शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
2
अखेर ठरलं! एल्फिन्स्टन पूल 'या' दिवशी होणार बंद, वाहतूक विभागाने दिली माहिती
3
'एकीला पाठवून आता पश्चात्ताप करतोय, आता दुसरीला त्यांच्याकडे...'; लेकीच्या आठवणीने निक्कीची आईला अश्रू अनावर!
4
तुमच्याकडेही SBI क्रेडिट कार्ड आहे का? आता 'हे' फायदे कायमचे बंद, १ सप्टेंबरपासून नवा नियम लागू
5
तेल व्यवसायाचा King! अमेरिका पाहत राहिला..; भारताने जगाला विकले ५.३५ लाख कोटींचे तेल
6
शाहरुखसोबत अनेक वर्षांनी मिटला वाद, आता सनी देओलने किंग खानच्या लेकाची केली स्तुती
7
'या'वर लागू शकतो मोठा टॅक्स, महाग होऊ शकतात 'या' वस्तू; पुढील आठवड्यात घोषणा होणार?
8
गर्भनिरोधक गोळ्यांचं ऑनलाइन पेमेंट फेल झालं अन् पतीचं 'लफडं' उघडं पडलं; मग पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल
9
पाण्याच्या टाकीत लपवले होते ३९ लाख रुपये! जप्त केलेल्या पैशांचे आणि मालमत्तेचे पुढे काय होते?
10
राहुल गांधी विरुद्ध निवडणूक आयोग! 'मतचोरी'च्या मुद्द्यावर जनतेची साथ कुणाला? सर्व्हेतून धक्कादायक खुलासा
11
कधीही पिऊ नका 'हे' ३ ज्यूस, फायद्याऐवजी होईल नुकसान; डॉक्टरांनीच दिला धोक्याचा इशारा
12
Maharashtra Rain: कमी दाबाच्या पट्टा कसा तयार होतो, त्यामुळे महाराष्ट्रात इतका पाऊस का पडतो?
13
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश
14
सर्वांनी यावेळी तुटून पडा; मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कूच करण्याचा संपूर्ण प्लॅनच सांगितला!
15
मनसेच्या २ माजी नगरसेवकांचा शिंदेसेनेत प्रवेश; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हाती घेतला धनुष्यबाण
16
"मनोज जरांगे, तुम्हाला एवढीच जर खाज आहे, तर ज्या शरद पवारांनी..."; आमदार लाड, दरेकर का भडकले?
17
गणेश चतुर्थी २०२५: गणेशोत्सवात कोणते नियम अवश्य पाळायलाच हवेत? पाहा, शास्त्र काय सांगते...
18
Asia Cup 2025 : विराट-रोहितच्या खांद्यावरून पाकच्या माजी क्रिकेटरचा सूर्या दादावर निशाणा, म्हणे...
19
Ganpati Invitation Messages: गणेश चतुर्थीला मित्र-नातेवाईकांना WhatsApp, Facebook वर हे खास संदेश पाठवून करा स्पेशल आमंत्रण
20
आयुष्य संपवण्यासाठी नदीत उडी मारली पण नंतर मूड बदलला, मदतीसाठी ओरडला अन्...

वाहतूक कोंडीवर ‘स्पेशल प्लॅनिंग’

By admin | Updated: October 16, 2016 00:25 IST

व्यापारी शहर असणाऱ्या गोंदियात दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारात आता गर्दी वाढत आहे.

मुख्य चौकांत बॅरीकेट्स : चारचाकी वाहनांना बाजारात प्रवेशबंदी गोंदिया : व्यापारी शहर असणाऱ्या गोंदियात दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारात आता गर्दी वाढत आहे. त्यामुळे आधीच अरूंद असलेल्या रस्त्यांवव वाहतुकीची समस्या उद्भवत आहे. यावर तोडगा म्हणून वाहतूक नियंत्रण शाखेने ‘स्पेशल प्लॅनिंग’ केले आहे. यात मुख्य चौकांत बॅरीकेट्स लावले जाणार आहे. मुख्य म्हणजे चारचाकी वाहनांना बाजारात प्रवेशबंदी केली जाणार आहे. सोमवारपासून (दि.१७) यावर अंमलबजावणी केली जाणार आहे. शहरातील रस्ते अरूंद असून वाहनांची संख्या मात्र दिवसेंदिवस वाढतच आहे. अशात शहरातील बाजार भागात मात्र वाहतुकीच्या कोंडीची समस्या जास्तच उद्भवते. विशेष म्हणजे दिवाळीच्या खरेदीसाठी शहरच काय तर लगतच्या परिसरातील नागरिकही येथील बाजारात येतात. परिणामी बाजारात पाय ठेवायला जागा उरत नाही. अशात वाहकुतीची समस्या निर्माण होते व याचा त्रास नागरिकांना सोसावा लागतो. त्यात एखादी चारचाकी शिरल्यास पूर्ण वाहतूक व्यवस्थाच विस्कटत असल्याचे दरवर्षीचे चित्र आहे. दरवर्षी दिवाळीच्या तोंडावर बाजारात बॅरीगेट्स लावून वाहतुकीची व्यवस्था केली जाते. यात कित्येक चारचाकी वाहनधारक बॅरीगेट्स हटवून आपले वाहन बाजारात शिरवतात. परिणामी बाजारातील वाहतूक विस्कटते व दुचाकी तसेच पायदळ नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. मात्र दिवाळीच्या या गर्दीसाठी यंदा वाहतूक नियंत्रण शाखेने ‘विशेष प्लॅनींग’ केले असून वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. (शहर प्रतिनिधी)बॅरीकेट्सचा करणार वापर दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारात जास्त वाहतुकीची कोंडी होत असल्याने चारचाकी वाहनांना प्रवेशबंदी करून दुचाकींनाच प्रवेश देण्यासाठी शाखेकडून खोजा मस्जीद चौक, आमदार गोपालदास अग्रवाल यांचे निवासस्थान, दुर्गा चौक व श्री टॉकीज चौक या चार जागांवर बॅरीगेट्स लावले जाणार आहेत. यासह प्रत्येक बॅरीगेट्सजवळ दोन कर्मचाऱ्यांची ड्यूटी लावली जाणार आहे. तर गोरेलाला चौकातही दोन कर्मचारी लावले जातील. तसेच बाजारातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी चार कर्मचारी सतत पायदळ पेट्रोलींग करतील. चारचाकी वाहनांसाठी पार्र्किं गचारचाकी वाहनांना बाजारात प्रवेशबंदी करण्यात आली असून या वाहनांना पोलीस ठाण्याच्या मागे, पोलीस ठाणे आवार, स्टेडीयम परिसर व उड्डाणपूल परिसरात पार्कींगची व्यवस्था केली जाणार आहे. सकाळी ९ ते रात्री १० वाजता पर्यंत चारचाकी वाहनांना बाजारात प्रवेशबंदी राहणार आहे. त्यामुळे चारचाकीतून आलेल्या नागरिकांना आपली वाहने निर्धारीत जागांवरच पार्क करून बाजारात खरेदीसाठी जावे लागेल. चारचाकी वाहनांची ही पार्कींग व्यवस्था बघण्यासाठी वाहतूक नियंत्रण शाखेचे कर्मचारी तेथे तैनात राहतील.आता जनजागृतीसह दंड ४चारचाकी वाहनांचा हैदोस थांबविण्यासाठी वाहतूक नियंत्रण शाखेने गणेशोत्सवापासून आतापर्यंत चालानवर भर न देता फक्त जनजागृती करून बाजारातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले. आता मात्र जागृतीसह दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. यांतर्गत चारचाकी वाहनाने बाजारात प्रवेश केल्यास पहिल्यांदा त्याला समजावून त्या वाहनाची नोंद ठेवली जाणार आहे. मात्र त्यानंतरही नियमांचे उल्लंघन झाल्यास नियमानुसार कारवाई केली जाणार आहे.