महामंडळाच्या एसटीवरच भरवसा ठेवत प्रवासासाठी तिलाच प्राधान्य देतात. जिल्ह्यात काही खासगी ट्रॅव्हल्सवाल्यांकडून जिल्हा अंतर्गत व जिल्हाबाह्य फेऱ्या चालविल्या जातात. मात्र, एसटीच्या फेऱ्या दिवसभर असल्याने जास्त पैसे मोजून, तसेच सुरक्षित प्रवासाची हमी सोडून खासगी वाहनांतून प्रवासाला प्रवासी पसंती देत नाही. आता लांब पल्ल्यासाठी महामंडळाच्या गाड्याही आरामदायी असल्याने प्रवाशांची त्यांनाच पसंती दिसते.

-------------------------------

जिल्ह्यात झालेले अपघात

एसटी ट्रॅव्हल्स

२०१८ २९ ८

२०१९ २९ ५

२०२० १४ ३

२०२१ (जुलैपर्यंत) ०० ००

------------------------------

एसटी व ट्रॅव्हल्सलाही स्पीड लॉक

उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या नियमानुसार, एसटी असो वा ल्सगी ट्रॅव्हल्स प्रत्येकालाच स्पीड लॉक लावले जाते. यामध्ये राज्य महामार्गावर धावणाऱ्या वाहनांसाठी ६० किलोमीटर प्रतितास, तर राष्ट्रीय महामार्गावर धावणाऱ्या वाहनांसाठी ८० किलोमीटर प्रतितास वेगावर स्पीड लॉक केले जाते.

---------------------------

आगार प्रमुखाचा कोट

आगारातून दिवसभर एसटीच्या फेऱ्या सुरू असतात, यामुळे प्रवाशांची सोय आहे, शिवाय आता लांब पल्ल्यासाठी शिवशाहीसारख्या आरामदायी गाड्या असल्यामुळे प्रवाशांना आरामदायी प्रवास करता येतो. विशेष म्हणजे, एसटीचा प्रवास आरामदायी असतानाच सुरक्षित प्रवासाची हमी आहे. यामुळे एसटीलाच प्रवासासाठी पसंती दिली जाते.

- संजना पटले, आगारप्रमुख, गोंदिया.

------------------------------

सुरक्षित प्रवास महत्त्वाचा

जीवापेक्षा मोठे दुसरे काहीच नाही. यामुळे भरधाव वेगात निष्काळजीपणे धावणाऱ्या वाहनांत प्रवास करून, आपला जीव धोक्यात घालण्यात शहाणपण नाही. एसटीचा प्रवास सुरक्षित असतो, हे महत्त्वाचे आहे व आता तोही आरामदायी होत आहे. यामुळे कमी पैशांत सुरक्षित प्रवासाची हमी देणारी एसटीच बरी.

- बळवंत मेंढे (खातीया)

------------------------------

एसटीचा प्रवास सुरक्षित असून, आपल्या गंतव्यापर्यंत पोहोचण्यासाठी सुरक्षित प्रवास महत्त्वाचा आहे. आरामात प्रवासाची सोय असून, त्या प्रवासाला सुरक्षेची हमी नसल्यास आपला जीव धोक्यात घालण्याचा प्रकार आहे. यामुळे आपली जीव धोक्यात घालून प्रवास करण्यापेक्षा एसटीचा सुरक्षित प्रवास अधिक चांगला.

- बकाराम हुमे (आसोली)