शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
4
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
5
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
6
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
7
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
8
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
9
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
10
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
11
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
12
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
13
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
14
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
15
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
16
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
17
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
18
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
19
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
20
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

महिलांच्या समस्या मार्गी लावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 21:39 IST

गावच्या व प्रामुख्याने महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी मी तटस्थ भूमिका घेणार आहे आणि विकासाचा महत्वाचे घटक महिलाच आहे. म्हणून विकास करण्यासाठी महिलांच्या समस्या मी मार्गी लावणार असे प्रतिपादन केंद्र सरकारच्या खनिकर्म मंत्रालयाच्या संचालक फरिदा नाईक यांनी केले.

ठळक मुद्देफरिदा नाईक : येरंडी गावची केली तपासणी

लोकमत न्यूज नेटवर्कबाराभाटी : गावच्या व प्रामुख्याने महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी मी तटस्थ भूमिका घेणार आहे आणि विकासाचा महत्वाचे घटक महिलाच आहे. म्हणून विकास करण्यासाठी महिलांच्या समस्या मी मार्गी लावणार असे प्रतिपादन केंद्र सरकारच्या खनिकर्म मंत्रालयाच्या संचालक फरिदा नाईक यांनी केले.ग्राम स्वराज्य अभियानांतर्गत ग्राम येरंडी येथे आयोजीत कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरुन त्या बोलत होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून सरंक्षण विभागाचे अवर सचिव जितेंद्रकुमार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. दयानिधी, तहसीलदार भंडारी, खंड विकास अधिकारी नारायण जमईवार, जि.प.सदस्य गिरीष पालीवाल, पं.स.उपसभापती करुणा नांदगावे, सरपंच रेखा खोब्रागडे, उपसरपंच बागडे, पोलीस पाटील खेमराज गेडाम, ग्रामपंचायत पदाधिकारी व जि.प.च्या सर्व शाखांचे अनेक अधीकारी-पदाधिकारी यावेळी ग्रा.पं.कार्यालयामध्ये उपस्थित होते.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त १४ एप्रिल ते ५ मे पर्यंत राबविण्यात येणाऱ्या ग्राम स्वराज्य अभियानाची सुरुवात येरंडी पासून झाली. याप्रसंगी गावामध्ये प्रधानमंत्री उज्वला योजना, प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजना, सौभाग्य योजना, गॅस योजना, उजाला योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, मिशन इंद्रधनुष्य योजना या सात योजनांची नागरिकांना माहिती दिली गेली. तसेच गावकºयांच्या समस्या जाणून तक्रारींची नोंद करण्यात आली.याप्रसंगी नाईक यांनी गावातील घरकूल, शौचालय गॅस इत्यादींची पाहणी केली. संचालन करून आभार विस्तार अधिकारी अनुप भावे यांनी मानले.गावकऱ्यांनी मांडली गाऱ्हाणीघरकुलाची पाहणी करतांना तयार झालेले घर ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी दाखविले. परंतु ज्यांना घरकुल, शौचालय व गॅस कनेक्शन मिळाले नाही हे मात्र दाबून ठेवले. मात्र योजना फक्त पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनाच कशा मिळतात असे नागरिकांनी बोलून दाखविले. गावात सिमेंट रस्ते बांधून विकास होत नाही. अनेक समस्या येरंडी गावात आहेत. पण पंचायत समिती व तहसील कार्यालयातील अधिकारी लक्ष घालून न्याय देत नाही. मिलाजुला कामकाज आहे, म्हणून विकास खुंटतो, योजना फक्त घशात पण विकासासाठी नाही असे नागरिकांनी या ग्रामसभेत सांगीतले.