शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांचा आनंद गगनात मावेना; लेक दिविजाला दहावीत 92.60% गुण...
2
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
3
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
4
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
5
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
6
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
7
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
8
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
9
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
10
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार
11
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
12
चपाती बनवताना तुम्हीही करता का 'ही' चूक? वाढू शकतो कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध
13
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
14
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
15
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
16
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
17
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
18
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
19
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
20
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार

३१ मार्चपर्यंत निधी खर्च करा- बागडे

By admin | Updated: March 2, 2016 02:18 IST

शासनाकडून प्राप्त झालेला निधी मार्च २०१६ अखेर खर्च करणे अत्यावश्यक आहे. पण जिल्ह्यात कोणत्याही ग्रामपंचायतीने कामे सुरू केले नाही.

गोंदिया : शासनाकडून प्राप्त झालेला निधी मार्च २०१६ अखेर खर्च करणे अत्यावश्यक आहे. पण जिल्ह्यात कोणत्याही ग्रामपंचायतीने कामे सुरू केले नाही. त्यामुळे सदर निधी परत जाण्याची पाळी आली असून हा निधी वेळेत खर्च करा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) राजेश डी. बागडे यांनी केले. ग्रामविकास मंत्रालयाने चौदाव्या केंद्रीय वित्त आयोगाचे परिपत्रक काढले. त्यात कामे करण्याबाबत सर्व मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत. २१ डिसेंबर २०१५ ला निघालेल्या या परिपत्रकानुसार बागडे यांनी हे आवाहन केले. जिल्ह्यातील पूर्ण ग्रामपांयतींचे खाते क्रमांक वित्त विभाग जि.प. गोंदियाला प्राप्त झाले. ७ जानेवारी २०१६ ला वित्त विभागाने २८ कोटी रूपये बँक आॅफ इंडियाला पाठविले. बँक व्यवस्थापक आर.एस. रिगनगावकर यांनी सांगितल्याप्रमाणे खाते क्रमांक बरोबर नसल्यामुळे वेळेवर निधी जमा होऊ शकला नाही. पुन्हा खाते क्रमांक मागवून २५ फेब्रुवारी २०१६ ला जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतींना निधी त्यांच्या खात्यावर जमा करून दिला. प्रत्येक ग्रामपंचायतींनी कामांचे नियोजन केले. त्या नियोजनाची तालुका समितीकडून मंजुरी घेऊन ग्रामसभेमार्फत मंजूर करून घेतले. कामाच्या मंजुरीप्रमाणे प्रत्येक कामाचे इस्टीमेट तयार करण्यात येत आहेत. परंतु त्या इस्टीमेटवर गटविकास अधिकारी स्वाक्षरीच करीत नाही. उपमुख्य कार्यकारी अधिकारी बागडे यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, गटविकास अधिकारी तांत्रिक अधिकारी नसल्यामुळे स्वाक्षरीची आवश्यकता नाही. शाखा अयिभंता व उपमुख्य कार्यकारी अभियंता यांची स्वाक्षरी घेऊन कामे करावी. कोणत्याही परस्थितीत निधी परत जाणार नाही. शासनाने ठरवून दिलेल्या नियोजित वेळेतच निधी खर्च व्हायला पाहीजे. बीडीओ यांना पत्र पाठवून नियोजित तारखेपर्यंत कामे पार पाडण्यास सांगितले असून तसे न झाल्यास सरपंच व सचिव जवाबदार ठरतील, असे त्यांनी सांगितले. (जिल्हा प्रतिनिधी)