शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
6
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
7
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
8
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
9
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
10
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
11
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
12
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
13
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
14
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
15
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
16
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
17
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
18
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
19
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

श्रावणबाळ संजय गांधी निराधार मानधनाविनाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:54 IST

केशोरी : महाराष्ट्र शासनाने श्रावणबाळ व संजय गांधी निराधार योजना यांसारख्या लोकहिताच्या योजना कार्यान्वित करून निराधारांना स्वाभिमानाने जगण्याचे बळ ...

केशोरी : महाराष्ट्र शासनाने श्रावणबाळ व संजय गांधी निराधार योजना यांसारख्या लोकहिताच्या योजना कार्यान्वित करून निराधारांना स्वाभिमानाने जगण्याचे बळ दिले आहे. परंतु गेल्या ६ महिन्यांपासून श्रावण बाळ व संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना मानधनाचे वाटप न केल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीचे संकट ओढावले आहे. त्यांना इतर लोकांसमोर हात पसरून भीक मागण्याची वेळ आली आहे.

शासनाकडून लोकहिताच्या राबविण्यात येणाऱ्या श्रावण बाळ व संजय गांधी निराधार योजनांचे मानधन वितरणात कमालीची अनियमितता आली आहे. गेल्या ६ महिन्यांपासून या योजनेतील लाभार्थ्यांना मानधन वितरण करण्यात आले नाही. लाभार्थी वारंवार स्थानिक बँकेतील शाखेत जाऊन कर्मचाऱ्यांना मानधनाविषयी विचारणा करीत असल्याचे दिसून येत आहे. संजय गांधी व श्रावण बाळ योजनेचे मानधन न मिळाल्यामुळे लाभार्थ्यांवर उपासमारीचे संकट ओढावले आहे. निराधारांना आधार देण्यासाठी श्रावण बाळ व संजय गांधी निराधार योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. मात्र, या योजनांचा लाभ लाभार्थ्यांना वेळेवर मिळत नसेल तर त्या योजना कार्यान्वित करून काय उपयोग, असा प्रश्न लाभार्थ्यांना पडला आहे. लाभार्थ्यांना मानधन न मिळाल्याने आपला स्वाभिमान विसरून भीक मागून पोट भरण्याची वेळ आली आहे. याकडे तहसीलदारांनी स्वत: लक्ष देऊन त्या लाभार्थ्यांचे गेल्या ६ महिन्यांपासून अडलेले मानधन त्वरित त्यांच्या बँक खात्यात पाठविण्याची कार्यवाही करावी, अशी मागणी लाभार्थ्यांनी केली आहे.