शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

सरकारची वर्षपूर्ती जिल्ह्याला मिळाला सामाजिक न्याय

By admin | Updated: November 1, 2015 02:15 IST

समाजातील ८० टक्के लोकांशी निगडीत असलेल्या सामाजिक न्याय विभागाची व्याप्ती खूप मोठी आहे.

समाजातील ८० टक्के लोकांशी निगडीत असलेल्या सामाजिक न्याय विभागाची व्याप्ती खूप मोठी आहे. पहिले सहा महिने तर एवढ्यामोठ्या विभागाचे काम शिकण्यातच गेले. हे शिकतानाच आधीच्या सरकारने आडवाटेने केलेल्या बऱ्याच गोष्टी समोर आल्या. त्यात सहा विकास महामंडळाकडून गरजवंताना रोजगारासाठी कर्ज उपलब्ध करून देण्याऐवजी केवळ दलालांना कर्जवाटप झाल्याचे दिसले. ज्यांच्या उन्नतीसाठी ही महामंडळे आहेत त्यांनाच वंचित केले गेले. त्यामुळे आधी या महामंडळातील दलालांच्या वाटा बंद केल्या. भटके, विमुक्त पारधी अशा अनेक वंचितांची स्थिती दयनिय तर आहेच मात्र स्थिती अतिशय वाईट आहे. वाल्मिकी समाजासाठी लाड मागे समितीच्या शिफारशीनुसार वारसा हक्क लागू केला. पुढेही वंचितासाठी आता खूप काम करायचे आहे. ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरिता शिष्यवृत्तीसाठी असलेली ४ लाख ५० हजाराची मर्यादा ६ लाखापर्यंत वाढवण्याचे प्रस्तावित आहे. लवकरच यालाही मंत्रिमंडळाची मंजुरी मिळेल. या विभागाचा कार्यभार सांभाळल्यानंतर कोणते ठोस निर्णय घेतले?- प्रत्येक जिल्ह्यात बेरोजगार तरूणांसाठी कौशल्य विकासाचे प्रशिक्षण सुरू केले. औरंगाबाद, पुणे, नागपूर येथे युपीएससीच्या अनुसूचित जाती प्रवर्गातील ५० स्पर्धा परीक्षासाठी मोफत निवासी प्रशिक्षण केंद्र सुरू केले. तसेच दिल्लीतही नामांकित साईराम-वाजीराम सारख्या प्रशिक्षण केंद्रात दरवर्षी ५० विद्यार्थ्यांचे मोफत प्रशिक्षण सुरू केले. यातून यावर्षी आमचे तीन आयएस झालेत पुढच्या वर्षी १० आयएएस बनवण्याचे आमचे लक्ष्य आहे. छत्रपती शाहू महाराज यांच्या नावाने स्कॉलरशिप सुरू केली. अनुसूचित जातीतील ५० महिलांना एम.फिल व पीएचडी साठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नावाने ज्युनिअर रिसर्चसाठी २५ हजार तर सिनिअर रिसर्चसाठी २८ हजाराची फेलोशिप सुरू केली. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या नावानेही एम.फील व पीएचडीच्या उच्च शिक्षणाकरिता ५० विद्यार्थ्यांसाठी देशातील पहिली फेलोशिप सुरू केली. वसंतराव नाईक विकास महामंडळाच्या कारभारात एकसूत्रीपणा आणून सर्वच महामंडळे आम्ही एकत्र करणार आहोत. दलित उद्योजक उभा राहिला पाहिजे. यासाठी औद्योगिक सहकारी संस्थाना कर्ज देतानाच, वैयक्तिक कौशल्यप्राप्त तरूणांसाठीही उद्योगाची योजना करण्याचा आमचा मानस आहे. औद्योगिक वसाहतीमध्ये दलित उद्योजकांसाठी राखीव जागा ठेवणार आहोत. राज्यातील अपंगासाठी सर्वकष धोरण आम्ही आणणार आहोत. धोरणाचे प्रारुप मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी पाठवण्यात आलेले आहे. अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या १२३ आश्रमशाळांना तातडीने मान्यता दिली. अपंगाच्या शाळेच्या शैक्षणिक दर्जा आणि गुणवत्ता सुधारण्यासाठी जिल्हास्तरीय नियंत्रण समितीची स्थापना केली. जात पडताळणी प्रकरणाचा तातडीने निपटारा व्हावा यासाठी आम्ही जिल्हानिहाय जात पडताळणी समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेतला. जिल्हानिहाय समित्यांकरिता आवश्यक पदनिर्मिती करून लवकरच समित्या कार्यान्वित करणार आहोत. कर्नाटक आणि आंध्रप्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्र अनुसूचित जाती अधिनियम हा विशेष कायदा करण्याचे प्रस्तावित आहे. असा कायदा अस्तित्वात आल्यास विशेष घटक योजना तसेच इतर अनुसूचित जाती उपयोजनेसाठी असलेल्या निधीचा वापर अधिक सक्षम आणि पारदर्शकपणे करता येईल.