शहरं
Join us  
Trending Stories
1
'या' माशांना वाचवण्यासाठी बांगलादेशनं उतरवलं सैन्य दल; बंगालच्या खाडीत पाठवल्या १७ युद्धनौका
2
‘कोस्टल’वर थेट १४० चा हायस्पीड: ...तर मग गुन्हाच होईल दाखल; वाहतूक पोलिसांकडून दिवसाला ५०० ई-चालानची कारवाई
3
FD करुन तुम्ही कधीही श्रीमंत होणार नाही? CA ने दिला इशारा, म्हणाले खऱ्या कमाईसाठी गुंतवणूक धोरण बदला
4
Video - अरे बापरे! ऑर्डर केला iPhone 16; बॉक्स उघडताच...; ऑनलाईन खरेदीत अजब भानगड
5
Tata Capital IPO: प्रतीक्षा संपली! तुमच्या खिशात आहेत का १४,९९६ रुपये? तर बनू शकता टाटांच्या कंपनीचे प्रॉफिट पार्टनर
6
इवलीशी मुंबई झाली महाकाय ! त्या त्या भागानुसार प्रति स्क्वेअर फुटाचा दर काय... पहाल तर...
7
"प्यार मे सौदेबाजी...", अरबाज खान दुसऱ्यांदा बाबा झाल्यानंतर मलायका अरोराची क्रिप्टिक पोस्ट
8
सोनम वांगचुक यांच्या अटकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, पत्नीने दाखल केली याचिका
9
Kantara Chapter 1: साऊथने पुन्हा एकदा करून दाखवलं! फक्त ४ दिवसांत 'कांतारा'ने कमावले ३०० कोटी
10
पतीच्या मृत्यूनंतर पुन्हा जोडीदाराची इच्छा पडली महागात; मॅट्रिमोनियल साइटवरून शिक्षिकेला कोट्यवधींचा गंडा!
11
Post Office Scheme: दर महिन्याला होईल ₹६१,००० ची कमाई; जबरदस्त आहे ही सरकारी स्कीम, कोट्यधीशही बनवेल
12
Jaipur Hospital Fire: जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
13
Share Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, Nifty २४,९१० च्या वर; सरकारी बँकांच्या शेअर्समध्ये मोठी तेजी
14
Jaipur Hospital Fire: '२० मिनिटांपूर्वी आगीची माहिती दिली, पण डॉक्टर पळून गेले'; SMS रुग्णालयातील प्रत्यक्षदर्शींचा धक्कादायक दावा
15
Video:...तर भारताच्या 'या' खेळाडूला मारायचंय; पाकिस्तानी स्पिनर अबरार अहमदचं विधान चर्चेत
16
पती अन् दोन मुलांना सोडून शेजाऱ्यासोबत सुरू होतं अफेअर; 'ओयो'मध्ये प्रियकर गर्लफ्रेंडसोबत दिसला अन्...
17
या राज्यात ५० किमी वेगाने वारे वाहतील, मुसळधार पाऊस आणि गारपिटीचा इशारा
18
देशातील राष्ट्रीय चलनातून चार शून्य हटवले जाणार; इराणचा ऐतिहासिक निर्णय, काय होणार बदल?
19
उत्खनन क्षेत्रात छत्तीसगडची ऐतिहासिक झेप; खनिज महसूल २५ वर्षांत ३४ पटीने वाढला!
20
त्यानं स्वतःच कापला प्रायव्हेट पार्ट अन् रचला हल्ल्याचा बनाव! पोलिसांना गोंधळात टाकणारा प्रकरणाचा 'असा' झाला खुलासा

आचारसंहिता शिथिल होताच विकासकामांना आला ऊत

By admin | Updated: May 13, 2014 23:38 IST

लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात लागू असलेली आदर्श आचारसंहिता २५ एप्रिलपासून शिथिल करण्यात आली आहे. त्यामुळे पेंडिंग पडून असलेल्या विकासकामांना पुन्हा ऊत आल्याचे चित्र बघावयास मिळत आहे

गोंदिया : लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात लागू असलेली आदर्श आचारसंहिता २५ एप्रिलपासून शिथिल करण्यात आली आहे. त्यामुळे पेंडिंग पडून असलेल्या विकासकामांना पुन्हा ऊत आल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. कोठे भूमिपूजन तर कोठे लोकार्पण या कामांत विद्यमान जनप्रतिनिधींचे शेड्यूल व्यस्त असल्याचे दिसून येत आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी ५ मार्चपासून आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली. त्यामुळे नगर परिषद, पंचायत समिती, जिल्हा परिषद सर्वच विभागातील विकासकामांना, बैठकींना बंदी घालण्यात आली होती. राज्यात तीन टप्यांत मतदान घेण्यात आले. त्यानुसार २४ एप्रिल रोजी राज्यातील मतदानाची प्रक्रिया संपल्यानंतर आचारसंहिता शिथिल होईल, हे अपेक्षित होते. यानुसार २५ एप्रिल रोजी राज्यातील आचारसंहिता शिथिल करण्यात आली. मात्र आता राज्यातील आचारसंहिता शिथिल झाल्याने पुन्हा नेत्यांचे फावले आहे.

त्याचे असे की, लोकसभेच्या निवडणुका तर सरल्या चार महिन्यांनी पुन्हा विधानसभेच्या निवडणुका लागणार आहेत. अशात विद्यमान व भावी आमदार आपली तयारी करण्यास मुक्त झाले आहेत. विद्यमान आमदार आता आपल्या निधीतील विकासकामे सुरू करून क्षेत्रातील मतदारांना इम्प्रेस करू शकणार तर भावी आमदार जनसंपर्क करून आपणही रिंगणात असल्याचे मतदारांना सांगू शकतील. त्यामुळे सर्वत्र नेतेमंडळींची लगबग दिसून येत आहे.

सध्या या नेतेमंडळींना एक मुद्दा चांगला मिळाला आहे. तो म्हणजे धान खरेदी केंद्र सुरू करण्याचा. राज्य शासनाने शासकीय धान खरेदी केंद्र सुरू केले नसल्याने शेतकर्‍यांचे हितैशी धान खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी करीत आहेत. तर काही आंदोलनाचा नगाडा पिटत आहेत. शिवाय विद्यमान आमदारांनी पेंडिंग पडून असलेल्या विकास कामांना पुन्हा सुरूवात केली आहे.

भूमिपूजन व लोकार्पण सध्या जोमात सुरू आहेत. शहरातही विकास कामे जोमावर सुरू झाली आहेत. शहरातील कित्येक भागांतील रस्ते दुरूस्ती सुरू झाली आहे. नेहरू चौक, आंबेडकर चौक, मामा चौक, बाजार भाग यासह सुमारे सर्वच भागांत कामे केली जात आहेत. यावरून सध्या विकासकामांना ऊत आल्याचे दिसून येते. मात्र मतदार आता शहाणा झाला आहे. हे सर्व कशासाठी हे त्याला चांगलेच ठाऊक आहे.

(शहर प्रतिनिधी)