शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

लहान असो की मोठा, सर्वांचेच आयुष्य फाटलेले ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:30 IST

संतोष बुकावन अर्जुनी मोरगाव : खरीप हंगाम तोंडावर आला आहे. रबी हंगामाचे धानाची कापणी व मळणी सुरू आहे. ...

संतोष बुकावन

अर्जुनी मोरगाव : खरीप हंगाम तोंडावर आला आहे. रबी हंगामाचे धानाची कापणी व मळणी सुरू आहे. अशातच निसर्गसुद्धा कोपला आहे. अवकाळी पावसाने हजेरी लावून शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले. कोरोनाचे संकट वेगळेच. तोच शासनाने रासायनिक खतांच्या भावात मोठी वाढ करून खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वीच शेतकऱ्यांना दणका दिला आहे. आता खऱ्या अर्थाने आस्मानी संकटासोबतच शेतकऱ्यांना सुलतानी संकटाचा सामना करावा लागणार आहे. दरवाढीमुळे तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागण्याची वेळ आता शेतकऱ्यांवर येऊन ठेपल्याचे चित्र आहे.

शेतकरी मोठा असो की लहान. शेती कोरडवाहू असो की सिंचनाची. शेतात धान असो की भाजीपाला. आज पूर्व विदर्भातला एकही शेतकरी विवंचनेतून सुटलेला नाही. लहान शेतकऱ्यांची जगण्याची तर मोठ्या शेतकऱ्यांची मोठेपण टिकविण्याची धडपड सुरू आहे. मोठा शेतकरी उसने अवसान आणून जगतो तर लहान शेतकरी आपल्या फाटलेल्या आयुष्याला ठिगळं लावण्याचा केविलवाणा प्रयत्न करतोय. शेतकऱ्यांच्या नशिबात काय आहे तेच कळत नाही. आठवडाभरापूर्वी गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील शेतकरी कोरोनाचे संकट पेलवूनही खुश होता. त्यात वरुणराजाची वक्रदृष्टी झाली. कापणी करून आडवे पाडलेल्या धानावर पाणी जमा झाले. अनेकांचे धान पाण्यात भिजले. काही शेतात तर लोंबाला कमी व शेतजमिनीवर झडलेले धानच अधिक दृष्टीस येत होते.

आता बघा ना, हे दुसरे नैसर्गिक संकट संपत नाही तोच तिसरे नवीन संकट उद्भवले. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होणार अशी मुक्ताफळे उधळून शेतकऱ्यांना कोरडी सहानुभूती देणाऱ्यांनीच रासायनिक खतांचे भाव वाढविले. आधारभूत हमी भावात शेतमालाचे दर मात्र तेवढेच आहेत. पीक लागवड व मशागतीच्या खर्चात अवाढव्य वाढ सुरूच आहे.

.........

पेट्रोल-डिझेलचे मीटर फिरतच आहे

गोपालन उरले नाही. गोपालनाने शेतीची कामेही केली जात नाही. हल्ली ट्रॅक्टर व मशीनद्वारे शेतीची कामे होतात. पाच राज्यांच्या निवडणुकांनंतर रोज पेट्रोल-डिझेलचे मीटर फिरतच आहे. त्यामुळे लागवड, मशागतीपासून तर घरी शेतमाल येइपर्यंत व विक्रीसाठी बाजारपेठेत जाईपर्यंत किती खर्च येतो याचे दुःख कुणी समजूनच घेत नाही. बाजारपेठेतही आणखी किती कष्ट उपसावे लागतात, नव्हे किती लुबाडणूक होते याचे वर्णनच न केलेले बरे.

..............

शेतकऱ्यांसाठी आयोगच नेमले जात नाही

कुणावर अन्याय होत असला की त्याच्या सर्वंकष चौकशीसाठी आयोग नेमले जातात. शेतकऱ्यांसाठी आयोगच नेमले जात नाही. आयोग नेमले तरी त्या आयोगाच्या शिफारशीच स्वीकारल्या जात नाहीत. शेतकऱ्यांसाठी म्हणे एक स्वामिनाथन आयोग आलं होतं. काय झालं या आयोगाच्या शिफारशींचं. परिणाम शून्य. शेतकऱ्यांसाठी असे कितीही आयोग आलेत न तरी शेतकऱ्यांचं भलं होईल, असं वाटत नाही.

भारत हा कृषिप्रधान देश आहे, असे सारेच मोठ्या अभिमानाने सांगतात; पण कृषी व्यवसाय या देशात पूर्णपणे उद्ध्वस्त झाला ही वस्तुस्थिती आहे.

...........

रोज मरे त्याला कोण रडे

शासन आणि प्रशासन संवेदनशील असावे लागते. माणसांची संवेदनाच मेली की दुसऱ्याच्या वेदना त्याला जाणवतच नसते. शेतकऱ्यांच्या वेदना हा संवेदनशील विषय आहे. त्याचे मुख्य कारण अर्थकारणात दडले आहे; पण शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती हा अर्थकारणाचा नव्हे तर राजकारणाचा विषय बनला आहे. शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्याचे राजकारण बिनदिक्कत सुरूच आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या म्हणजे ‘रोज मरे त्याला कोण रडे’ अशी अवस्था झाली आहे.