शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी मराठी शिकणार नाही, काय करायचं ते करा.…’’, प्रसिद्ध व्यावसायिकाने राज ठाकरेंना डिवचले  
2
“कुठलीही ताकद ठाकरे ब्रँड संपवू शकणार नाही, दोघे भाऊ एकत्र येत असतील तर...”: सुप्रिया सुळे
3
ऑपरेशन सिंदूर: पाकिस्तान सीमेवर भारत एकाचवेळी तीन देशांशी लढत होता; उप लष्करप्रमुखांचा मोठा गौप्यस्फोट  
4
प्राडाला मोठा झटका! कोल्हापुरी चप्पलवरून थेट कोर्टात खेचले, वाचा काय घडले?
5
IND vs ENG: बॅटने कहर केल्यानंतर आता बॉलने इतिहास रचण्याची संधी, जाडेजाच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष!
6
तब्बल ५ लाख २१ हजार ३५४ विद्यार्थ्यांनी घेतला ‘ST पास थेट शाळेत’ योजनेचा लाभ: प्रताप सरनाईक
7
चीनच्या डावपेचात अडकला भारत? EV तयार करणाऱ्या कंपन्यांनी हात वर केले, आता पुढे काय?
8
विराट-रोहितच्या संदर्भात आली मोठी अपडेट; टीम इंडियाच्या चाहत्यांचा पुन्हा होणार 'मूड ऑफ'
9
श्रेया, भाऊ कोहिनूर हिरे पण 'तो' भंगारवाला? शरद उपाध्येंची ६ वर्षांपूर्वीची 'ती' पोस्ट व्हायरल
10
Ashadhi Ekadashi Vrat 2025: आषाढी एकादशीला 'अशी' करा विधिवत पूजा; जाणून घ्या नियम आणि शुभ मुहूर्त!
11
पाकिस्तानचा पाय आणखी खोलात! मायक्रोसॉफ्टने २५ वर्षांनी सोडला देश, कारण ऐकून बसेल धक्का!
12
पुणे बलात्कार प्रकरण: आरोपी तरुणीला आधीपासूनच ओळखत होता; पोलिसांकडून दोघांची चौकशी
13
राजकीय शेरेबाजी करणाऱ्यांना तालिका सभाध्यक्षपदी बसण्याचा अधिकार आहे का?; विरोधकांचा सवाल
14
"किती सुंदर व्यक्त झालायेस डॉक्टर, तू एक...", निलेश साबळेंच्या पोस्टवर प्रवीण तरडे काय म्हणाले?
15
रणबीरच्या 'रामा'ची RRRमधल्या रामचरणशी तुलना, 'रामायण'च्या टीझरनंतर चाहते म्हणतात- "प्रभू श्री रामांच्या भूमिकेसाठी..."
16
होम लोन घेण्याचा विचार करताय? ३ सरकारी बँकांनी कमी केले व्याजदर; पाहा कोणत्या बँकेत मिळतंय स्वस्त कर्ज
17
लेखः 'हिंदी सक्ती' टळली, पण त्याने मराठी भाषेवर आलेलं संकट टळेल? नेमकं कोण चुकतंय?
18
Ashadhi Ekadashi 2025: धर्मशास्त्रानुसार कसा करावा आषाढी एकादशीचा उपास? व्रतनियम वाचा!
19
केजरीवालांचा शीषमहल, तर रेखा गुप्तांचा 'मायामहल'; ९ लाखांचे टीव्ही, रिनोवेशनसाठी ६० लाखांचे टेंडर
20
हृदयद्रावक! खेळताना प्लास्टिकचा बॉल गिळला; दीड वर्षांच्या लेकीचा पालकांसमोर तडफडून मृत्यू

्रकाही भागात दूषित पाणीपुरवठा

By admin | Updated: May 10, 2014 00:19 IST

शहरातील नागरिकांना महाराष्टÑ जीवन प्राधिकरण विभागातर्गंत शुध्द पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. मात्र सदर योजना ३० ते ४० वर्ष जूनी असून...

 गोंदिया : शहरातील नागरिकांना महाराष्टÑ जीवन प्राधिकरण विभागातर्गंत शुध्द पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. मात्र सदर योजना ३० ते ४० वर्ष जूनी असून या योजेनची पाईपलाईन जीर्ण झाली आहे. त्यामुळे शहरातील काही भागातील नागरिकांना मागील काही दिवसांपासून दूषीत पाण्याचा पुरवठा होत आहे. नवीन पाईपलाईनचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी नागरिक करीत आहेत. शहरातील सिव्हिल लाईन परिसरातील गांधी वॉर्ड तसेच सूर्याटोला, गौतमनगर, छोटा गोंदिया, शास्त्रीवार्ड या परिसरातील काही भागात दूषीत पाण्याचा पुरवठा नेहमीच होत असतो. कधी कधी महाराष्टÑ जीवन प्राधिकरण विभागाकडून अनियमित पाणी पुरवठा केला जात आहे. त्यामुळे शहरात पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे. महाराष्टÑ जीवन प्राधिकरण विभागाच्या ४० वर्षे जुन्या पाईपलाईन मधून पाणी पुरवठा करण्यात येतो. मात्र सदर पाईपलाईन ठिकठिकाणाहून लिकेज झाल्यामुळे नालीतील पाणी शिरून सदर दूषीत पाणी नागरिकांना प्यावे लागत आहे. शहरात ४९० बोरवेल असून यापैकी बर्‍याच बोरवेल नादुरस्त आहेत. तर काही बोरवेलचे पाईपदेखील कुजले आहेत. शिवाय सार्वजनिक विहिरीमधील गाळाचा उपसा बर्‍याच दिवसांपासून करण्यात आला नाही. त्यामुळे अशुध्द पिण्याचे पाणी पुरवून पालिका प्रशासन नागरिकांच्या जिववार उठल्याची प्रतिक्रिया येथील नागरिक व्यक्त करित आहेत. गांधीवार्ड ही वस्ती शहरातील सर्वात जुना भाग आहे. या ठिकाणी महाराष्टÑ जीवन प्राधिकरणाच्या नळांद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येतो. याशिवाय हातपंप व सार्वजनिक विहिरी देखील आहेत. मात्र, तिन्ही स्त्रोतांतील पाणीपुरवठा दूषीत असल्यामुळे शहरवासीयांचे आरोग्य धोक्यात आले आहे. दूषीत पाणी पुरवठ्यामुळे शहरवासीयांना साथीच्या आजाराची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मनोहर चौक ते सतीबोळी चौक, मोहन रामटेककर यांचे घर ते जगदेवप्रसाद मिश्रा यांच्या घरापर्यंत असलेल्या महाराष्टÑ जीवन प्राधीकरणाच्या पाईपलाईनला अनेक ठिकाणी लिकेज आहेत. पाईपलाईन सांडपाण्याच्या नाल्यामधून टाकण्यात आली आहे. नालीतील दूषित पाणी पाईपमध्ये जाऊन ते नागरिकांना पिणे भाग पडत आहे. बोरवेल आहेत मात्र त्यांचे पाईपदेखील कुजले आहेत. पाण्याबरोबर गंज येत आहे. तसेच सार्वजनिक विहिरींमधील गाळाचा उपसा गेल्या अनेक दिवसांपासून करण्यात आला नाही. तर बोरवेलची कित्येक वर्षापासून दुरूस्ती करण्यात आली नसल्यामुळे बर्‍याच बोरवेल नादुरूस्त आहेत. त्यामुळे नागरिकांना नळाच्या पाण्यावर अवलंबून राहुन आपली तहान भागवावी लागत आहे. या परिसरातील नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप होऊ लागला आहे. पाईपलाईनला मोटार जोडून चोरी काही उच्चभू्र आणि स्वत:ला मोठे समजणार्‍यांनी जीवन प्राधिकरणाच्या नळांना विद्युत मोटार लावून तिसर्‍या माळ्यापर्यंत पाणी ओढणे सुरू केले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या घरी असलेल्या नळांना योग्यरीत्या पाण्याचा पुरवठा होत नाही. या प्रकाराकडे पालिका आणि जीवन प्राधिकरण दुर्लक्ष करत असल्याचा आरोप वॉर्डातील नागरिकांनी केला आहे. (प्रतिनिधी)