शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
2
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
3
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
4
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
5
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
6
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
7
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
8
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
9
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
10
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
11
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
12
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
13
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
14
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
15
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
16
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
17
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
18
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
19
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

साहेब, अजून किती दिवस खड्ड्यांतूून प्रवास करायचा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:34 IST

सुरेंद्र भांडारकर मुंडीकोटा : तिरोडा तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. रस्त्यांवर खड्डे पडून त्यांची अक्षरक्ष: चाळण ...

सुरेंद्र भांडारकर

मुंडीकोटा : तिरोडा तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. रस्त्यांवर खड्डे पडून त्यांची अक्षरक्ष: चाळण झाली आहे. त्यामुळे या मार्गावरून ये-जा करणाऱ्या नागरिक आणि वाहन चालकांना त्रास सहन करावा लागत आहे. पण, अद्यापही या रस्त्यांची दुरुस्ती करण्यात आली नाही. त्यामुळे “साहेब, अजून किती दिवस खड्ड्यांतूनच प्रवास करायचा?” असा सवाल गावकरी उपस्थित करीत आहेत.

घोगरा ते देव्हाळा हा मार्ग पूर्णपणे उखडला असून, यात ठिकठिकाणी मोठे-मोठे खड्डे पडले आहेत. अनेक वर्षांपासून या रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली नाही. घोगरा ते पाटीलटोला व्हाया नवेगाव या रस्त्यावर काही वर्षांपूर्वी डांबरीकरण करण्यात आले होते. पण, अल्पावधीतच या रस्त्याचीसुद्धा दुरवस्था झाली. पाटीलटोला येथे झांझरिया कंपनी आहे. या कंपनीत घोगरा येथील २०० मजूर कामावर जात असतात. त्यामुळे रात्री-बेरात्री कामावर जातेवेळी तारेवरची कसरत करावी लागते. नवेगाव पाटीलटोला गावावरून हा रस्ता नवेगाव (खुर्द) येथे जोडला आहे. या रस्त्यांनी अनेक युवक अदानी तिरोडा येथे कामावर जात असतात. नवेगावकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला संतोषी माता मंदिर आहे. येथे अनेक भाविक दर्शनासाठी जात असतात. नवेगाव ते पाटीलटोला या रस्त्यावर मोठे-मोठे खड्डे पडले असून, त्या खड्ड्यांत पावसाचे पाणी साचून तळी तयार झाली आहेत.

........

शालेय विद्यार्थ्यांना बसतोय फटका

येडमाकोट ते केसलवाडा हा रस्ता जीर्ण झालेला असून, गिट्टी व मुरूम रस्त्यांच्या कडेला पडलेले दिसत आहे. येडमाकोट फाटा येथे प्रवासी निवारा आहे. या ठिकाणाहून गोंदिया ते नागपूरकडे एस.टी. बसेस धावत असतात. केसलवाडा येथील विद्यार्थी तुमसर ते तिरोडा येथे महाविद्यालयात जातात. पण, या रस्त्याची दुर्दशा झाली असल्याने विद्यार्थ्यांसह प्रवाशांनासुद्धा त्रास सहन करावा लागत आहे.

......

वर्षभरातच उखडतात रस्ते

नवेगाव ते मनोरा या रस्त्यावर काही वर्षांपूर्वी डांबरीकरण झाले होते. पण, हा रस्ता या वेळी जीर्ण झाला असून डांबर व गिट्टीचा पत्ताच नाही. रस्त्यावर मोठे-मोठे खड्डे पडलेले आहेत. मनोरावासी मुंडीकोटा हे गाव व्यापारपेठ असल्यामुळे देवाण-घेवाण करण्यासाठी मनोरा येथील नागरिकांची दिवसभर वर्दळ असते. मात्र रस्ता खराब असल्याने त्यांनासुद्धा त्रास सहन करावा लागतो. वर्षभरातच रस्ते खराब होत असल्याने बांधकामावर शंका निर्माण होत आहे.