शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
3
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
4
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
5
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
6
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
7
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
8
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
9
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
10
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
11
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
12
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
13
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
14
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
15
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
16
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
17
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
18
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
19
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
20
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ

सुकडीत २७ जोडप्यांचे शुभमंगल

By admin | Updated: April 29, 2016 01:48 IST

एकीकडे सामूहिक विवाह सोहळ्यांमध्ये विवाह करणाऱ्या जोडप्यांची संख्या कमी होत असताना सुकडीसारख्या लहान गावात ही संख्या वाढत आहे.

सर्वधर्र्मीय सामूहिक विवाह : सामाजिक बांधिलकी जोपासणारी ११ वर्षांची परंपरागोंदिया : एकीकडे सामूहिक विवाह सोहळ्यांमध्ये विवाह करणाऱ्या जोडप्यांची संख्या कमी होत असताना सुकडीसारख्या लहान गावात ही संख्या वाढत आहे. चक्रधर स्वामींच्या या पावन भूमित सर्व जातीधर्माच्या जोडप्यांचे विवाह एका मंडपात करण्याची ही परंपरा सामाजिक बांधीलकी जोपासणारी आहे. यातून सामाजिक सलोखा वाढण्यास मदत होत असून असंख्य गोरगरीबांचे लग्न थाटामाटात लावले जात असल्यामुळे त्यांचे आशीर्वाद मिळत आहेत. अशा उपक्रमासाठी खा.प्रफुल्ल पटेल यांच्यासह आमच्या सर्वांच्या मनापासून शुभेच्छा आहेत, अशा शब्दात मनोहरभाई पटेल अकादमीच्या अध्यक्ष वर्षा पटेल आणि आ.राजेंद्र जैन यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.सुकडी डाकराम येथे बुधवारी सायंकाळी भरगच्च नागरिकांच्या उपस्थितीत झालेल्या सर्वधर्मिय सामूहिक विवाह सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. अत्यंत उत्साहात पण तेवढ्याच शिस्तबद्धरित्या पार पडलेल्या या सामूहिक विवाह सोहळ्यात हिंदू धर्मिय १९ आणि बौद्ध धर्मिय ८ जोडप्यांचे शुभमंगल झाले. विशेष म्हणजे त्यात २ आंतरजातीय विवाहसुद्धा होते. या सोहळ्याला अतिथी म्हणून आ.राजेंद्र जैन, वर्षा पटेल, मुख्य आयोजक माजी आ.दिलीप बन्सोड, माजी आ.भजनदास वैद्य, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष के.आर.शेंडे, म्हाडाचे माजी सभापती नरेश माहेश्वरी, माजी जि.प.उपाध्यक्ष पंचम बिसेन, मदन पटले, जिल्हा बँकेचे संचालक राधेलाल पटले, जि.प.सदस्य मनोज डोंगरे, जि.प.सदस्य पटले, गोरेगाव पं.स.सदस्य केवलराम बघेले, डॉ.नामदेव किरसान, पंचायत समिती सभापती शकुंतला परतेकी, अदानी फाउंडेशनचे सुबोधसिंग, तसेच श्रीकृष्ण धर्म व पारमार्थिक आयोजन समितीचे पदाधिकारी प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते. चक्रधारी स्वामीच्या मठ परिसरात उभारलेल्या भव्य शामियान्यात सायंकाळी ५ वाजता या विवाह सोहळ्यास सुरूवात झाली. सुरूवातीला या सोहळ्याचे मुख्य आयोजक माजी आ.दिलीप बन्सोड यांनी प्रास्ताविकातून ११ वर्षापासून सुरू असलेल्या या उपक्रमाची माहिती दिली. सर्वांच्या सहकार्यातून ही परंपरा अविरतपणे सुरू ठेवणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. महानुभवाव पंथाचे प्रमुख साळकर बाबा यांनी आपल्या मार्गदर्शनातून सांगितले की, ८०० वर्षापूर्वी हे मंदिर तयार झाले. येथे पूर्वी फक्त दुखी कष्टी लोकच येत होते. पण गोरगरीबांचे विवाह होत नव्हे. पण आज अशा सर्वधर्मिय विवाह सोहळ्यातून गोरगरीबांच्या संसाराची सुरूवात होत आहे ही गोष्टी फार महत्वाची असल्याचे ते म्हणाले. या विवाह सोहळ्यानंतर संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन त्याच ठिकाणी केले होते. हजारो वऱ्हाडाने शांततेत भोजन ग्रहण केले. (जिल्हा प्रतिनिधी)प्रत्येक जोडप्याला मिळाल्या भेटवस्तूया सोहळ्यात एकूण २६ जोडप्यांची नोंदणी झाली होती. मात्र सर्व तयारीनंतर आलेल्या एका जोडप्यालाही समाविष्ठ करण्यात आले. ठरल्यानुसार त्या सर्व जोडप्यांना आलमारी, पलंग, गादी यासह इतर संसारोपयोगी १२ वस्तू भेट म्हणून देण्यात आल्या. या वस्तूंसाठी माजी आ.दिलीप बन्सोड, अर्चनाताई बन्सोड यांच्यासह बबनदास रामटेके, अमृतलाल असाटी, राजेंद्र अग्रवाल, चंद्रशेखर गजभिये, शतुंतला परतेकी, जगन धुर्वे, राजेश कटरे, गजानन नंदागवळी तसेच अदानी फाऊंडेशनच्या वतीने मदत करण्यात आली.