शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
2
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
3
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
4
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
5
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
6
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
7
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
8
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
9
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
10
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
11
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
12
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
13
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
14
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
15
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
16
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
17
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
18
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
19
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, न्याय विभागाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
20
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
Daily Top 2Weekly Top 5

सुकडीत २७ जोडप्यांचे शुभमंगल

By admin | Updated: April 29, 2016 01:48 IST

एकीकडे सामूहिक विवाह सोहळ्यांमध्ये विवाह करणाऱ्या जोडप्यांची संख्या कमी होत असताना सुकडीसारख्या लहान गावात ही संख्या वाढत आहे.

सर्वधर्र्मीय सामूहिक विवाह : सामाजिक बांधिलकी जोपासणारी ११ वर्षांची परंपरागोंदिया : एकीकडे सामूहिक विवाह सोहळ्यांमध्ये विवाह करणाऱ्या जोडप्यांची संख्या कमी होत असताना सुकडीसारख्या लहान गावात ही संख्या वाढत आहे. चक्रधर स्वामींच्या या पावन भूमित सर्व जातीधर्माच्या जोडप्यांचे विवाह एका मंडपात करण्याची ही परंपरा सामाजिक बांधीलकी जोपासणारी आहे. यातून सामाजिक सलोखा वाढण्यास मदत होत असून असंख्य गोरगरीबांचे लग्न थाटामाटात लावले जात असल्यामुळे त्यांचे आशीर्वाद मिळत आहेत. अशा उपक्रमासाठी खा.प्रफुल्ल पटेल यांच्यासह आमच्या सर्वांच्या मनापासून शुभेच्छा आहेत, अशा शब्दात मनोहरभाई पटेल अकादमीच्या अध्यक्ष वर्षा पटेल आणि आ.राजेंद्र जैन यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.सुकडी डाकराम येथे बुधवारी सायंकाळी भरगच्च नागरिकांच्या उपस्थितीत झालेल्या सर्वधर्मिय सामूहिक विवाह सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. अत्यंत उत्साहात पण तेवढ्याच शिस्तबद्धरित्या पार पडलेल्या या सामूहिक विवाह सोहळ्यात हिंदू धर्मिय १९ आणि बौद्ध धर्मिय ८ जोडप्यांचे शुभमंगल झाले. विशेष म्हणजे त्यात २ आंतरजातीय विवाहसुद्धा होते. या सोहळ्याला अतिथी म्हणून आ.राजेंद्र जैन, वर्षा पटेल, मुख्य आयोजक माजी आ.दिलीप बन्सोड, माजी आ.भजनदास वैद्य, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष के.आर.शेंडे, म्हाडाचे माजी सभापती नरेश माहेश्वरी, माजी जि.प.उपाध्यक्ष पंचम बिसेन, मदन पटले, जिल्हा बँकेचे संचालक राधेलाल पटले, जि.प.सदस्य मनोज डोंगरे, जि.प.सदस्य पटले, गोरेगाव पं.स.सदस्य केवलराम बघेले, डॉ.नामदेव किरसान, पंचायत समिती सभापती शकुंतला परतेकी, अदानी फाउंडेशनचे सुबोधसिंग, तसेच श्रीकृष्ण धर्म व पारमार्थिक आयोजन समितीचे पदाधिकारी प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते. चक्रधारी स्वामीच्या मठ परिसरात उभारलेल्या भव्य शामियान्यात सायंकाळी ५ वाजता या विवाह सोहळ्यास सुरूवात झाली. सुरूवातीला या सोहळ्याचे मुख्य आयोजक माजी आ.दिलीप बन्सोड यांनी प्रास्ताविकातून ११ वर्षापासून सुरू असलेल्या या उपक्रमाची माहिती दिली. सर्वांच्या सहकार्यातून ही परंपरा अविरतपणे सुरू ठेवणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. महानुभवाव पंथाचे प्रमुख साळकर बाबा यांनी आपल्या मार्गदर्शनातून सांगितले की, ८०० वर्षापूर्वी हे मंदिर तयार झाले. येथे पूर्वी फक्त दुखी कष्टी लोकच येत होते. पण गोरगरीबांचे विवाह होत नव्हे. पण आज अशा सर्वधर्मिय विवाह सोहळ्यातून गोरगरीबांच्या संसाराची सुरूवात होत आहे ही गोष्टी फार महत्वाची असल्याचे ते म्हणाले. या विवाह सोहळ्यानंतर संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन त्याच ठिकाणी केले होते. हजारो वऱ्हाडाने शांततेत भोजन ग्रहण केले. (जिल्हा प्रतिनिधी)प्रत्येक जोडप्याला मिळाल्या भेटवस्तूया सोहळ्यात एकूण २६ जोडप्यांची नोंदणी झाली होती. मात्र सर्व तयारीनंतर आलेल्या एका जोडप्यालाही समाविष्ठ करण्यात आले. ठरल्यानुसार त्या सर्व जोडप्यांना आलमारी, पलंग, गादी यासह इतर संसारोपयोगी १२ वस्तू भेट म्हणून देण्यात आल्या. या वस्तूंसाठी माजी आ.दिलीप बन्सोड, अर्चनाताई बन्सोड यांच्यासह बबनदास रामटेके, अमृतलाल असाटी, राजेंद्र अग्रवाल, चंद्रशेखर गजभिये, शतुंतला परतेकी, जगन धुर्वे, राजेश कटरे, गजानन नंदागवळी तसेच अदानी फाऊंडेशनच्या वतीने मदत करण्यात आली.