शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
3
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
4
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
5
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
6
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
7
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
8
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
9
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
10
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
11
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
12
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
13
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
14
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
15
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
16
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
17
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
18
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
19
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
20
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार

खोत तळ्याच्या नावाखाली वृक्षांची कत्तल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2018 22:02 IST

पर्यावरणाच्या संवर्धनासाठी व जंगलाचे क्षेत्र वाढविण्यासाठी शासनातर्फे १३ कोटी वृक्ष लागवडीचा उपक्रम राबविला जात आहे. मात्र दुसरीकडे वनविभागाच्या दुर्लक्षित धोरणामुळे संरक्षित क्षेत्रातील वनांचा ऱ्हास होत आहे.

ठळक मुद्देसंरक्षित क्षेत्रात जेसीबीचा वापर : नवेगावबांध वनपरिक्षेत्रातील प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्कनवेगावबांध : पर्यावरणाच्या संवर्धनासाठी व जंगलाचे क्षेत्र वाढविण्यासाठी शासनातर्फे १३ कोटी वृक्ष लागवडीचा उपक्रम राबविला जात आहे. मात्र दुसरीकडे वनविभागाच्या दुर्लक्षित धोरणामुळे संरक्षित क्षेत्रातील वनांचा ऱ्हास होत आहे. खोततळी तयार करण्याच्या नावावर संरक्षित वनपरिक्षेत्रातील जेसीबी लावून कटाई सर्रासपणे कटाई केली जात असल्याचा प्रकार नवेगावबांध वनपरिक्षेत्रात सुरू आहे.दरवर्षी उन्हाळ्याच्या दिवसांत जंगलातील पानवठे कोरडे पडतात. त्यामुळे पाण्याच्या शोधात वन्यप्राण्यांची गावांकडे भटकंती सुरु होते. यामुळे वन्यप्राण्यांच्या शिकारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यासर्व प्रकाराला आळा घालण्यासाठी व जंगलामध्ये वन्यप्राण्यासाठी पाणीसाठा उपलब्ध करुन देण्याकरीता वनविभागाने यावर्षीपासून खोततळे तयार करण्याची योजना हाती घेतली आहे. खोततळे तयार करण्यासाठी २५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला.यापैकी १५ लाख रुपयांची कामे मनरेगातंर्गत तर १० लाख रुपयांची कुशल कामे केली जात आहे. सध्या नवेगावबांध वनपरिक्षेत्रात खोततळी तयार करण्याची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. वनविभागाने खोततळी तयार करण्याची कामे कंत्रादाराने दिली आहे. मात्र कंत्राटदारकडून खोततळी तयार करण्याच्या नावावर वृक्षांची कत्तल केली जात असल्याचा प्रकार सुरू आहे. हा सर्व प्रकार वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या डोळ्यादेखत सुरू असताना कंत्राटदारांवर कारवाई करण्याचे टाळले जात जात आहे.नियमांचे सर्रास उल्लघंनजंगलामध्ये खोततळे तयार करताना त्या क्षेत्रात वृक्ष असल्यास केवळ १० वृक्षांची कटाई करण्याचा शासनाचा जीआर असल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. तर विभागाच्या नियमानुसार जागेची मौका चौकशी वृक्षांचा पंचनामा, वृक्षाची गोलाई, उंची मोजून कापण्याची परवानगी देऊन कटाई केलेल्या झाडाची लाकडे वन विभागाच्या आगारात जमा केली जातात. मात्र सध्या खोततळ्याच्या नावावर जेसीबी लावून वृक्षांना मुळासकट खोदून त्यांना जाळण्याचा प्रकार सुरू आहे.मागील सहा महिन्यांपासून काम सुरूनवेगावबांध वनपरिक्षेत्रात जानेवारी २०१८ पासून खोततळी तयार करण्याचे काम कंत्राटदारामार्फत सुरू आहे. जिथे साधे खोदकाम करण्याची परवानगी नाही तिथे सुध्दा कंत्राटदार खोततळीचे खोदकाम जेसीबीच्या सहाय्याने सर्रासपण करीत आहेत. खोदकामादरम्यान मोठ्या प्रमाणात वृक्षांची कटाई केली जात असून या प्रकाराकडे वनविभागाचे अधिकारी डोळेझाक करीत असल्याचे चित्र आहे.कारवाईची जबाबदारी कुणाचीसंरक्षित वनक्षेत्रात कुठलेही काम करताना त्याच्या काटेकोर नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. नियमांचे उल्लघंन होत असल्याने संबंधितांवर कारवाई करण्याची गरज आहे. मात्र नवेगावबांध वनपरिक्षेत्रात खोततळीच्या नावावर सुरु असलेल्या वृक्षकटाईकडे सध्या कुणाचेच लक्ष नाही. तर काही वन अधिकाऱ्यांना हा प्रकार माहिती असून देखील ते कारवाई करण्यास टाळाटाळ करीत कारवाईची जबाबदारी नेमकी कुणाची असा सवाल वन्यजीवप्रेमींनी उपस्थित केला आहे.

टॅग्स :forestजंगलenvironmentवातावरण