शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

मानधनासाठी वृद्धेची सहा वर्षांपासून पायपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2019 22:08 IST

निराधारांना आर्थिक आधार देण्यासाठी शासनाच्या वतीने संजय गांधी निराधार योजना सुरू करण्यात आली. मात्र प्रशासकीय दप्तर दिंरगाई व शासनाच्या धोरणामुळे या योजनेपासून लाभार्थ्यांना वंचित राहावे लागत आहे.

ठळक मुद्देप्रशासनाचे दुर्लक्ष : जिल्हाधिकारी कार्यालयांने दिले निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कदेवरी : निराधारांना आर्थिक आधार देण्यासाठी शासनाच्या वतीने संजय गांधी निराधार योजना सुरू करण्यात आली. मात्र प्रशासकीय दप्तर दिंरगाई व शासनाच्या धोरणामुळे या योजनेपासून लाभार्थ्यांना वंचित राहावे लागत आहे.प्राप्त माहितीनुसार तालुक्यातील भागी (डवकी) येथील ताराबाई महादेव धरमशहारे या निराधार वृध्द महिलेचे मानधन २०१२ ते २०१८ या वर्षांपासून थकीत आहे. मात्र मागील सहा वर्षांपासून त्यांना या योजनेचे मानधन मिळाले नाही. ते मिळावे यासाठी त्या शासकीय कार्यालयाच्या पायऱ्या झिजवित आहे. मात्र दगडाचे मन असणाऱ्या प्रशासनाला अद्यापही पाझर फुटलेला नाही. निराधार ताराबाई धरमशहारे यांना २०१२ ते २०१९ पर्यंत या योजनेचा लाभ मिळण्यापासून वंचित आहेत. या योजनेतंर्गत मिळणारे मानधन बंद झाल्याने ताराबाईला औषध आणि उदरनिर्वाहाचा खर्च करण्याची अडचण निर्माण झाली आहे.देवरीचे तहसीलदार विजय बोरुडे यांनी नायब तहसीलदार के. टी. पराते यांना लवकरात लवकर काम करून देण्याचे आदेश दिले. मात्र यानंतरही ताराबाईचे मानधन देण्यात आले नाही. त्यामुळे तहसीलदारांच्या आदेशाला सुध्दा त्यांचे अधिनस्त कर्मचारी जुमानत नसल्याचे चित्र आहे.देवरी तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी त्यांची समस्या मार्गी लावत नसल्याने ताराबाईनी अखेर गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालय गाठून आपली आपबीती सांगितलीे. त्यांनंतर जिल्हा सहायक अधीक्षक यांनी देवरी तहसील कार्यालयाला पत्र देऊन योग्य कारवाही करुन प्रकरण मार्गी लावण्याचे निर्देश दिले आहे.सध्या निवडणूक आचारसंहिता असल्यामुळे दुसरी कामे सुरू आहे. ताराबाई धरमशहारे यांचे प्रकरण लवकरच मार्गी लावण्यात येईल.- के. टी. पराते, नायब तहसीलदार देवरी

टॅग्स :collectorजिल्हाधिकारी