शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
3
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
4
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
5
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
6
मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
7
घटस्फोटानंतर मुलांपासून दूर झाली अभिनेत्री, पतीने ख्रिसमसलाही भेटू दिलं नाही; म्हणाली...
8
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
9
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
10
'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर स्वत:च्याच लग्नात नाचला मराठी अभिनेता, सगळे बघतच राहिले, व्हिडीओ व्हायरल
11
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
12
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
13
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
14
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
15
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
16
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
18
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
19
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
20
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
Daily Top 2Weekly Top 5

गाळ उपसा योजना ठरणार वरदान

By admin | Updated: May 15, 2017 00:12 IST

पवन तलावातील २५ वर्षापासूनचा गाळ हा शेतीसाठी सोनखतच आहे. यामुळे शेतकऱ्यांनी हे सोनखत त्वरित घेऊन जावे व आपली शेतजमीन सुपीक करावी.

 अभिमन्यू काळे : पवन तलावातील गाळ काढण्याच्या कामाचा प्रारंभ लोकमत न्यूज नेटवर्क गोरेगाव : पवन तलावातील २५ वर्षापासूनचा गाळ हा शेतीसाठी सोनखतच आहे. यामुळे शेतकऱ्यांनी हे सोनखत त्वरित घेऊन जावे व आपली शेतजमीन सुपीक करावी. शासनाची तलावातील गाळ उपसा ही योजना शेतकऱ्यांसाठी वरदन ठरणार असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी ंंकेले. येथील पवन तलावातील गाळ उपसण्याच्या व योजनेच्या प्रारंभाप्रसंगी रविवारी (दि.१४) ते बोलत होते. यावेळी तहसीलदार कल्याणकुमार डहाट, उप विभागीय अधिकारी सिध्दार्थ भंडारे, मुख्याधिकारी संदीप चिद्रवार, बीडीओ दिनेश हरिणखेडे, नगर पंचायतचे सर्व सदस्य, माजी उपसरपंच राहुल कटरे प्रामुख्याने उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांनी गाळात कुदळ मारून व जेसीबीचे पूजन करून शासनाच्या गाळ उपसा योजनेचा शुभारंभ केला. नगर पंचायतच्या सरहद्दीत असलेल्या राधाकृष्ण मंदिराजवळील पवन तलाव हा फार पूर्वीपासूनचा तलाव असून या तलावाचे पाणी व परिसरातील जागेमध्ये घाण वाढल्यामुळे लगतच्या वस्तीत त्रास वाढला होता. त्यामुळे काही धार्मिक संघटना व युवा शक्तीच्या सहयोगाने लोकसहभागातून श्रमदानाच्या माध्यमातून पवन तलावाचे सौंदर्यीकरणाचे काम नगर पंचायतचे उपाध्यक्ष आशिष बारेवार यांनी १ जानेवारी २०१७ ला हाती घेतले. बघता-बघता तलावाच्या आजूबाजूचा कचरा साफ झाला. लोकसहभाग वाढत गेला. निसर्गरम्य वातावरणाची जाण होताच तलावाच्या परिसरात तीन बेंचेस लोकसहभागातून लावण्यात आले. शासनाची तलाव गाळ उपसा योजना शेतकऱ्यांसाठी वरदान ठरली. गाळ काढून खोलीकरणाची एक दिवसाची जबाबदारी गायत्री परिवारने घेऊन व युवा शक्तीचे प्रणेते बारेवार यांनी तातडीने दोन जेसीबी लावून गाळ काढण्याची तयारी दर्शवून जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांच्या हस्ते गाळ उपसा योजनेचा पहिला तलाव पवन तलावचा गाळ उपसा योजनेचा शुभारंभ केला.