शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

तालुक्यात पेरण्या खोळंबल्या

By admin | Updated: July 7, 2014 23:38 IST

आर्द्रा नक्षत्रातही पावसाने पाठ फिरविल्याने सडक/अर्जुनी तालुक्यातील शेतकरी हतबल झाल्याचे दिसत आहे. मृग नक्षत्रात दोन ते तीन वेळा पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी बांधवानी

शेतकरी हतबल : दुबार पेरणीची पाळी, आवत्या पध्दतीचा वापरराजेश मुनिश्वर - सडक/अर्जुनीआर्द्रा नक्षत्रातही पावसाने पाठ फिरविल्याने सडक/अर्जुनी तालुक्यातील शेतकरी हतबल झाल्याचे दिसत आहे. मृग नक्षत्रात दोन ते तीन वेळा पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी बांधवानी पऱ्हे करण्याचा सपाटा सुरू केला होता. त्यात मिळेल त्या संकरीत व सुधारित धानाचे वाण वापरून पऱ्हे भरले. तालुक्यात १० हजार २०० हेक्टर क्षेत्रात सिंचनाची सोय आहे. पण कोरडवाहू नऊ हजार ५९६ हेक्टर क्षेत्रातील पऱ्हे धानाची वाट लागली आहे. बहुतेक ठिकाणचे पऱ्हे वाळायला लागले आहे. यावर्षी बहुतेक शेतकऱ्यांना आता आवत्या पध्दतीचा वापर केल्याशिवाय पर्याय राहणार नाही. रोवणी पध्दतीने पूरक म्हणून दोन ते तीन बांध्या आता आवत्याच टाकावे लागेल, असे चित्र संपूर्ण तालुक्याला पहावयास मिळत आहे. तालुक्यात २२ हजार ८६७ हेक्टर क्षेत्र या पिकाखाली येणारे क्षेत्र आहे. रेंगेपार, कोकणा/जमी., मोगरा, खडकी/ बाम्हणी, सौंदड, कोसमतोंडी, पांढरी, चिरचाडी, मालीजुंगा, शेंडा, पूतळी, डोंगरगाव/डेपो, देवपायली, चिखली, वडेगाव, घोटी, डुंडा, मुरपार, हेटी, बोपाबोडी आदी ठिकाणी पंपाच्या भरवश्यावर काही निवडक शेतकऱ्यांनी रोवणीला सुरूवात केली आहे. पण पावसाच्या हुलकावणीमुळे रोवणी पुढे करावी की नाही, या विवंचनेत ते पडले असल्याची माहिती प्रगतीशील शेतकरी तुकाराम लंजे यांनी दिली आहे. मागील वर्षी पावसाचे पाणी बऱ्यापैकी आल्यामुळे पाण्याची पातळी जमिनीत खोलवर गेली होती. त्यामुळे यावर्षी जून महिन्यात पंपाचे पाणी सिंचनासाठी कमी जास्त प्रमाणात पूरत आहे. जुलै महिन्याच्या सुरूवातीच्या काळात पंपाचे पाईप १५० ते २०० फूट आत टाकल्यावरच पाणी पूरत असल्याची माहिती शेतकरी देत आहेत. पण वीजेच्या लंपडावामुळे पऱ्ह्यासाठीसुध्दा पाणी देणे म्हणजे तारेवरची कसरतच करावी लागत आहे. येत्या चार दिवसात निसर्गाचे पाणी न आल्यास दुबार पेरणीची दाट शक्यता असल्याची माहिती कोकणा/जमी. चे प्रगतीशील शेतकरी खेमराज भेंडारकर यांनी दिली आहे. आता फक्त येरे येरे पावसा, तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा, पाऊस आला मोठा म्हणण्याची वेळ राुहिली आहे.