शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

आचारसंहिता शिथिल होताच विकासकामांना आला ऊत

By admin | Updated: May 13, 2014 23:38 IST

लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात लागू असलेली आदर्श आचारसंहिता २५ एप्रिलपासून शिथिल करण्यात आली आहे. त्यामुळे पेंडिंग पडून असलेल्या विकासकामांना पुन्हा ऊत आल्याचे चित्र बघावयास मिळत आहे

गोंदिया : लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात लागू असलेली आदर्श आचारसंहिता २५ एप्रिलपासून शिथिल करण्यात आली आहे. त्यामुळे पेंडिंग पडून असलेल्या विकासकामांना पुन्हा ऊत आल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. कोठे भूमिपूजन तर कोठे लोकार्पण या कामांत विद्यमान जनप्रतिनिधींचे शेड्यूल व्यस्त असल्याचे दिसून येत आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी ५ मार्चपासून आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली. त्यामुळे नगर परिषद, पंचायत समिती, जिल्हा परिषद सर्वच विभागातील विकासकामांना, बैठकींना बंदी घालण्यात आली होती. राज्यात तीन टप्यांत मतदान घेण्यात आले. त्यानुसार २४ एप्रिल रोजी राज्यातील मतदानाची प्रक्रिया संपल्यानंतर आचारसंहिता शिथिल होईल, हे अपेक्षित होते. यानुसार २५ एप्रिल रोजी राज्यातील आचारसंहिता शिथिल करण्यात आली. मात्र आता राज्यातील आचारसंहिता शिथिल झाल्याने पुन्हा नेत्यांचे फावले आहे.

त्याचे असे की, लोकसभेच्या निवडणुका तर सरल्या चार महिन्यांनी पुन्हा विधानसभेच्या निवडणुका लागणार आहेत. अशात विद्यमान व भावी आमदार आपली तयारी करण्यास मुक्त झाले आहेत. विद्यमान आमदार आता आपल्या निधीतील विकासकामे सुरू करून क्षेत्रातील मतदारांना इम्प्रेस करू शकणार तर भावी आमदार जनसंपर्क करून आपणही रिंगणात असल्याचे मतदारांना सांगू शकतील. त्यामुळे सर्वत्र नेतेमंडळींची लगबग दिसून येत आहे.

सध्या या नेतेमंडळींना एक मुद्दा चांगला मिळाला आहे. तो म्हणजे धान खरेदी केंद्र सुरू करण्याचा. राज्य शासनाने शासकीय धान खरेदी केंद्र सुरू केले नसल्याने शेतकर्‍यांचे हितैशी धान खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी करीत आहेत. तर काही आंदोलनाचा नगाडा पिटत आहेत. शिवाय विद्यमान आमदारांनी पेंडिंग पडून असलेल्या विकास कामांना पुन्हा सुरूवात केली आहे.

भूमिपूजन व लोकार्पण सध्या जोमात सुरू आहेत. शहरातही विकास कामे जोमावर सुरू झाली आहेत. शहरातील कित्येक भागांतील रस्ते दुरूस्ती सुरू झाली आहे. नेहरू चौक, आंबेडकर चौक, मामा चौक, बाजार भाग यासह सुमारे सर्वच भागांत कामे केली जात आहेत. यावरून सध्या विकासकामांना ऊत आल्याचे दिसून येते. मात्र मतदार आता शहाणा झाला आहे. हे सर्व कशासाठी हे त्याला चांगलेच ठाऊक आहे.

(शहर प्रतिनिधी)