शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

नोटीस बजाविताच सुरू झाली धानाची उचल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:19 IST

गेल्या खरीप हंगामात जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाने एकूण ५० लाख क्विंटल धानाची शासकीय धान खरेदी केंद्रावरून ...

गेल्या खरीप हंगामात जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाने एकूण ५० लाख क्विंटल धानाची शासकीय धान खरेदी केंद्रावरून धान खरेदी केली होती. या धानाची उचल करून भरडाई करण्यासाठी राईस मिलर्ससह करार केला जातो; मात्र धानाच्या भरडाईचे दर, थकीत वाहतूक भाडे, धानाची गुणवत्ता, प्राेत्साहन अनुदान या मुद्दांना घेऊन राईस मिलर्सने शासकीय धानाची भरडाई करण्यास नकार दिला होता; मात्र शासनाने यावर तोडगा काढण्यास तब्बल चार महिन्याचा कालावधी लावला. त्यामुळे शासकीय धान खरेदी केंद्रावर खरेदी केलेला लाखो क्विंटल धान गोदामांमध्येच पडून होता. रब्बीतील धान खरेदीची वेळ आली तरी गोदाम रिकामे न झाल्याने धान खरेदीत समस्या निर्माण झाली होती. अखेर यावर तोडगा काढल्यानंतर राईस मिलर्सने धानाची उचल करण्यास सुरुवात केली; पण उचल फार संथ गतीने सुरू होती. आतापर्यंत केवळ उघड्यावरील ९ लाख क्विंटल धानाची उचल झाली होती, त्यामुळे गोदामांमध्ये ३० लाख क्विंटलहून अधिक धान पडला होता. दरम्यान, बिकट समस्या निर्माण झाल्याने अन्न व नागरी पुरवठा विभागाने राईस मिलर्सवर कारवाई करण्याचे संकेत दिले. त्यानंतर जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने १७५ राईस मिलर्सला धानाची उचल त्वरित न केल्यास कारवाई करण्याची नोटीस बजावली होती. त्यानंतर राईस मिलर्सने आता युद्ध पातळीवर धानाची उचल करण्यास सुरुवात केली आहे. एकाच दिवशी जवळपास ७० हजार क्विंटल धानाची उचल झाल्याची माहिती आहे.

..................

मुदतवाढीच्या प्रस्तावासाठी केंद्राच्या आदेशाची प्रतीक्षा

रब्बी हंगामातील धान खरेदीची मुदत ३० जूनला संपत आहे; मात्र आतापर्यंत केवळ ४ लाख ३३ हजार क्विंटल धान खरेदी झाली असून, अजून २० लाख क्विंटल धान खरेदी होणे शिल्लक आहे. त्यामुळे धान खरेदीला १५ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव राज्य शासनाच्या माध्यमातून केंद्राकडे पाठविण्यात आला आहे. त्याला मंजुरी मिळताच धान खरेदीची प्रक्रिया सुरू राहणार आहे.

..........

१२९ कोटी रुपयांची धान खरेदी

रब्बी हंगामात आतापर्यंत ४ लाख ३३ हजार क्विंटल धान खरेदी करण्यात आली आहे. खरेदी केलेल्या एकूण धानाची किमत ही १२९ कोटी ६८ लाख रुपये असून, यापैकी ९६ कोटी रुपयांचा निधी सोमवारी जिल्हा मार्केटिंग फेडरेशनला प्राप्त झाला आहे. त्याचे चुकारे करण्याची प्रक्रिया मंगळवारपासून सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत ३१३८१ शेतकऱ्यांनी धानाची विक्री केली आहे.