शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

तणनाशक फवारणीने कचरा नष्ट होण्याऐवजी वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2019 05:00 IST

मात्र यामुळे धानातील कचरा नष्ट होण्याऐवजी त्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने १० एकरातील धानपीक गमविण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. त्यामुळे सदर तणनाशक औषधी तयार करणाऱ्यां कंपनीवर आणि कृषी केंद्र संचालकावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांना आर्थिक फटका : औषध निर्माण कंपनीवर कारवाईची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कपरसवाडा : धान पिकातील कचरा होऊन त्याचा उत्पादनावर परिणाम होऊ नये यासाठी शेतकऱ्यांने तणनाशकाची खरेदी करुन फवारणी केली. मात्र यामुळे धानातील कचरा नष्ट होण्याऐवजी त्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने १० एकरातील धानपीक गमविण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे. त्यामुळे सदर तणनाशक औषधी तयार करणाऱ्यां कंपनीवर आणि कृषी केंद्र संचालकावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.तिरोडा तालुक्यातील चांदोरी खुर्द येथील शेतकरी देवराम कोठुजी अंबुले यांनी आपल्या १० एकर शेतीत धान पिकाची लागवड केली. रोवणी केल्यानंतर शेतात तण कचरा होऊ नये यासाठी शेतात तणनाशक औषधीची फवारणी केली. देवराम अंबुले यांनी गावातीलच अंबुले कृषी केंद्रातून टुफोर्टी-नामिनी गोल्ड तणनाशक मागीतले असता त्यांनी त्याला अ‍ॅसर्ट कंपनीचे तणनाशक दिले.अंबुले यांनी शेतात जाऊन या तणनाशकाची फवारणी केली.आठ दिवस, पंधरा दिवस, महिना लोटला पण शेतातील तण नष्ट झाले नाही. तर धान नष्ट होण्यास सुरूवात झाली. तण वाढल्याने धानपिक दबले गेले व संपूर्ण शेतात धानाऐवजी तण मोठ्या प्रमाणात वाढले.शेतकऱ्याने कृषी केंद्र संचालकांना असर्ट तणनाशकामुळे फायदा न होता नुकसान झाल्याचे सांगितले. पण कृषी केंद्र संचालकांनी यावर कसलेच उत्तर न देता शेतकऱ्याला परतावून लावले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येता देवराम अंबुले यांनी या संपूर्ण प्रकाराची जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी तिरोडा यांच्याकडे रितसर तक्रार केली.मात्र अद्यापही याची चौकशी करण्यात आली नाही. गट क्र.२६१, २५९, २५६, आराजी ३.२८ हेक्टर कोदू अंबुले, नंदराम अंबुले व १४५, ४५२/१, ४२१/२ देवराम अंबुले आराजी १ हेक्टर एकूण चार हेक्टर जमिनीत या तणनाशकाची फवारणी केली. त्यांचा लागवड खर्च, बियाणे, खत यासाठी आलेला लाखो रुपयांचा खर्च कृषी केंद्र संचालकाच्या चुकीमुळे व्यर्थ गेला.हाती आलेले पीक सुध्दा वाया गेल्याने बँकेच्या कर्जाची परफेड कुठून करायची, वर्षभर कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा असा गंभीर प्रश्न अंबुले यांच्यासमोर निर्माण झाला असून त्यांच्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली असल्याचे त्यांनी लोकमतशी बोलतांना सांगितले.

टॅग्स :agricultureशेती