शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

जिल्ह्यातील २१३ विद्यार्थिनींना एसटीचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 21:46 IST

शिक्षणासाठी मुलींना मोफत प्रवासाची सुविधा देणाऱ्या ‘अहिल्याबाई होळकर मोफत प्रवास योजनेची’ व्याप्ती आता वाढविण्यात आली आहे. वर्ग ५ ते १० पर्यंतच्या विद्यार्थिनींसाठी असलेल्या या योजनेत आता इयत्ता १२ वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना सुविधा देण्याचा निर्णय राज्य परिवहन महामंडळाने घेतला आहे. जिल्ह्यातील २१३ विद्यार्थिनींना या नव्या योजनेमुळे मोफत प्रवासाची सुविधा मिळाली आहे.

ठळक मुद्देअहिल्याबाई होळकर योजना : १२ वी पर्यंतच्या विद्यार्थिनींचा समावेश

कपिल केकत।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शिक्षणासाठी मुलींना मोफत प्रवासाची सुविधा देणाऱ्या ‘अहिल्याबाई होळकर मोफत प्रवास योजनेची’ व्याप्ती आता वाढविण्यात आली आहे. वर्ग ५ ते १० पर्यंतच्या विद्यार्थिनींसाठी असलेल्या या योजनेत आता इयत्ता १२ वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना सुविधा देण्याचा निर्णय राज्य परिवहन महामंडळाने घेतला आहे. जिल्ह्यातील २१३ विद्यार्थिनींना या नव्या योजनेमुळे मोफत प्रवासाची सुविधा मिळाली आहे.ग्रामीण भागात आजही कित्येक गावांत शिक्षणाची सोय नसल्याने मुलींना शिक्षणापासून वंचित रहावे लागत आहे. गावात शाळा किंवा महाविद्यालय नसल्याने परगावी शिक्षणासाठी जाऊ देण्याची परवानगी आजही पालक देत नाहीत. यात कित्येकांना मुलींच्या बाहेरगावी ये-जा करण्याचा खर्च परवडणारा नसतो. अशात मुलींना मन मारून शिक्षण मधातच सोडावे लागते. मात्र ग्रामीण भागातील मुलींनाही शिक्षण घेऊन पुढे जाता यावे. यासाठी ग्रामीण भागातील माध्यमिक शिक्षणाची सोय नसलेल्या ठिकाणापासून सोईच्या ठिकाणापर्यंत मोफत प्रवासाची सुविधा महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने करून दिली.यासाठी ‘अहिल्याबाई होळकर मुलींना मोफत प्रवास योजना’राबविली जात आहे. या योजनेंतर्गत वर्ग ५ ते १० वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत प्रवासाची सुविधा होती.१० वी नंतरच्या विद्यार्थिनींना या योजनेतून वगळण्यात आले होते. अशात अशा मुलींचे १० वी नंतरचे शिक्षण धोक्यात येत होते. नेमकी हीच बाब लक्षात घेत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने ‘अहिल्याबाई होळकर मुलींना मोफत प्रवास योजनेची’ व्याप्ती वाढवून १२ वीपर्यंतच्या विद्यार्थिनींना योजनेत समाविष्ट करून घेतले आहे. त्यामुळे आता १२ वी पर्यंत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनींना या योजनेंतर्गत शिक्षणासाठी मोफत प्रवासाची सोय मिळत आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील २१३ विद्यार्थिनींनी आपले पास काढून घेतले असून मोफत प्रवास योजनेचा लाभ घेत आहेत.१० वी पर्यंतच्या २५३६ विद्यार्थिंनीना सवलतअहिल्याबाई होळकर मुलींना मोफत प्रवास योजना पूर्वी वर्ग ५ ते १० पर्यंतच्या विद्यार्थिनींसाठी होती. या गटातील विद्यार्थिनींची संख्या जास्त असल्याने जिल्ह्यातील २५३६ विद्यार्थिनींनी या योजनेतंर्गत आपले पास काढून घेतल्याची माहिती आहे. जिल्ह्यातील २५३६ विद्यार्थिनी या योजनेच्या लाभार्थी असून शिक्षणासाठी योजनेंतर्गत मोफत प्रवासाचा लाभ घेत आहेत.आॅक्टोबर महिन्यात निघाले आदेशयापूर्वी वर्ग ५ ते १० पर्यंत शिकणाऱ्या ग्रामीण भागातील विद्यार्थिनींसाठी ही योजना राबविली जात होती. मात्र १२ वी पर्यंतच्या कित्येक विद्यार्थिनींना महाविद्यालयात ये-जा करण्यासाठी पैसे मोजावे लागत होते. अशात अशा विद्यार्थिनींना शिक्षणात किमान प्रवासाची तरी सुविधा देता यावी या दृष्टीकोनातून ‘अहिल्याबाई होळकर मुलींना मोफत प्रवास योजनेत बदल करण्यात आला. यासाठी आॅक्टोबर २०१८ मध्ये तसे आदेश काढण्यात आले आहेत.