शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
2
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
3
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
4
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
5
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
6
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
7
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
8
Purushottam Chavan: पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत वाढ!
9
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
10
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
11
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
12
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
13
Stamp Duty: मुद्रांक शुल्कात ४५ कोटी रुपयांची सवलत!
14
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
15
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
16
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
17
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
18
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
19
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ

गाळ उपसा योजना ठरणार वरदान

By admin | Updated: May 15, 2017 00:12 IST

पवन तलावातील २५ वर्षापासूनचा गाळ हा शेतीसाठी सोनखतच आहे. यामुळे शेतकऱ्यांनी हे सोनखत त्वरित घेऊन जावे व आपली शेतजमीन सुपीक करावी.

 अभिमन्यू काळे : पवन तलावातील गाळ काढण्याच्या कामाचा प्रारंभ लोकमत न्यूज नेटवर्क गोरेगाव : पवन तलावातील २५ वर्षापासूनचा गाळ हा शेतीसाठी सोनखतच आहे. यामुळे शेतकऱ्यांनी हे सोनखत त्वरित घेऊन जावे व आपली शेतजमीन सुपीक करावी. शासनाची तलावातील गाळ उपसा ही योजना शेतकऱ्यांसाठी वरदन ठरणार असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी ंंकेले. येथील पवन तलावातील गाळ उपसण्याच्या व योजनेच्या प्रारंभाप्रसंगी रविवारी (दि.१४) ते बोलत होते. यावेळी तहसीलदार कल्याणकुमार डहाट, उप विभागीय अधिकारी सिध्दार्थ भंडारे, मुख्याधिकारी संदीप चिद्रवार, बीडीओ दिनेश हरिणखेडे, नगर पंचायतचे सर्व सदस्य, माजी उपसरपंच राहुल कटरे प्रामुख्याने उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांनी गाळात कुदळ मारून व जेसीबीचे पूजन करून शासनाच्या गाळ उपसा योजनेचा शुभारंभ केला. नगर पंचायतच्या सरहद्दीत असलेल्या राधाकृष्ण मंदिराजवळील पवन तलाव हा फार पूर्वीपासूनचा तलाव असून या तलावाचे पाणी व परिसरातील जागेमध्ये घाण वाढल्यामुळे लगतच्या वस्तीत त्रास वाढला होता. त्यामुळे काही धार्मिक संघटना व युवा शक्तीच्या सहयोगाने लोकसहभागातून श्रमदानाच्या माध्यमातून पवन तलावाचे सौंदर्यीकरणाचे काम नगर पंचायतचे उपाध्यक्ष आशिष बारेवार यांनी १ जानेवारी २०१७ ला हाती घेतले. बघता-बघता तलावाच्या आजूबाजूचा कचरा साफ झाला. लोकसहभाग वाढत गेला. निसर्गरम्य वातावरणाची जाण होताच तलावाच्या परिसरात तीन बेंचेस लोकसहभागातून लावण्यात आले. शासनाची तलाव गाळ उपसा योजना शेतकऱ्यांसाठी वरदान ठरली. गाळ काढून खोलीकरणाची एक दिवसाची जबाबदारी गायत्री परिवारने घेऊन व युवा शक्तीचे प्रणेते बारेवार यांनी तातडीने दोन जेसीबी लावून गाळ काढण्याची तयारी दर्शवून जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांच्या हस्ते गाळ उपसा योजनेचा पहिला तलाव पवन तलावचा गाळ उपसा योजनेचा शुभारंभ केला.