शहरं
Join us  
Trending Stories
1
Municipal Corporation Election: विदर्भात महायुतीचे ठरले! चार महापालिकांत शिंदेसेना, तर दोन ठिकाणी अजित पवारांची राष्ट्रवादी महायुतीत
2
२७ महापालिकांत कुणाचे किती नगरसेवक? गेल्यावेळी भाजपचे...; ४३९ जागा जिंकून काँग्रेस होती तिसऱ्या क्रमांकावर
3
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
4
‘माझा मुलगा वर्षावर मला भेटायला टॅक्सीने यायचा’; पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्रीपदाच्या काळातील किस्सा सांगितला
5
नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ६ विश्वासार्ह गुंतवणूक योजना; तुम्हाला कधीही पैशाची कमतरता भासू देणार नाहीत
6
बांगलादेशात खळबळ! १७ वर्षांनंतर तारिक रहमान मायदेशी परतले; येताच मोहम्मद युनूस यांना केला फोन!
7
संपादकीय: पुन्हा चुकू अन् फुटू नका, राज-उद्धव आणि भाजप...
8
रेल्वे प्रवाशांच्या खिशाला कात्री! आजपासून तिकीट दरवाढ लागू; जाणून घ्या तुमचे तिकीट किती रुपयांनी महागले?
9
मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना देखील मेरी ख्रिसमस; नायजेरियात ISIS वर बॉम्ब हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २६ डिसेंबर २०२५: आनंद व उत्साहाचे वातावरण; कामात यश मिळेल!
11
पीछेहाट कम्युनिस्ट पक्षाची, विचारसरणीची नव्हे!
12
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
13
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
14
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
15
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
16
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
17
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
18
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
19
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
20
डिलिव्हरी बॉयची कमाई किती? पाच वर्षांत कमविले दीड कोटी...
Daily Top 2Weekly Top 5

विकासाला गती केवळ काँग्रेसमुळेच शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 00:27 IST

सत्तेवर नसताना धानाला प्रती क्विंटल ३ हजार रुपये भाव द्या अशी मागणी करणारे भाजप सरकार केंद्र व राज्यात सत्तेवर येऊन चार वर्षांचा कालावधी लोटला आहे. आता त्यांना तीन हजार रुपये प्रती क्विंटल भाव देण्यापासून कोण रोखत आहे.

ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : तुमखेडा येथे प्रचार सभा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : सत्तेवर नसताना धानाला प्रती क्विंटल ३ हजार रुपये भाव द्या अशी मागणी करणारे भाजप सरकार केंद्र व राज्यात सत्तेवर येऊन चार वर्षांचा कालावधी लोटला आहे. आता त्यांना तीन हजार रुपये प्रती क्विंटल भाव देण्यापासून कोण रोखत आहे. हे सरकार जसे दिसते तसे प्रत्यक्षात नसून या सरकारने केवळ शेतकरी व सर्वसामान्य जनतेची दिशाभूल करण्याचेच काम केले. विकासाच्या नावावर मोठ्या गप्पा मारणाऱ्या सरकारने ठोस असे एकतरी काम सांगावे. विकासाला गती केवळ काँग्रेस सरकारच्या काळातच मिळू शकते, असे प्रतिपादन आ.गोपालदास अग्रवाल यांनी केले.भंडारा गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, रि.पा. रिपाई चे अधिकृत उमेदवार मधुकर कुकडे यांच्या प्रचारार्थ गोंदिया तालुक्यातील तुमखेडा येथे आयोजित प्रचार सभेला संबोधित करताना ते बोलत होते. या वेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पुरूषोत्तम कटरे, जि.प.अध्यक्ष सीमा मडावी, आरोग्य व शिक्षण सभापती रमेश अंबुले, महिला व बालकल्याण सभापती लता दोनोडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती चुन्नीलाल बेंद्रे, उपसभापती धनलाल ठाकरे, पंचायत समिती सभापती माधुरी हरिणखेडे, उपसभापती चमनलाल बिसेन, तालुकाध्यक्ष प्रकाश रहमतकर, चिंतामन चौधरी, वाय.पी.रहांगडाले, दिनेश गौतम उपस्थित होते.अग्रवाल म्हणाले, मागील चार वर्षात भाजप सरकारने धानाच्या हमीभावात एक रुपयाने सुध्दा वाढ केली नाही. बोनसची घोषणा केली मात्र अद्यापही ते धान उत्पादक शेतकऱ्यांना मिळालेले नाही. जिल्ह्यात मागील वर्षी कमी प्रमाणात पाऊस झाल्याने दुष्काळी स्थिती आहे. उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होवून देखील शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळाला नाही. दुष्काळग्रस शेतकऱ्यांना हेक्टरी नुकसान भरपाई मिळाली नाही.त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती बिकट आहे. पेट्रोल व डिझेलच्या किंमतीमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने महागाई आकाशाला भिडली आहे. यामुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे.केंद्र व राज्यातील भाजप सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी जनतेला मोठ मोठी आश्वासने दिली. मात्र सत्तेवर येताच या सरकारला सर्वच आश्वासनाचा विसर पडला आहे. त्यामुळे अशा सरकारला धडा शिकविण्याची हीच वेळ आहे.या पोटनिवडणुकीत कुकडे यांच्या पाठीशी उभे राहुन सत्तारुढ सरकारला त्यांची जागा दाखविण्याचे आवाहन अग्रवाल यांनी केले. कटरे म्हणाले भाजप निवडणुकीला जातीवादाचा रंग देत आहे.मात्र मागील चार वर्षात सरकारने शेतकरी, बेरोजगार व सर्वसामान्यांसाठी काहीच केले नाही त्यामुळेच जनताच या सरकारला बाहेरचा रस्ता दाखवेल असे सांगितले.

टॅग्स :Gopaldas Agarwalगोपालदास अग्रवाल