शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
2
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
3
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
4
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: ईश्वरपूरमध्ये जयंत पाटलांचा महायुतीला मोठा धक्का; एका क्लिकवर वाचा निकाल
6
क्रूरतेचा कळस! कोंबडा बनवलं, नाक घासायला लावलं...; कचरा वेचणाऱ्या मुलांना अमानुषपणे मारलं
7
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
8
Jawhar Nagar Parishad Election Result 2025: जव्हार नगरपरिषदेवर भाजपचा भगवा, १४ जागांवर उधळला गुलाल, पूजा उदावंत नगरध्यक्ष; शिंदे सेनेला फक्त एवढ्या जागा
9
बँका तुम्हाला क्रेडिट कार्ड घेण्यासाठी का आग्रह धरतात? कुठून होते त्यांची खरी कमाई?
10
Newasa Nagar Panchayat Elections Results 2025 : नेवासामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा नगराध्यक्ष, तर शंकरराव गडाखांचा दबदबा कायम
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
12
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
13
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
14
इराणवर मोठ्या हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल? नेतन्याहू घेणार डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; इराणी अधिकारी म्हणतात...
15
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
16
Video - फिरायला निघाले, ट्रेनमध्ये भांडले अन् साता जन्माची साथ २ महिन्यांत सुटली, कपलसोबत काय घडलं?
17
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
18
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
19
BSF काँस्टेबल भरतीत माजी अग्निवीरांना 50% आरक्षण; वयोमर्यादेतही मोठी सवलत, केंद्राचा निर्णय
20
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

थोडी खुशी, थोडा गम..

By admin | Updated: March 1, 2016 01:09 IST

केंद्र सरकारने सोमवारी सादर केलेल्या अर्थसंकल्पाचे अनेक स्तरातून स्वागत झाले.

केंद्रीय अर्थसंकल्प : राजकीय, सामाजिक क्षेत्रात संमिश्र प्रतिक्रियागोंदिया : केंद्र सरकारने सोमवारी सादर केलेल्या अर्थसंकल्पाचे अनेक स्तरातून स्वागत झाले. मात्र या अर्थसंकल्पात सर्वसामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी ठोस उपाययोजना नसून त्यांच्यावर भुर्दंड पडणार असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.सर्वसामान्यांसाठी निराशाजनकहा अर्थसंकल्पात सर्वसामान्यांसाठी दिलासा देणारा नाही. करपात्र उत्पन्न मर्यादा वाढविली नसल्यामुळे सर्वांच्या खिशाला कात्री लागणार आहे. रोजगार निर्मितीच्या दृष्टीने ठोस पाऊल उचलल्याचे दिसून येत नाही. २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न सध्याच्या उत्पन्नापेक्षा दुप्पट करणार असे पंतप्रधान मोदी म्हणाले. सर्व्हेक्षण अहवालानुसार शेतकऱ्यांचे सध्याचे वार्षिक उत्पन्न केवळ २२ हजार रुपये आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न जर पुढील ६ वर्षात ४४ हजार होणार असेल तर ही स्थिती काही चांगली असेल असे म्हणता येणार नाही.- राजेंद्र जैन, विधान परिषद सदस्य, गोंदिया-भंडाराशेतकऱ्यांचा विचार व्हायला हवा होताशेतकऱ्यांसाठी क्रॉप इन्शुरन्स स्कीम अतिउत्तम आहे. परंतु त्याचबरोबर विदर्भातील शेतकऱ्यांसाठी पाण्याची सोय, रासायनिक खते आणि औषधे यांच्यासाठी एमआरपीचा कायदा बदलणे गरजेचे होते. शेतमालाच्या मार्केटींगची पण विशेष व्यवस्था करायला हवी. शेतकऱ्याला परवडेल असे बाजारभाव निश्चित केल्यास शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील. पाणी, जमीन आणि त्याचबरोबर शेणखत, रासायनिक खत सोडून अन्य बाबतीत जर लक्ष घातल्या गेले तर पाच वर्षात विदर्भातल्या शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होईल. त्यादृष्टीने सरकारने विचार करणे अपेक्षित आहे.-महादेवराव शिवणकरमाजी अर्थमंत्री, महाराष्ट्र शासनशेतकऱ्यांसाठी निराशाजनक अर्थसंकल्पकेंद्र सरकारने आधिच शेतकऱ्यांची मोठी नाराजी ओढवून घेतली आहे. आता या अर्थसंकल्पात तरी त्यांना दिलासा मिळेल असा काही निर्णय घेतला जाईल असे अपेक्षित होते. मात्र तसे झाले नाही. - गंगाधर परशुरामकरगटनेता, राष्ट्रवादी काँग्रेस, जि.प.गोंदियाअर्थसंकल्प घालणार महागाईत भरकेंद्र सरकारने सामान्य माणसांना दिलासा देण्याऐवजी करात वाढ केली. हवाई आणि रेल्वे वाहतूक महाग झाली. केबल टिव्ही, फ्रिज महाग झाले. सर्वसामान्यांसाठी संपर्काचे माध्यम असणारे मोबाईल महाग होणार. एकूणच महागाईत भर घालणाला अर्थसंकल्प आहे.- प्रा.डॉ.माधुरी नासरेअध्यक्ष, महिला अर्बन बँकअर्थसंकल्पाने केली सर्वसामान्यांची निराशासामान्य नागरिकांना आधीच अच्छे दिन येण्याचे स्वप्न दाखवत निराश करण्यात आले. आता पुढेही दिलासा मिळण्याऐवजी आणखी निराश व्हावे लागणार याचे संकेत या अर्थसंकल्पाने दिल्याचे दिसून येत आहे.- सहेसराम कोरोटेमहामंत्री, जिल्हा काँग्रेस कमिटीग्रामीण अर्थव्यवस्थेला मिळणार गतीग्रामीण भागातील रस्ते, रोजगार हमीची कामे यासाठी सरकारने मोठा निधी दिला आहे. घर बांधकामावरील कर हटविला. मात्र आयकराची मर्यादा वाढविणे गरजेचे होते.- अविनाश ठाकूरविकास अधिकारी, एलआयसी