शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

शिबिरातून शोधले ‘समाधान’

By admin | Updated: January 7, 2015 22:55 IST

विविध लोककल्याणकारी योजना शासनाकडून राबविण्यात येतात. मात्र त्यांची माहितीच सर्वसामान्य जनतेचा नसते. त्यांना एकाच जागी या योजनांची माहिती देण्यासोबतच पात्र

सर्वसामान्यांना लाभ : सर्व विभागप्रमुखांनी लावली हजेरीसडक/अर्जुनी : विविध लोककल्याणकारी योजना शासनाकडून राबविण्यात येतात. मात्र त्यांची माहितीच सर्वसामान्य जनतेचा नसते. त्यांना एकाच जागी या योजनांची माहिती देण्यासोबतच पात्र लाभार्थ्यांना योजनांचा लाभ देऊन साहित्यांचे वाटप करण्यासाठी येथे ‘समाधान शिबिरा’चे आयोजन करण्यात आले होते. पालकमंत्री राजकुमार बडाले यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.येथील तहसील कार्यालयात सुवर्ण जयंती राजस्व अभियानांतर्गत या शिबिराचे आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी तर प्रमुख पाहुणे म्हणून जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश शिंदे, उपवनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रवि धकाते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कळमकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अशोक कुरील जि.प. सदस्य सर्वश्री रुपाली टेंभुर्णे, जागेश्वर धनबाते, मिलन राऊत, पंचायत समिती सभापती निर्मला उईके, उपसभापती दामोधर नेवारे व सरपंच पंचफुला अंबादे यांची उपस्थित होती.पालकमंत्री बडोले पुढे म्हणाले, शासन सर्वसामान्य माणूस आणि शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवित आहे. अशाप्रकारच्या शिबिरामधून त्यांना माहिती मिळण्यास मदत होत आहे. जलयुक्त शिबिर अभियान यशस्वीतेसाठी लाभार्थ्यांचा व लोकांचा सहभाग मिळण्यास मदत होत आहे. जलयुक्त शिबिर अभियान यशस्वीतेसाठी लाभार्थ्यांचा व लोकांचा सहभाग आवश्यक आहे. त्यामुळे सिंचन, पिण्याची पाण्याची व्यवस्था, भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ होण्यास निश्चित मदत होईल.जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी म्हणाले, सुवर्ण जयंती राजस्व अभियानाच्या माध्यमातुन अनेक उपक्रम शिबिर फेरफार करण्यास मदत होत आहे. त्यामुळे नागरिकांचे प्रश्न सोडविण्यास मदत होत आहे. यामधून शासन निर्णयांचे वाचन, ई-निविदांची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यात येत असल्याचे सांगितले.यावेळी तहसीलदार एन.जे. उईके यांनी प्रास्ताविकातून डिसेंबर २०१४ अखेर ४५० विविध दाखल्यांचे वाटप, ८७४ फेरफार, १०३ गावात चावडी वाचन, १०३ गावात आदिवासी जमीन धारकांच्या जमिनीबाबत नोंदी पुर्ण, ३०८६ संजय गांधी निराधार योजना लाभार्थी, ४२०३ श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना लाभार्थी, १७७२ इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना लाभार्थी, १७१ इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना लाभार्थी, २३ इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजना लाभार्थी, १०२ राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना लाभार्थी, १२६५२ आम आदमी विमा योजना लाभार्थी, २७५२ आम आदमी शिष्यवृत्ती योजना लाभार्थी, ११७ आम आदमी विमा नैसर्गिक मृत्यू दावे लाभार्थ्यांना लाभ देण्यात आल्याची माहिती दिली.संचालन ए.पी. मेश्राम यांनी केले. उपस्थितांचे आभार नायब तहसीलदार मदनलाल चुर्रे यांनी मानले. कार्यक्रमास विविध विभागाचे प्रमुख अधिकारी, सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व तहसीलदार उपस्थित होते. शिबिराला सडक अर्जुनी परिसरातील ग्रामस्थ व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होती. (तालुका/शहर प्रतिनिधी)