शहरं
Join us  
Trending Stories
1
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम! अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
2
“CM, DCM यांची दिल्लीत वट, अतिवृष्टीच्या नुकसानभरपाईचा प्रस्ताव केंद्राला पाठवा”: वडेट्टीवार
3
"फरहानच्या AK47 वर अभिषेक-गिलचं 'ब्रह्मास्त्र' पडलं भारी.."; पाकिस्तानी क्रिकेटरनेच सुनावलं
4
“राज्यातील रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी १२९६.०५ कोटींचा निधी”: शिवेंद्रसिंहराजे भोसले
5
National Film Award: पांढरे केस, गॉगल आणि सूटबूट! राष्ट्रीय पुरस्कारासाठी शाहरुखचा लूक, 'त्या' कृतीने जिंकली मनं
6
PAK vs SL : 'डबल पंजा पॅटर्न'मुळे लंकेचा पेपर सोपा! पाकला मात्र नापास होण्याचा धोका!
7
भरधाव ट्रकमागे दुचाकीस्वाराचा थरार, जीवघेणा स्टंट पाहून तुमच्याही अंगावर येईल शहारा! VIDEO व्हायरल
8
शेअर बाजार लाल निशाणीवर बंद; तरीही Axis बँकेसह 'या' स्टॉक्सनी घेतली जोरदार झेप!
9
सूर्य नक्षत्र परिवर्तन २०२५: २७ सप्टेंबरला सूर्य बदलणार नक्षत्र आणि 'या' ७ राशींचे भाग्य; बाकी राशींचे काय?
10
71st National Awards : 'श्यामची आई' ठरला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट, महाराष्ट्राची शान नऊवारी साडीत स्वीकारला पुरस्कार!
11
बायकोने मोबाईल मागितला, नवऱ्याने नाही दिला; संतापलेल्या पत्नीने मग घरातला चाकू घेतला अन्...
12
सरकारी नोकऱ्यांसाठी वयोमर्यादा शिथील करावी, काश्मिरी हिंदूंची मागणी; काय म्हणालं सर्वोच्च न्यायालय?
13
कंपनीचं एक स्पष्टीकरण आणि ₹३,४०० नं वाढली शेअरची किंमत; रचला इतिहास, भाव विक्रमी उच्चांकावर
14
'तो' वाद जीवावर बेतला! अवघ्या २० रुपयांसाठी काँग्रेस नेत्याच्या भावाची गोळ्या झाडून हत्या
15
Solapur: 'भैय्याला आधी काढा.. तो आत अडकला आहे'; भावाचा मृत्यू, बहिणीचा आक्रोश; मृतदेहच सापडला
16
रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत प्रश्न विचारताच कर्नाटकचे उपमुख्यमंत्री संतापले, म्हणाले पंतप्रधानांच्यां निवासस्थानाबाहेरही...  
17
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फक्त व्याजातूनच ४.५ लाखांची कमाई; सोबत टॅक्समध्येही मिळतेय सूट
18
अभूतपूर्व परिस्थितीत तातडीच्या मदतीसह कायमस्वरुपी मदतीची गरज; अन्यथा शेती मोठ्या समस्येत - शरद पवार
19
Food: भरपूर गर असलेले सीताफळ कसे निवडावे? कच्चे फळ निवडल्यास काय असतो धोका?
20
सरकारी कर्मचारी आणि पेन्शधारकांना मोठी दिवाळी भेट! पगारात होणारी इतकी वाढ

महिलांच्या समस्या मार्गी लावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 21:39 IST

गावच्या व प्रामुख्याने महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी मी तटस्थ भूमिका घेणार आहे आणि विकासाचा महत्वाचे घटक महिलाच आहे. म्हणून विकास करण्यासाठी महिलांच्या समस्या मी मार्गी लावणार असे प्रतिपादन केंद्र सरकारच्या खनिकर्म मंत्रालयाच्या संचालक फरिदा नाईक यांनी केले.

ठळक मुद्देफरिदा नाईक : येरंडी गावची केली तपासणी

लोकमत न्यूज नेटवर्कबाराभाटी : गावच्या व प्रामुख्याने महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी मी तटस्थ भूमिका घेणार आहे आणि विकासाचा महत्वाचे घटक महिलाच आहे. म्हणून विकास करण्यासाठी महिलांच्या समस्या मी मार्गी लावणार असे प्रतिपादन केंद्र सरकारच्या खनिकर्म मंत्रालयाच्या संचालक फरिदा नाईक यांनी केले.ग्राम स्वराज्य अभियानांतर्गत ग्राम येरंडी येथे आयोजीत कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरुन त्या बोलत होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून सरंक्षण विभागाचे अवर सचिव जितेंद्रकुमार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. दयानिधी, तहसीलदार भंडारी, खंड विकास अधिकारी नारायण जमईवार, जि.प.सदस्य गिरीष पालीवाल, पं.स.उपसभापती करुणा नांदगावे, सरपंच रेखा खोब्रागडे, उपसरपंच बागडे, पोलीस पाटील खेमराज गेडाम, ग्रामपंचायत पदाधिकारी व जि.प.च्या सर्व शाखांचे अनेक अधीकारी-पदाधिकारी यावेळी ग्रा.पं.कार्यालयामध्ये उपस्थित होते.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त १४ एप्रिल ते ५ मे पर्यंत राबविण्यात येणाऱ्या ग्राम स्वराज्य अभियानाची सुरुवात येरंडी पासून झाली. याप्रसंगी गावामध्ये प्रधानमंत्री उज्वला योजना, प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजना, सौभाग्य योजना, गॅस योजना, उजाला योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, मिशन इंद्रधनुष्य योजना या सात योजनांची नागरिकांना माहिती दिली गेली. तसेच गावकºयांच्या समस्या जाणून तक्रारींची नोंद करण्यात आली.याप्रसंगी नाईक यांनी गावातील घरकूल, शौचालय गॅस इत्यादींची पाहणी केली. संचालन करून आभार विस्तार अधिकारी अनुप भावे यांनी मानले.गावकऱ्यांनी मांडली गाऱ्हाणीघरकुलाची पाहणी करतांना तयार झालेले घर ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी दाखविले. परंतु ज्यांना घरकुल, शौचालय व गॅस कनेक्शन मिळाले नाही हे मात्र दाबून ठेवले. मात्र योजना फक्त पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनाच कशा मिळतात असे नागरिकांनी बोलून दाखविले. गावात सिमेंट रस्ते बांधून विकास होत नाही. अनेक समस्या येरंडी गावात आहेत. पण पंचायत समिती व तहसील कार्यालयातील अधिकारी लक्ष घालून न्याय देत नाही. मिलाजुला कामकाज आहे, म्हणून विकास खुंटतो, योजना फक्त घशात पण विकासासाठी नाही असे नागरिकांनी या ग्रामसभेत सांगीतले.