शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
3
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
4
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
5
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
6
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
7
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
8
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
9
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
10
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
11
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
12
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
13
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
14
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
15
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
16
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
17
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
18
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
19
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
20
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाळ्यात वृक्षांची कत्तल

By admin | Updated: April 7, 2016 01:49 IST

दरवर्षी पावसाळ्याच्या सुरूवातीला मोठा गाजावाजा करून वृक्ष लागवडीचे ठराविक उद्दिष्ट साधण्यासाठी सर्वच स्तरावरून अनेक प्रकारचे प्रयत्न केले जाते.

तर पावसाळ्यात वृक्ष लागवड : बेकायदेशीर कृत्य बघून ग्रामस्थ संभ्रमातरावणवाडी : दरवर्षी पावसाळ्याच्या सुरूवातीला मोठा गाजावाजा करून वृक्ष लागवडीचे ठराविक उद्दिष्ट साधण्यासाठी सर्वच स्तरावरून अनेक प्रकारचे प्रयत्न केले जाते. मात्र हिवाळा-उन्हाळा लागताच खुलेआम वृक्षांची कत्तल होत असते. या बेकायदेशीर प्रकारला जवाबदार कोण? हा संशोधनाचा विषय ठरला आहे. राज्य आणि केंद्र सरकार जल, वायू प्रदूषणात दिवसेंदिवस होणारी वाढ बघून पर्यावरणाचा समतोल राखून ठेवण्याच्या उद्देशाने प्रत्येक वर्षाला कोट्यवधी रुपये खर्च करून वृक्ष लागवड योजना राबवितात. अनेक वर्षापूर्वीपासून वृक्ष लागवड केली जाते. शासनातर्फे ठरविण्यात आलेली उद्दिष्ट पूर्तीही होत असते. तरी लाकूड व्यवसायिकांना वृक्ष तोडीची परवानगी कशी आणि कोणाकडून दिली जाते, अशा सवाल जाणकार नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. हे बेकायदेशीर कृत्य बघून ग्रामीण भागातील जनता संभ्रमात पडली आहे. स्वत:च्या मालकीच्या घरामागील-पुढील किंवा शेतातील मालकीचे झाडे संबंधित विभागाच्या परवानगीशिवाय तोडता येणार नाही. एवढेच नव्हे तर परिसरातील अथवा घरापुढील भागातील बागबगीचा कुंडीतील झाडे नासधूस किंवा तोडून नेत असली तरी शेतशिवारातील अल्पशा असलेल्या वृक्षाची कत्तल होत असताना या प्रकरणावर आळा घालण्यासाठी कुणीच हिंमत करीत नाही. यामुळे हा बेकायदेशीर प्रकार तालुक्यात दिवसेंदिवस फोफावत चालला आहे. राज्य शासनाने फेकिंग आॅफ ट्री रेगुलेशन अ‍ॅक्ट १०६४ अन्वये तरतूद करून या कायद्यात अनेक दुरुस्त्या केल्या. १६ सप्टेंबर १९९२ ला राज्य शासनाने प्रकाशित केलेल्या कायद्याप्रमाणे वृक्षांवर स्वत:ची मालकी असो किंवा दुसऱ्याची, पूर्व परवानगीशिवाय वृक्ष तोडता किंवा उपटता येणार नाही. यात बऱ्याच वृक्षांच्या जातीचा समावेश करण्यात आला आहे. मात्र परिसरात वृक्षतोड जोमात चालली असून ग्रामीण भागात ठिकठिकाणी लाकडी फर्निचर तयार करण्याचा दुकानदाऱ्याही मोठ्या प्रमाणात सुरू झाल्या आहेत. मात्र यावर कारवाई करून आळा घालण्याची कोणीच हिंमत करीत नसल्यामुळे हा व्यवसाय जोमात चालला आहे. परवानगीशिवाय कोणत्याच व्यक्तीने झाडे तोडली तर कोणत्याही महसूल अधिकारी, कर्मचाऱ्याने किंवा पोलीस विभागाने किंवा वनाधिकाऱ्याने संबंधित अधिकाऱ्यास नियमाप्रमाणे सूचना देणे गरजेचे असते. मात्र असे होताना कधीच दिसून आले नाही. वृक्ष तोडण्यासाठी कुणी जरी कुऱ्हाड, अवजारे घेऊन जमा झाले असतील किंवा अन्य मार्गाने झाड तोडण्याची पूर्व तयारी केली असेल तर त्याने झाड तोडू नये. यासाठी उपाययोजना करण्याचा अधिकार महसूल विभागाचे अधिकारी, पोलीस अधिकारी, उपनिरीक्षक, वन अधिकाऱ्यास तोडलेली झाडे व त्यातून तयार करण्यात आलेली वस्तू जप्त करून कारवाई करण्याचा अधिकार आहे. मात्र कोणतेच विभाग असे धाडस करीत नाही. त्यामुळे अवैध वृक्षतोड व्यवसाय राजरोसपणे तालुक्यात जोमाने वाढली आहे. हे बेकायदेशीर प्रकार घडत असले तरी संबंधित अधिकारी या प्रकाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे कालांतराने जनतेला शुध्द हवेकरिता पाठीवर आॅक्सीजनचे सिलेंडरच घेऊन राहण्याची पाळी येणार आहे. या प्रकारावर वेळीच आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाने त्वरित दखल घ्यावी, अशी मागणी पर्यावरण प्रेमींनी केली आहे. (वार्ताहर)