शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
2
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
3
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
4
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
5
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
6
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
7
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
8
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
9
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
10
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
11
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
12
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
13
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
14
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
15
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
16
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
17
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
18
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
19
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
20
संजय शिरसाटांचा उपमुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप; अजित पवारांनी एका वाक्यात उत्तर दिले...

थोडी खुशी, थोडा गम..

By admin | Updated: March 1, 2016 01:09 IST

केंद्र सरकारने सोमवारी सादर केलेल्या अर्थसंकल्पाचे अनेक स्तरातून स्वागत झाले.

केंद्रीय अर्थसंकल्प : राजकीय, सामाजिक क्षेत्रात संमिश्र प्रतिक्रियागोंदिया : केंद्र सरकारने सोमवारी सादर केलेल्या अर्थसंकल्पाचे अनेक स्तरातून स्वागत झाले. मात्र या अर्थसंकल्पात सर्वसामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी ठोस उपाययोजना नसून त्यांच्यावर भुर्दंड पडणार असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.सर्वसामान्यांसाठी निराशाजनकहा अर्थसंकल्पात सर्वसामान्यांसाठी दिलासा देणारा नाही. करपात्र उत्पन्न मर्यादा वाढविली नसल्यामुळे सर्वांच्या खिशाला कात्री लागणार आहे. रोजगार निर्मितीच्या दृष्टीने ठोस पाऊल उचलल्याचे दिसून येत नाही. २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न सध्याच्या उत्पन्नापेक्षा दुप्पट करणार असे पंतप्रधान मोदी म्हणाले. सर्व्हेक्षण अहवालानुसार शेतकऱ्यांचे सध्याचे वार्षिक उत्पन्न केवळ २२ हजार रुपये आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न जर पुढील ६ वर्षात ४४ हजार होणार असेल तर ही स्थिती काही चांगली असेल असे म्हणता येणार नाही.- राजेंद्र जैन, विधान परिषद सदस्य, गोंदिया-भंडाराशेतकऱ्यांचा विचार व्हायला हवा होताशेतकऱ्यांसाठी क्रॉप इन्शुरन्स स्कीम अतिउत्तम आहे. परंतु त्याचबरोबर विदर्भातील शेतकऱ्यांसाठी पाण्याची सोय, रासायनिक खते आणि औषधे यांच्यासाठी एमआरपीचा कायदा बदलणे गरजेचे होते. शेतमालाच्या मार्केटींगची पण विशेष व्यवस्था करायला हवी. शेतकऱ्याला परवडेल असे बाजारभाव निश्चित केल्यास शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील. पाणी, जमीन आणि त्याचबरोबर शेणखत, रासायनिक खत सोडून अन्य बाबतीत जर लक्ष घातल्या गेले तर पाच वर्षात विदर्भातल्या शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होईल. त्यादृष्टीने सरकारने विचार करणे अपेक्षित आहे.-महादेवराव शिवणकरमाजी अर्थमंत्री, महाराष्ट्र शासनशेतकऱ्यांसाठी निराशाजनक अर्थसंकल्पकेंद्र सरकारने आधिच शेतकऱ्यांची मोठी नाराजी ओढवून घेतली आहे. आता या अर्थसंकल्पात तरी त्यांना दिलासा मिळेल असा काही निर्णय घेतला जाईल असे अपेक्षित होते. मात्र तसे झाले नाही. - गंगाधर परशुरामकरगटनेता, राष्ट्रवादी काँग्रेस, जि.प.गोंदियाअर्थसंकल्प घालणार महागाईत भरकेंद्र सरकारने सामान्य माणसांना दिलासा देण्याऐवजी करात वाढ केली. हवाई आणि रेल्वे वाहतूक महाग झाली. केबल टिव्ही, फ्रिज महाग झाले. सर्वसामान्यांसाठी संपर्काचे माध्यम असणारे मोबाईल महाग होणार. एकूणच महागाईत भर घालणाला अर्थसंकल्प आहे.- प्रा.डॉ.माधुरी नासरेअध्यक्ष, महिला अर्बन बँकअर्थसंकल्पाने केली सर्वसामान्यांची निराशासामान्य नागरिकांना आधीच अच्छे दिन येण्याचे स्वप्न दाखवत निराश करण्यात आले. आता पुढेही दिलासा मिळण्याऐवजी आणखी निराश व्हावे लागणार याचे संकेत या अर्थसंकल्पाने दिल्याचे दिसून येत आहे.- सहेसराम कोरोटेमहामंत्री, जिल्हा काँग्रेस कमिटीग्रामीण अर्थव्यवस्थेला मिळणार गतीग्रामीण भागातील रस्ते, रोजगार हमीची कामे यासाठी सरकारने मोठा निधी दिला आहे. घर बांधकामावरील कर हटविला. मात्र आयकराची मर्यादा वाढविणे गरजेचे होते.- अविनाश ठाकूरविकास अधिकारी, एलआयसी