शहरं
Join us  
Trending Stories
1
"अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
3
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
4
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू
5
माेफत शिका, तुम्हीही ‘एआय’ एक्स्पर्ट बना; केंद्राच्या स्वयम पोर्टलवर अनेक काेर्सेस उपलब्ध
6
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
7
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
8
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
9
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
10
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
11
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
12
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
13
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
14
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
15
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
16
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
18
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
19
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
20
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?

ग्रामसेवकांचा जिल्हा परिषदवर मूक मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 00:20 IST

ग्रामपंचायतच्या नियमीत कामाचा अतिरिक्त बोझा ग्रामसेवकांवर आहे. अतिरिक्त ताण, आर्थिक पिळवणूकीमुळे राज्यातील ५० ग्रामसेवकांनी मागील दोन वर्षात आत्महत्या केल्या. कामाच्या तणावात असताना ग्रामसेवकांचे झालेले अपघात व काही नागरिकांकडून १५०० ग्रामसेवकांवर झालेले प्राणघातक हल्ले .....

ठळक मुद्देप्रश्नांकडे वेधले लक्ष : १५०० ग्रामसेवकांवर प्राणघातक हल्ले

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : ग्रामपंचायतच्या नियमीत कामाचा अतिरिक्त बोझा ग्रामसेवकांवर आहे. अतिरिक्त ताण, आर्थिक पिळवणूकीमुळे राज्यातील ५० ग्रामसेवकांनी मागील दोन वर्षात आत्महत्या केल्या. कामाच्या तणावात असताना ग्रामसेवकांचे झालेले अपघात व काही नागरिकांकडून १५०० ग्रामसेवकांवर झालेले प्राणघातक हल्ले याचा निषेध नोंदविण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्या नेतृत्त्वात बुधवारी (दि.२४) जिल्हा परिषदेवर मूक मोर्चा काढण्यात आला.ग्रामीण जनतेशी निगडीत कामे करताना ग्रामसेवकांना बऱ्याच तणावात राहावे लागते. गाव पातळीवर तलाठी, कृषी सहाय्यक, आरोग्य सेवक, वॉयरमन, ग्रामविकास सोसायटीचे सचिव, अंगणवाडी सेविका, मुख्याध्यापक, शिक्षक हे घटक असतानाही त्यांची कामे ग्रामसेवकांकडे सोपविली जातात. कर्जमाफी फार्म भरणे, कर्जासंबधी ग्रामसभा, बोंडअळीचे पंचनामे, घर विद्युत सर्वेक्षण, कृषी पिक विमा, पीक कापणी प्रयोग, मतदार याद्या सर्वेक्षण, पाणलोटाची कामे, नवीन वाळू धोरण, स्वच्छ भारत मिशन, महसूल विभागाच्या वैयक्तीक लाभाच्या योजना, बोगस रेशनकार्ड मोहीम अशी विविध कामे दिली जातात. मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांचा दबाव, विना चौकशी, विना नोटीसाने निलंबित केले जाते. वेतनवाढ बंद करणे, विना पगारी करणे, यामुळे त्रस्त झालेल्या ग्रामसेवकांचे कुणीही ऐकायला तयार नाहीत. त्यामुळे ग्रामसेवकांनी बुधवारी जिल्हा परिषदेवर मूक मोर्चा काढून त्यांच्या समस्यांकडे शासन आणि प्रशासाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. धुळे जिल्ह्याच्या गोंदूर येथील ग्रामसेवक एस.बी.वाघ यांना आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. मोर्च्याचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष कमलेश बिसेन, सचिव दयानंद फटींग, मानद अध्यक्ष कार्तिक चव्हाण, उपाध्यक्ष सचिन कुथे, कविता बागडे,, एल.आर.ठाकरे, सुनील पटले, सुरेश वाघमारे, ओ. के. रहांगडाले, सुषमा वाढई, सुभाष सिरसाम, रामेश्वर जमईवार, परमेश्वर नेवारे, योगेश रूद्रकार, पांडुरंग हरिणखेडे, धर्मेंद्र पारधी, ओ.जी. बिसेन, रितेश शहारे, तारेश कुबडे यांनी केले.