शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
2
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
3
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
4
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
5
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
6
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
7
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
8
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
9
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
10
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
11
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
12
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
13
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
14
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."
15
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
16
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
17
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
18
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
19
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
20
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...

निवडणूक प्रचारात सामाजिक विचारमंथन आवश्यक

By admin | Updated: December 25, 2015 02:32 IST

अलीकडे देशातील सार्वत्रिक निवडणुकांच्या प्रचारात वैयक्तिक मानहानीने आणि अभद्र, सवंग भाषाप्रयोगांनी अत्यंत असभ्यतेचा तळ गाठला ...

साकोली : अलीकडे देशातील सार्वत्रिक निवडणुकांच्या प्रचारात वैयक्तिक मानहानीने आणि अभद्र, सवंग भाषाप्रयोगांनी अत्यंत असभ्यतेचा तळ गाठला असून त्यामुळे आपल्या लोकशाहीपुढे राजकीय नैतिकतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. खरे तर निवडणुकांच्या प्रचारात विविध सामाजिक निकडीच्या प्रश्नांवरील गंभीर विचारमंथनाची नितांत आवश्यकता आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध राजकीय विश्लेषक डॉ. जोगेंद्र गवई यांनी केले. साकोली येथील मनोहरभाई पटेल महाविद्यालयातर्फे ‘सार्वत्रिक निवडणुकामधील अलीकडचे प्रचारप्रवाह व त्यांचा मतदानवर्तनावरील परिणाम’ या विषयावरील राष्ट्रीय चर्चासत्राच्या उद्घाटन सत्रातील विशेष अतिथी म्हणून ते बोलत होते. गोंदिया शिक्षण संस्थेचे सचिव राजेंद्र जैन यांच्या मार्गदर्शनात आयोजिलेल्या या चर्चासत्रात बिलासपूर (छत्तीसगढ) येथील डॉ. ब्रिजकिशोर त्रिपाठी यांनी बीजभाषणातून निवडणुकांमधील भयमुक्त मतदानप्रक्रियेच्या आवश्यकतेवर विशेष भर दिला. याप्रसंगी चर्चासत्राचे संयोजक प्राचार्य डॉ. अशोक काळे यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात प्रस्तुत विषयाचे गांभीर्य व महत्व अधोरेखित केले. या चर्चासत्राचा आरंभ दीपप्रज्वलनाने झाला. यावेळी चर्चासत्राच्या विषयावरील शोधनिबंधक संग्रहाचे प्रकाशनही करण्यात आले. प्रस्तुत एकदिवसीय चर्चासत्रामधील सामाजिक व इलेक्ट्रॉनिक माध्यमाची भूमिका या विषयावरील पहिल्या सत्रात डॉ. मोहन काशीकर हे अध्यक्षस्थानी उपस्थित होते. या सत्रात डॉ. विजय बोबडे व डॉ. ज्ञानेश्वर शंभरकर यांनी अभ्यासपूर्ण शोधनिबंध सादर केलेत.निवडणुकांमधील मुद्रीत माध्यमे, दारोदार प्रचार आणि भव्य रॅलीच्या संदर्भातील दुसऱ्या सत्रांचे अध्यक्षस्थान डॉ. डी.आर. येवले यांनी भूषविले. या सत्रात डॉ. संजय मोरे व डॉ. प्रवीण भागडीकर यांची प्रभावी भाषणे झालीत. समारोपीय सत्रात डॉ. विवेक दिवाण व डॉ. नंदा सातपुते यांनी चर्चासत्राच्या यशस्वी आयोजनासंबंधी प्रतिक्रिया व्यक्त केल्यात. प्राचार्य डॉ. अशोक काळे यांनी समारोपीय भाषणात गंभीर विचारमंथनासाठी सर्व मान्यवर व अभ्यासक वक्त्यांचे व उपस्थित प्रतिनिधीचेही आभार मानले. या चर्चासत्रात डॉ. ए.एल. चुटे, डॉ. अमित टेंभुर्णे व डॉ. एल.पी. नागपूरकर यांनी सुत्रसंचालनाची जबाबदारी सांभाळली. या चर्चासत्राच्या यशस्वीतेसाठी चर्चासत्राचे आयोजक आणि महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी व शिक्षकेत्तर कर्मचारी मंडळींनी विशेष परिश्रम घेतले. (तालुका प्रतिनिधी)