शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
2
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
3
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
4
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा
5
धक्कादायक! प्रेमी युगुलाने ऑटोत घेतला गळफास; तरुणीचे लग्न ठरल्याने उचलले टोकाचे पाऊल
6
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...
7
मंडीमध्ये ढगफुटीमुळे प्रचंड नुकसान; घरं, रस्ते, पूल गेले वाहून, ४ जणांचा मृत्यू, १६ बेपत्ता
8
गॅस सिलेंडर घेताना या बाबींची करा पडताळणी, टळेल संभाव्य धोका
9
Viral Video: इंदूरचा सुवर्ण महाल!! वॉश बेसिन ते इलेक्ट्रिक स्विच सारं काही २४ कॅरेट सोन्यांने बनवलेलं...
10
बाजारात शांतता! गुंतवणूकदारांची 'वेट अँड वॉच'ची भूमिका; रिलायन्स-एचडीएफसीसह 'हे' शेअर्स वधारले
11
भारतापासून १४ हजार किलोमीटर दूर 'या' देशात राहतात असंख्य भारतीय! दरवर्षी साजरी होते दिवाळी
12
ठरलं! 'या' दिवशी जाहीर होणार सीए २०२५ परीक्षेचा अंतिम निकाल; कधी आणि कुठे पाहायचा?
13
"शेतकऱ्यांसाठी खासदारकीचा राजीनामा तोंडावर फेकला तर निलंबनाचे काय, शेतकऱ्यांसाठी...’’, निलंबनानंतर नाना पटोले आक्रमक 
14
सावत्र बापच बनला हैवान! आईला जीवे मारण्याची धमकी देऊन मुलीवर करत होता बलात्कार; मुलगी गर्भवती होताच...
15
Photo: देशातील नंबर-१ इलेक्ट्रिक स्कूटरचे नवीन मॉडेल लॉन्च, एका चार्जवर १२१ किमी धावणार!
16
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न, ताफ्यावर फेकली बाटली, बाटलीत होतं... 
17
चातुर्मास कधीपासून सुरू होणार? व्रत-वैकल्ये, सण-उत्सवांची रेलचेल; पाहा, महात्म्य अन् मान्यता
18
मी कुठंही असो.. तो मला शोधतोच! 'त्या' चर्चेवर पहिल्यांदाच व्यक्त झाली काव्या मारन
19
‘सासरा मालीश करायला लावायचा, पती नेत्यांसोबत झोपायला पाठवायचा’, पीडितेच्या आरोपांनी खळबळ
20
जळगावच्या मुलीचे कोल्हापूरमध्ये लग्न! बापाने घेतला गळफास; आईला माहिती होती सगळी गोष्ट

३१ मार्चपर्यंत निधी खर्च करा- बागडे

By admin | Updated: March 2, 2016 02:18 IST

शासनाकडून प्राप्त झालेला निधी मार्च २०१६ अखेर खर्च करणे अत्यावश्यक आहे. पण जिल्ह्यात कोणत्याही ग्रामपंचायतीने कामे सुरू केले नाही.

गोंदिया : शासनाकडून प्राप्त झालेला निधी मार्च २०१६ अखेर खर्च करणे अत्यावश्यक आहे. पण जिल्ह्यात कोणत्याही ग्रामपंचायतीने कामे सुरू केले नाही. त्यामुळे सदर निधी परत जाण्याची पाळी आली असून हा निधी वेळेत खर्च करा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) राजेश डी. बागडे यांनी केले. ग्रामविकास मंत्रालयाने चौदाव्या केंद्रीय वित्त आयोगाचे परिपत्रक काढले. त्यात कामे करण्याबाबत सर्व मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत. २१ डिसेंबर २०१५ ला निघालेल्या या परिपत्रकानुसार बागडे यांनी हे आवाहन केले. जिल्ह्यातील पूर्ण ग्रामपांयतींचे खाते क्रमांक वित्त विभाग जि.प. गोंदियाला प्राप्त झाले. ७ जानेवारी २०१६ ला वित्त विभागाने २८ कोटी रूपये बँक आॅफ इंडियाला पाठविले. बँक व्यवस्थापक आर.एस. रिगनगावकर यांनी सांगितल्याप्रमाणे खाते क्रमांक बरोबर नसल्यामुळे वेळेवर निधी जमा होऊ शकला नाही. पुन्हा खाते क्रमांक मागवून २५ फेब्रुवारी २०१६ ला जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतींना निधी त्यांच्या खात्यावर जमा करून दिला. प्रत्येक ग्रामपंचायतींनी कामांचे नियोजन केले. त्या नियोजनाची तालुका समितीकडून मंजुरी घेऊन ग्रामसभेमार्फत मंजूर करून घेतले. कामाच्या मंजुरीप्रमाणे प्रत्येक कामाचे इस्टीमेट तयार करण्यात येत आहेत. परंतु त्या इस्टीमेटवर गटविकास अधिकारी स्वाक्षरीच करीत नाही. उपमुख्य कार्यकारी अधिकारी बागडे यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, गटविकास अधिकारी तांत्रिक अधिकारी नसल्यामुळे स्वाक्षरीची आवश्यकता नाही. शाखा अयिभंता व उपमुख्य कार्यकारी अभियंता यांची स्वाक्षरी घेऊन कामे करावी. कोणत्याही परस्थितीत निधी परत जाणार नाही. शासनाने ठरवून दिलेल्या नियोजित वेळेतच निधी खर्च व्हायला पाहीजे. बीडीओ यांना पत्र पाठवून नियोजित तारखेपर्यंत कामे पार पाडण्यास सांगितले असून तसे न झाल्यास सरपंच व सचिव जवाबदार ठरतील, असे त्यांनी सांगितले. (जिल्हा प्रतिनिधी)