शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

वाहतूक कोंडीवर ‘स्पेशल प्लॅनिंग’

By admin | Updated: October 16, 2016 00:25 IST

व्यापारी शहर असणाऱ्या गोंदियात दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारात आता गर्दी वाढत आहे.

मुख्य चौकांत बॅरीकेट्स : चारचाकी वाहनांना बाजारात प्रवेशबंदी गोंदिया : व्यापारी शहर असणाऱ्या गोंदियात दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारात आता गर्दी वाढत आहे. त्यामुळे आधीच अरूंद असलेल्या रस्त्यांवव वाहतुकीची समस्या उद्भवत आहे. यावर तोडगा म्हणून वाहतूक नियंत्रण शाखेने ‘स्पेशल प्लॅनिंग’ केले आहे. यात मुख्य चौकांत बॅरीकेट्स लावले जाणार आहे. मुख्य म्हणजे चारचाकी वाहनांना बाजारात प्रवेशबंदी केली जाणार आहे. सोमवारपासून (दि.१७) यावर अंमलबजावणी केली जाणार आहे. शहरातील रस्ते अरूंद असून वाहनांची संख्या मात्र दिवसेंदिवस वाढतच आहे. अशात शहरातील बाजार भागात मात्र वाहतुकीच्या कोंडीची समस्या जास्तच उद्भवते. विशेष म्हणजे दिवाळीच्या खरेदीसाठी शहरच काय तर लगतच्या परिसरातील नागरिकही येथील बाजारात येतात. परिणामी बाजारात पाय ठेवायला जागा उरत नाही. अशात वाहकुतीची समस्या निर्माण होते व याचा त्रास नागरिकांना सोसावा लागतो. त्यात एखादी चारचाकी शिरल्यास पूर्ण वाहतूक व्यवस्थाच विस्कटत असल्याचे दरवर्षीचे चित्र आहे. दरवर्षी दिवाळीच्या तोंडावर बाजारात बॅरीगेट्स लावून वाहतुकीची व्यवस्था केली जाते. यात कित्येक चारचाकी वाहनधारक बॅरीगेट्स हटवून आपले वाहन बाजारात शिरवतात. परिणामी बाजारातील वाहतूक विस्कटते व दुचाकी तसेच पायदळ नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. मात्र दिवाळीच्या या गर्दीसाठी यंदा वाहतूक नियंत्रण शाखेने ‘विशेष प्लॅनींग’ केले असून वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. (शहर प्रतिनिधी)बॅरीकेट्सचा करणार वापर दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारात जास्त वाहतुकीची कोंडी होत असल्याने चारचाकी वाहनांना प्रवेशबंदी करून दुचाकींनाच प्रवेश देण्यासाठी शाखेकडून खोजा मस्जीद चौक, आमदार गोपालदास अग्रवाल यांचे निवासस्थान, दुर्गा चौक व श्री टॉकीज चौक या चार जागांवर बॅरीगेट्स लावले जाणार आहेत. यासह प्रत्येक बॅरीगेट्सजवळ दोन कर्मचाऱ्यांची ड्यूटी लावली जाणार आहे. तर गोरेलाला चौकातही दोन कर्मचारी लावले जातील. तसेच बाजारातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी चार कर्मचारी सतत पायदळ पेट्रोलींग करतील. चारचाकी वाहनांसाठी पार्र्किं गचारचाकी वाहनांना बाजारात प्रवेशबंदी करण्यात आली असून या वाहनांना पोलीस ठाण्याच्या मागे, पोलीस ठाणे आवार, स्टेडीयम परिसर व उड्डाणपूल परिसरात पार्कींगची व्यवस्था केली जाणार आहे. सकाळी ९ ते रात्री १० वाजता पर्यंत चारचाकी वाहनांना बाजारात प्रवेशबंदी राहणार आहे. त्यामुळे चारचाकीतून आलेल्या नागरिकांना आपली वाहने निर्धारीत जागांवरच पार्क करून बाजारात खरेदीसाठी जावे लागेल. चारचाकी वाहनांची ही पार्कींग व्यवस्था बघण्यासाठी वाहतूक नियंत्रण शाखेचे कर्मचारी तेथे तैनात राहतील.आता जनजागृतीसह दंड ४चारचाकी वाहनांचा हैदोस थांबविण्यासाठी वाहतूक नियंत्रण शाखेने गणेशोत्सवापासून आतापर्यंत चालानवर भर न देता फक्त जनजागृती करून बाजारातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले. आता मात्र जागृतीसह दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. यांतर्गत चारचाकी वाहनाने बाजारात प्रवेश केल्यास पहिल्यांदा त्याला समजावून त्या वाहनाची नोंद ठेवली जाणार आहे. मात्र त्यानंतरही नियमांचे उल्लंघन झाल्यास नियमानुसार कारवाई केली जाणार आहे.