शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

खोत तळ्याच्या नावाखाली वृक्षांची कत्तल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2018 22:02 IST

पर्यावरणाच्या संवर्धनासाठी व जंगलाचे क्षेत्र वाढविण्यासाठी शासनातर्फे १३ कोटी वृक्ष लागवडीचा उपक्रम राबविला जात आहे. मात्र दुसरीकडे वनविभागाच्या दुर्लक्षित धोरणामुळे संरक्षित क्षेत्रातील वनांचा ऱ्हास होत आहे.

ठळक मुद्देसंरक्षित क्षेत्रात जेसीबीचा वापर : नवेगावबांध वनपरिक्षेत्रातील प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्कनवेगावबांध : पर्यावरणाच्या संवर्धनासाठी व जंगलाचे क्षेत्र वाढविण्यासाठी शासनातर्फे १३ कोटी वृक्ष लागवडीचा उपक्रम राबविला जात आहे. मात्र दुसरीकडे वनविभागाच्या दुर्लक्षित धोरणामुळे संरक्षित क्षेत्रातील वनांचा ऱ्हास होत आहे. खोततळी तयार करण्याच्या नावावर संरक्षित वनपरिक्षेत्रातील जेसीबी लावून कटाई सर्रासपणे कटाई केली जात असल्याचा प्रकार नवेगावबांध वनपरिक्षेत्रात सुरू आहे.दरवर्षी उन्हाळ्याच्या दिवसांत जंगलातील पानवठे कोरडे पडतात. त्यामुळे पाण्याच्या शोधात वन्यप्राण्यांची गावांकडे भटकंती सुरु होते. यामुळे वन्यप्राण्यांच्या शिकारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यासर्व प्रकाराला आळा घालण्यासाठी व जंगलामध्ये वन्यप्राण्यासाठी पाणीसाठा उपलब्ध करुन देण्याकरीता वनविभागाने यावर्षीपासून खोततळे तयार करण्याची योजना हाती घेतली आहे. खोततळे तयार करण्यासाठी २५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला.यापैकी १५ लाख रुपयांची कामे मनरेगातंर्गत तर १० लाख रुपयांची कुशल कामे केली जात आहे. सध्या नवेगावबांध वनपरिक्षेत्रात खोततळी तयार करण्याची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. वनविभागाने खोततळी तयार करण्याची कामे कंत्रादाराने दिली आहे. मात्र कंत्राटदारकडून खोततळी तयार करण्याच्या नावावर वृक्षांची कत्तल केली जात असल्याचा प्रकार सुरू आहे. हा सर्व प्रकार वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या डोळ्यादेखत सुरू असताना कंत्राटदारांवर कारवाई करण्याचे टाळले जात जात आहे.नियमांचे सर्रास उल्लघंनजंगलामध्ये खोततळे तयार करताना त्या क्षेत्रात वृक्ष असल्यास केवळ १० वृक्षांची कटाई करण्याचा शासनाचा जीआर असल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. तर विभागाच्या नियमानुसार जागेची मौका चौकशी वृक्षांचा पंचनामा, वृक्षाची गोलाई, उंची मोजून कापण्याची परवानगी देऊन कटाई केलेल्या झाडाची लाकडे वन विभागाच्या आगारात जमा केली जातात. मात्र सध्या खोततळ्याच्या नावावर जेसीबी लावून वृक्षांना मुळासकट खोदून त्यांना जाळण्याचा प्रकार सुरू आहे.मागील सहा महिन्यांपासून काम सुरूनवेगावबांध वनपरिक्षेत्रात जानेवारी २०१८ पासून खोततळी तयार करण्याचे काम कंत्राटदारामार्फत सुरू आहे. जिथे साधे खोदकाम करण्याची परवानगी नाही तिथे सुध्दा कंत्राटदार खोततळीचे खोदकाम जेसीबीच्या सहाय्याने सर्रासपण करीत आहेत. खोदकामादरम्यान मोठ्या प्रमाणात वृक्षांची कटाई केली जात असून या प्रकाराकडे वनविभागाचे अधिकारी डोळेझाक करीत असल्याचे चित्र आहे.कारवाईची जबाबदारी कुणाचीसंरक्षित वनक्षेत्रात कुठलेही काम करताना त्याच्या काटेकोर नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. नियमांचे उल्लघंन होत असल्याने संबंधितांवर कारवाई करण्याची गरज आहे. मात्र नवेगावबांध वनपरिक्षेत्रात खोततळीच्या नावावर सुरु असलेल्या वृक्षकटाईकडे सध्या कुणाचेच लक्ष नाही. तर काही वन अधिकाऱ्यांना हा प्रकार माहिती असून देखील ते कारवाई करण्यास टाळाटाळ करीत कारवाईची जबाबदारी नेमकी कुणाची असा सवाल वन्यजीवप्रेमींनी उपस्थित केला आहे.

टॅग्स :forestजंगलenvironmentवातावरण