शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
टेस्टमधील खतरनाक स्पेल! स्टार्कनं १५ चेंडूत २ धावा खर्च करत साधला ५ विकेट्सचा विश्वविक्रमी डाव
5
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
6
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
7
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
8
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
9
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
10
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
11
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
12
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
13
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

राजकारण व देश विकासात उत्तर भारतीयांचे महत्त्वपूर्ण योगदान ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:31 IST

गोंदिया : उत्तर प्रदेश भारतात विकास नीती व राजकारणाची दिशा ठरविणारे महत्त्वपूर्ण राज्य आहे. उत्तर भारतीयांना देशातील कानाकोपऱ्यात पोहोचून ...

गोंदिया : उत्तर प्रदेश भारतात विकास नीती व राजकारणाची दिशा ठरविणारे महत्त्वपूर्ण राज्य आहे. उत्तर भारतीयांना देशातील कानाकोपऱ्यात पोहोचून आपली विशिष्ट ओळख निर्माण करून उत्तर भारतीय संस्कृतीचा राष्ट्रव्यापी प्रसार केला आहे. राजकारण व देश विकासात उत्तर भारतीयांचे महत्त्वपूर्ण असून आता त्यांनी भाजपशी जुळून नरेंद्र मोदींच्या हाताला अधिक मजबूत करावे असे प्रतिपादन माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले.

भारतीय जनता पक्षाचे संस्थापक पं. दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त आयोजित उत्तर भारतीय मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. याप्रसंगी भाजप उत्तर भारतीय मोर्चाचे प्रदेश सचिव गोपाल गुप्ता प्रामुख्याने उपस्थित होते. गुप्ता यांनी, उत्तर भारतीयांचा नेहमीच भाजपकडे कल राहिला असून भाजप उत्तर भारतीयांच्या हितांच्या रक्षणासाठी नेहमीच तत्पर असल्याचे मत व्यक्त केले. बैठकीला उत्तर भारतीय मोर्चा जिल्हाध्यक्ष अमित झा, नगरसेवक सुनील तिवारी, क्रांती जायस्वाल, दिलीप गोपलानी, जयंत शुक्ला, व्यंकट पाथरू, अरुण दुबे, अभय सावंत, शंभूशरण ठाकूर, ताजेंद्रसिंग छाबडा, संदीप ठाकूर, दीपक अग्रवाल, नितेश अग्रवाल यांच्यासह मोठ्या संख्येत पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.