शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

श्रावणबाळ संजय गांधी निराधार मानधनाविनाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:54 IST

केशोरी : महाराष्ट्र शासनाने श्रावणबाळ व संजय गांधी निराधार योजना यांसारख्या लोकहिताच्या योजना कार्यान्वित करून निराधारांना स्वाभिमानाने जगण्याचे बळ ...

केशोरी : महाराष्ट्र शासनाने श्रावणबाळ व संजय गांधी निराधार योजना यांसारख्या लोकहिताच्या योजना कार्यान्वित करून निराधारांना स्वाभिमानाने जगण्याचे बळ दिले आहे. परंतु गेल्या ६ महिन्यांपासून श्रावण बाळ व संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना मानधनाचे वाटप न केल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीचे संकट ओढावले आहे. त्यांना इतर लोकांसमोर हात पसरून भीक मागण्याची वेळ आली आहे.

शासनाकडून लोकहिताच्या राबविण्यात येणाऱ्या श्रावण बाळ व संजय गांधी निराधार योजनांचे मानधन वितरणात कमालीची अनियमितता आली आहे. गेल्या ६ महिन्यांपासून या योजनेतील लाभार्थ्यांना मानधन वितरण करण्यात आले नाही. लाभार्थी वारंवार स्थानिक बँकेतील शाखेत जाऊन कर्मचाऱ्यांना मानधनाविषयी विचारणा करीत असल्याचे दिसून येत आहे. संजय गांधी व श्रावण बाळ योजनेचे मानधन न मिळाल्यामुळे लाभार्थ्यांवर उपासमारीचे संकट ओढावले आहे. निराधारांना आधार देण्यासाठी श्रावण बाळ व संजय गांधी निराधार योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. मात्र, या योजनांचा लाभ लाभार्थ्यांना वेळेवर मिळत नसेल तर त्या योजना कार्यान्वित करून काय उपयोग, असा प्रश्न लाभार्थ्यांना पडला आहे. लाभार्थ्यांना मानधन न मिळाल्याने आपला स्वाभिमान विसरून भीक मागून पोट भरण्याची वेळ आली आहे. याकडे तहसीलदारांनी स्वत: लक्ष देऊन त्या लाभार्थ्यांचे गेल्या ६ महिन्यांपासून अडलेले मानधन त्वरित त्यांच्या बँक खात्यात पाठविण्याची कार्यवाही करावी, अशी मागणी लाभार्थ्यांनी केली आहे.