शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
2
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
3
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
4
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
5
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
6
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!
7
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
8
इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरने पत्नीसह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
9
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!
10
Swami Samartha: स्वामी कृपा व्हावी वाटत असेल तर त्यांना नावडणारी 'ही' गोष्ट ताबडतोब सोडा!
11
कहाणी १९६५ च्या युद्धाची! आदमपूर एअरबेसवर कब्जा करण्यासाठी उतरले ५५ पाकिस्तानी कमांडो, १२ ठार तर बाकी...
12
मुकेश अंबानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; आखाती देशात किती पसरलाय व्यवसाय?
13
IAS-IPS बनण्याची सूवर्णसंधी; UPSC ने जारी केले परीक्षांचे वेळापत्रक, जाणून घ्या संपूर्ण माहिती...
14
Sensex मध्ये १३०० तर Nifty मध्ये ४०० अंकांपेक्षा अधिक तेजी, काय आहे तेजीमागचं कारण?
15
राजस्थानात पाकिस्तान सीमेपासून १५ किमी दूर कोसळलेला ड्रोन सापडला; बीएसएफकडून चौकशी सुरु
16
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश
17
'पाकिस्तानची अवस्था घाबरलेल्या कुत्र्यासारखी', अमेरिकेतील माजी अधिकाऱ्याने पार इज्ज काढली
18
अवघ्या २३ वर्षांच्या मुलीने लावली पाकिस्तान-बांगलादेशच्या नात्यात आग! राजदूतांना काढावा लागला पळ
19
संकष्ट चतुर्थी २०२५: एकदंत संकष्ट चतुर्थी असणार खास, 'या' राशींची पूर्ण होणार धन-संपत्तीची आस!

पूर्व गोंदियासाठी विशेष विद्युत लाईन

By admin | Updated: April 13, 2016 02:02 IST

उन्हाच्या तिव्रतेसोबतच विजेचा लपंडावही वाढत चालला आहे. ऐन उन्हाळ््यात विजेच्या या खेळीमुळे शहरवासीय त्रस्त झाले आहेत.

१५ दिवस चालेल काम : भर उन्हाळ्यात सिव्हील लाईनमध्ये विजेचा लपंडावकपिल केकत गोंदियाउन्हाच्या तिव्रतेसोबतच विजेचा लपंडावही वाढत चालला आहे. ऐन उन्हाळ््यात विजेच्या या खेळीमुळे शहरवासीय त्रस्त झाले आहेत. यातच शहरातील सिव्हील लाईन्स परिसरात आजघडीला जास्त प्रमाणात विजेचा लपंडाव सुरू आहे. पूर्व गोंदियाकडील भागासाठी वीज कंपनीकडून विशेष लाईन टाकली जात असून हे काम पूर्ण होईपर्यंत, म्हणजेच एप्रिल अखेरपर्यंत नागरिकांना विजेच्या लपंडावाचा सामना करावा लागणार आहे.वर्षभरात इतर ऋतूत वीज पुरवठा खंडीत झाल्यास तेवढा त्रास होत नाही. मात्र उन्हाळ््यात वीज गेली तर अगोदर वीज वितरण कंपनीच्या नावाने लोक बोटे मोडू लागतात. उन्हाळ््यात विजेची मागणी व वापर वाढत असल्यानेही याच दिवसांत जास्त प्रमाणात बिघाड येतात. वितरण व्यवस्थेत आलेल्या बिघाडाचा फटका सामान्य नागरिकांना सहन करावा लागतो. आजघडीला जिल्हा भारनियमनमुक्त असला तरी वेळीअवेळी वीज पुरवठा खंडीत होण्याचे प्रकार सुरू च आहेत. त्यामुळे हे कोणते भारनियमन? असा प्रश्न नागरिकांना पडत आहे. यातही शहरातील सिव्हील लाईन्स परिसरात हे प्रकार जास्त प्रमाणात घडत आहेत. त्यामुळे या भागातील नागरिकांना जास्त त्रास सहन करावा लागत आहे. पूर्व गोंदियातील काका चौक, गोविंदपूर, छोटा गोंदिया, जनता कॉलनी, शास्त्री वॉर्ड, पंचायत समिती कॉलनी आदि भागांना सध्या रावणवाडी व गोरेगाव लाईनवरून वीज पुरवठा केला जात आहे. अशात या दोन लाईनवर कुठेहीेकाही नादुरूस्ती झाल्यास शहरातील सिव्हील लाईन्स परिसरातील वीज पुरवठा खंडीत होत आहे. या भागात वर्ग एक दर्जाच्या अधिकाऱ्यांसह अनेक प्रतिष्ठितांची घरे आहेत. विशेष म्हणजे, या भागासाठी विशेष लाईन टाकण्याचे काम सुरू असून लवकरच हे काम पूर्ण झाल्यास वीजेच्या या समस्येपासून या भागाची सुटका होणार आहे. उर्वरीत शहराला दोन विशेष लाईनवरून पुरवठा केला जात असल्याने उर्वरीत शहरात वीज पुरवठा खंडीत होण्याची समस्या कमी आहे. एप्रिल महिना मेंटेनन्सचावीज वितरण कंपनीत एप्रिल महिना हा देखभाल-दुरूस्तीचा (मेंटनन्सचा) असतो. याला ‘प्री मान्सून मेंटनन्स’ म्हटले जाते. या काळात वीज विभागाकडून झाड कापणे, रोहीत्राची देखभाल-दुरूस्ती, लघूदाब व उच्चदाव लाईन देखभाल-दुरूस्ती केली जाते. त्यानुसार आताही जिल्ह्यात ही सर्व कामे सुरू आहेत. कधी ही कामे वीज पुरवठा सुरू असताना करावी लागतात. कधी ही कामे वीज पुरवठा बंद करून करावी लागतात. विशेष म्हणजे दुरूस्तीच्या कामांत थोडीही चूक झाल्यास त्याची शिक्षा जीवावरच बेतते. त्यामुळे वीज पुरवठा बंद करूनच ही कामे करणे जास्त सुरक्षित असते. या शिवाय वीजेचा दाब वाढल्यानेही वितरण व्यवस्थेत नादुरूस्ती येत असून त्यामुळेही वीज पुरवठा खंडीत होत असतो.असा होतो वीज पुरवठाजवळील एमआयडीसी येथे १३२ केव्ही उपकेंद्रातून चार वाहिन्या निघाल्या आहेत. यात एक कारंजा मार्गे गोरेगावसाठी, दुसरी रावणवाडीसाठी तर उर्वरीत दोन वाहिन्यांतून सुर्याटोला उपकेंद्राच्या माध्यमातून शहराला वीज पुरवठा केला जातो. यात सिव्हील लाईन्स परिसरातील गोविंदपूर, छोटा गोंदिया, जनता कॉलनी, शास्त्री वॉर्ड, पंचायत समिती कॉलनी आदि भागांसाठी विशेष व्यवस्था नसल्याने सध्या या भागासाठी एमआयडीसीवरून विशेष लाईन टाकण्याचे काम सुरू आहे. ही लाईन एमआयडीसीवरून निघणार असून कुडवा नाका, बालाघाट रोड टी-पॉईंट, हड्डीटोली रेल्वे चौकी मार्गे भीमघाट उपकेंद्राला जोडली जाणार आहे. या लाईनचे काम येत्या ३० एप्रिलपर्यंत पूर्ण होणार असल्याचा अंदाज आहे. त्यानंतर सिव्हील लाईन्स परिसरात या भागातील वीज पुरवठा वारंवार खंडीत होण्याची समस्या संपणार आहे. मात्र तोपर्यंत या परिसराला गोरेगाव व रावणवाडी फिडरवरून पुरवठा केला जात आहे.