शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
2
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
3
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
4
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
5
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
6
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
7
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
8
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
9
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
10
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
11
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
12
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 
13
कावडयात्रेत घुसला भरधाव ट्रक; दोन शिवभक्तांचा मृत्यू
14
उद्योगांची एक्स्प्रेस सुस्साट, प्रक्रिया सुलभ आणि वेगवान; गुंतवणूकदारांना मोठा दिलासा
15
ठाण्यात कैद्यांच्या बंदोबस्तामध्ये हलगर्जीपणा, नऊ पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई
16
महादेवीसाठी महाराष्ट्रात तोडीच्या सुविधा नाहीत; पेटाच्या नव्या भूमिकेवर मठाचे स्पष्टीकरण
17
जोपर्यंत टॅरिफचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत भारतासोबत व्यापार चर्चा होणार नाही - ट्रम्प
18
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
19
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
20
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 

महिलांच्या समस्या मार्गी लावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 21:39 IST

गावच्या व प्रामुख्याने महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी मी तटस्थ भूमिका घेणार आहे आणि विकासाचा महत्वाचे घटक महिलाच आहे. म्हणून विकास करण्यासाठी महिलांच्या समस्या मी मार्गी लावणार असे प्रतिपादन केंद्र सरकारच्या खनिकर्म मंत्रालयाच्या संचालक फरिदा नाईक यांनी केले.

ठळक मुद्देफरिदा नाईक : येरंडी गावची केली तपासणी

लोकमत न्यूज नेटवर्कबाराभाटी : गावच्या व प्रामुख्याने महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी मी तटस्थ भूमिका घेणार आहे आणि विकासाचा महत्वाचे घटक महिलाच आहे. म्हणून विकास करण्यासाठी महिलांच्या समस्या मी मार्गी लावणार असे प्रतिपादन केंद्र सरकारच्या खनिकर्म मंत्रालयाच्या संचालक फरिदा नाईक यांनी केले.ग्राम स्वराज्य अभियानांतर्गत ग्राम येरंडी येथे आयोजीत कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरुन त्या बोलत होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून सरंक्षण विभागाचे अवर सचिव जितेंद्रकुमार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. दयानिधी, तहसीलदार भंडारी, खंड विकास अधिकारी नारायण जमईवार, जि.प.सदस्य गिरीष पालीवाल, पं.स.उपसभापती करुणा नांदगावे, सरपंच रेखा खोब्रागडे, उपसरपंच बागडे, पोलीस पाटील खेमराज गेडाम, ग्रामपंचायत पदाधिकारी व जि.प.च्या सर्व शाखांचे अनेक अधीकारी-पदाधिकारी यावेळी ग्रा.पं.कार्यालयामध्ये उपस्थित होते.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त १४ एप्रिल ते ५ मे पर्यंत राबविण्यात येणाऱ्या ग्राम स्वराज्य अभियानाची सुरुवात येरंडी पासून झाली. याप्रसंगी गावामध्ये प्रधानमंत्री उज्वला योजना, प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजना, सौभाग्य योजना, गॅस योजना, उजाला योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, मिशन इंद्रधनुष्य योजना या सात योजनांची नागरिकांना माहिती दिली गेली. तसेच गावकºयांच्या समस्या जाणून तक्रारींची नोंद करण्यात आली.याप्रसंगी नाईक यांनी गावातील घरकूल, शौचालय गॅस इत्यादींची पाहणी केली. संचालन करून आभार विस्तार अधिकारी अनुप भावे यांनी मानले.गावकऱ्यांनी मांडली गाऱ्हाणीघरकुलाची पाहणी करतांना तयार झालेले घर ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी दाखविले. परंतु ज्यांना घरकुल, शौचालय व गॅस कनेक्शन मिळाले नाही हे मात्र दाबून ठेवले. मात्र योजना फक्त पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनाच कशा मिळतात असे नागरिकांनी बोलून दाखविले. गावात सिमेंट रस्ते बांधून विकास होत नाही. अनेक समस्या येरंडी गावात आहेत. पण पंचायत समिती व तहसील कार्यालयातील अधिकारी लक्ष घालून न्याय देत नाही. मिलाजुला कामकाज आहे, म्हणून विकास खुंटतो, योजना फक्त घशात पण विकासासाठी नाही असे नागरिकांनी या ग्रामसभेत सांगीतले.