शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

ग्रामसेवकांचा जिल्हा परिषदवर मूक मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 00:20 IST

ग्रामपंचायतच्या नियमीत कामाचा अतिरिक्त बोझा ग्रामसेवकांवर आहे. अतिरिक्त ताण, आर्थिक पिळवणूकीमुळे राज्यातील ५० ग्रामसेवकांनी मागील दोन वर्षात आत्महत्या केल्या. कामाच्या तणावात असताना ग्रामसेवकांचे झालेले अपघात व काही नागरिकांकडून १५०० ग्रामसेवकांवर झालेले प्राणघातक हल्ले .....

ठळक मुद्देप्रश्नांकडे वेधले लक्ष : १५०० ग्रामसेवकांवर प्राणघातक हल्ले

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : ग्रामपंचायतच्या नियमीत कामाचा अतिरिक्त बोझा ग्रामसेवकांवर आहे. अतिरिक्त ताण, आर्थिक पिळवणूकीमुळे राज्यातील ५० ग्रामसेवकांनी मागील दोन वर्षात आत्महत्या केल्या. कामाच्या तणावात असताना ग्रामसेवकांचे झालेले अपघात व काही नागरिकांकडून १५०० ग्रामसेवकांवर झालेले प्राणघातक हल्ले याचा निषेध नोंदविण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्या नेतृत्त्वात बुधवारी (दि.२४) जिल्हा परिषदेवर मूक मोर्चा काढण्यात आला.ग्रामीण जनतेशी निगडीत कामे करताना ग्रामसेवकांना बऱ्याच तणावात राहावे लागते. गाव पातळीवर तलाठी, कृषी सहाय्यक, आरोग्य सेवक, वॉयरमन, ग्रामविकास सोसायटीचे सचिव, अंगणवाडी सेविका, मुख्याध्यापक, शिक्षक हे घटक असतानाही त्यांची कामे ग्रामसेवकांकडे सोपविली जातात. कर्जमाफी फार्म भरणे, कर्जासंबधी ग्रामसभा, बोंडअळीचे पंचनामे, घर विद्युत सर्वेक्षण, कृषी पिक विमा, पीक कापणी प्रयोग, मतदार याद्या सर्वेक्षण, पाणलोटाची कामे, नवीन वाळू धोरण, स्वच्छ भारत मिशन, महसूल विभागाच्या वैयक्तीक लाभाच्या योजना, बोगस रेशनकार्ड मोहीम अशी विविध कामे दिली जातात. मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांचा दबाव, विना चौकशी, विना नोटीसाने निलंबित केले जाते. वेतनवाढ बंद करणे, विना पगारी करणे, यामुळे त्रस्त झालेल्या ग्रामसेवकांचे कुणीही ऐकायला तयार नाहीत. त्यामुळे ग्रामसेवकांनी बुधवारी जिल्हा परिषदेवर मूक मोर्चा काढून त्यांच्या समस्यांकडे शासन आणि प्रशासाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. धुळे जिल्ह्याच्या गोंदूर येथील ग्रामसेवक एस.बी.वाघ यांना आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. मोर्च्याचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष कमलेश बिसेन, सचिव दयानंद फटींग, मानद अध्यक्ष कार्तिक चव्हाण, उपाध्यक्ष सचिन कुथे, कविता बागडे,, एल.आर.ठाकरे, सुनील पटले, सुरेश वाघमारे, ओ. के. रहांगडाले, सुषमा वाढई, सुभाष सिरसाम, रामेश्वर जमईवार, परमेश्वर नेवारे, योगेश रूद्रकार, पांडुरंग हरिणखेडे, धर्मेंद्र पारधी, ओ.जी. बिसेन, रितेश शहारे, तारेश कुबडे यांनी केले.