शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

साहेब, अजून किती दिवस खड्ड्यांतूून प्रवास करायचा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:34 IST

सुरेंद्र भांडारकर मुंडीकोटा : तिरोडा तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. रस्त्यांवर खड्डे पडून त्यांची अक्षरक्ष: चाळण ...

सुरेंद्र भांडारकर

मुंडीकोटा : तिरोडा तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. रस्त्यांवर खड्डे पडून त्यांची अक्षरक्ष: चाळण झाली आहे. त्यामुळे या मार्गावरून ये-जा करणाऱ्या नागरिक आणि वाहन चालकांना त्रास सहन करावा लागत आहे. पण, अद्यापही या रस्त्यांची दुरुस्ती करण्यात आली नाही. त्यामुळे “साहेब, अजून किती दिवस खड्ड्यांतूनच प्रवास करायचा?” असा सवाल गावकरी उपस्थित करीत आहेत.

घोगरा ते देव्हाळा हा मार्ग पूर्णपणे उखडला असून, यात ठिकठिकाणी मोठे-मोठे खड्डे पडले आहेत. अनेक वर्षांपासून या रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली नाही. घोगरा ते पाटीलटोला व्हाया नवेगाव या रस्त्यावर काही वर्षांपूर्वी डांबरीकरण करण्यात आले होते. पण, अल्पावधीतच या रस्त्याचीसुद्धा दुरवस्था झाली. पाटीलटोला येथे झांझरिया कंपनी आहे. या कंपनीत घोगरा येथील २०० मजूर कामावर जात असतात. त्यामुळे रात्री-बेरात्री कामावर जातेवेळी तारेवरची कसरत करावी लागते. नवेगाव पाटीलटोला गावावरून हा रस्ता नवेगाव (खुर्द) येथे जोडला आहे. या रस्त्यांनी अनेक युवक अदानी तिरोडा येथे कामावर जात असतात. नवेगावकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला संतोषी माता मंदिर आहे. येथे अनेक भाविक दर्शनासाठी जात असतात. नवेगाव ते पाटीलटोला या रस्त्यावर मोठे-मोठे खड्डे पडले असून, त्या खड्ड्यांत पावसाचे पाणी साचून तळी तयार झाली आहेत.

........

शालेय विद्यार्थ्यांना बसतोय फटका

येडमाकोट ते केसलवाडा हा रस्ता जीर्ण झालेला असून, गिट्टी व मुरूम रस्त्यांच्या कडेला पडलेले दिसत आहे. येडमाकोट फाटा येथे प्रवासी निवारा आहे. या ठिकाणाहून गोंदिया ते नागपूरकडे एस.टी. बसेस धावत असतात. केसलवाडा येथील विद्यार्थी तुमसर ते तिरोडा येथे महाविद्यालयात जातात. पण, या रस्त्याची दुर्दशा झाली असल्याने विद्यार्थ्यांसह प्रवाशांनासुद्धा त्रास सहन करावा लागत आहे.

......

वर्षभरातच उखडतात रस्ते

नवेगाव ते मनोरा या रस्त्यावर काही वर्षांपूर्वी डांबरीकरण झाले होते. पण, हा रस्ता या वेळी जीर्ण झाला असून डांबर व गिट्टीचा पत्ताच नाही. रस्त्यावर मोठे-मोठे खड्डे पडलेले आहेत. मनोरावासी मुंडीकोटा हे गाव व्यापारपेठ असल्यामुळे देवाण-घेवाण करण्यासाठी मनोरा येथील नागरिकांची दिवसभर वर्दळ असते. मात्र रस्ता खराब असल्याने त्यांनासुद्धा त्रास सहन करावा लागतो. वर्षभरातच रस्ते खराब होत असल्याने बांधकामावर शंका निर्माण होत आहे.