शहरं
Join us  
Trending Stories
1
"मलाही वाटतं मी मुख्यमंत्री व्हावं, पण..."; अजित पवार यांना असं का म्हणावंसं वाटलं? नेमका विषय काय?
2
गिल ने जीता दिल! गुजरातचं धडाकेबाज 'कमबॅक', काव्या मारनचा SRH संघ स्पर्धेतून जवळपास OUT!
3
विराट कोहलीने अवनीत कौरच्या 'त्या' फोटोला केलं Like, ट्रोल झाल्यावर स्पष्टीकरण देत म्हणाला...
4
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
5
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
6
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
7
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
8
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
9
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
10
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
11
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

योजना शेवटपर्यंत पोहोचवू

By admin | Updated: January 20, 2015 00:07 IST

माझ्या आदिवासी समाजाने माझ्यावर जी जबाबदारी दिली आहे, ती पूर्ण करण्याकरिता सरकारच्या योजना आदिवासी समाजातील अंतिम व्यक्तीपर्यंत पोहचविण्यास मी कटीबद्ध आहे,

देवरी : माझ्या आदिवासी समाजाने माझ्यावर जी जबाबदारी दिली आहे, ती पूर्ण करण्याकरिता सरकारच्या योजना आदिवासी समाजातील अंतिम व्यक्तीपर्यंत पोहचविण्यास मी कटीबद्ध आहे, असे प्रतिपादन आदिवासी विकास विभागाचे राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम यांनी केले.गोंडवाना सेवा समितीद्वारे देवरी येथील शिव मंदिरच्या पटांगणावर आदिवासी मेळावा व सत्कार समारंभ पार पडले. यावेळी ते मार्गदर्शन करीत होते. अध्यक्षस्थानी आ. संजय पुराम होते. प्रमुख अतिथी म्हणून माजी आ. नामदेव उसेंडी, माजी आ. रामरतन राऊत, महिला व बालकल्याण सभापती सविता पुराम, जि.प. सदस्य मीना राऊत, विरेंद्र अंजनकर, गीलानी, उपविभागीय अधिकारी सोनवाने, तहसीलदार उईके, फुलसुंगे उपस्थित होते.ना. आत्राम पुढे म्हणाले की, सरकारचे दुसरे सर्वात मोठे बजेट हे आदिवासी विभागाचे असते. परंतु आदिवासीकरिता शासनाच्या कल्याणकारी योजना प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे लोकांपर्यंत पोहोचतच नाही. ही प्रणाली लवकरच बदलविण्यात येईल. समाजाच्या विकासाकरिता युवकांना, विद्यार्थ्यांना योग्य दिशा देण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.आपल्या अध्यक्षीय भाषणातून आ. संजय पुराम यांनी धनगर समाजाच्या आरक्षणावर प्रकाश टाकला. ते म्हणाले, जर आमच्या सरकारने धनगर समाजाला आदिवासी समाजात समाविष्ट केले तर सर्वप्रथम आमदारकीच्या राजीनामा मी देणार. परंतु ही लढाई आम्हा सर्वांना मिळून लढायची आहे, असे त्यांनी सांगितले.यावेळी माजी आ. रामरतन राऊत, नामदेव उसेंडी, सोयाम यांनीही उपस्थिताना मार्गदर्शन केले. पाहुण्यांचे स्वागत गोंडी गीत व नृत्याने करण्यात आले. गोंडवाना समितीच्या पदाधिकाऱ्यांनी शाल व श्रीफळ देवून ना. अम्ब्रीशराव आत्राम व आ. संजय पुराम यांचा सत्कार केला. प्रास्ताविक देवकीशन दुर्गे, संचालन भरत मडावी यांनी तर आभार केशव मसराम यांनी मानले. यावेळी हजारोच्या संख्येत समाजबांधव उपस्थित होते. (प्रतिनिधी)