शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
2
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
3
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
4
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
5
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
6
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
7
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
8
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
9
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
10
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
11
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
12
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
13
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
14
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
15
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
16
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
17
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
18
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
19
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
20
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...

श्रावणबाळ संजय गांधी निराधार मानधनाविनाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:54 IST

केशोरी : महाराष्ट्र शासनाने श्रावणबाळ व संजय गांधी निराधार योजना यांसारख्या लोकहिताच्या योजना कार्यान्वित करून निराधारांना स्वाभिमानाने जगण्याचे बळ ...

केशोरी : महाराष्ट्र शासनाने श्रावणबाळ व संजय गांधी निराधार योजना यांसारख्या लोकहिताच्या योजना कार्यान्वित करून निराधारांना स्वाभिमानाने जगण्याचे बळ दिले आहे. परंतु गेल्या ६ महिन्यांपासून श्रावण बाळ व संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना मानधनाचे वाटप न केल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीचे संकट ओढावले आहे. त्यांना इतर लोकांसमोर हात पसरून भीक मागण्याची वेळ आली आहे.

शासनाकडून लोकहिताच्या राबविण्यात येणाऱ्या श्रावण बाळ व संजय गांधी निराधार योजनांचे मानधन वितरणात कमालीची अनियमितता आली आहे. गेल्या ६ महिन्यांपासून या योजनेतील लाभार्थ्यांना मानधन वितरण करण्यात आले नाही. लाभार्थी वारंवार स्थानिक बँकेतील शाखेत जाऊन कर्मचाऱ्यांना मानधनाविषयी विचारणा करीत असल्याचे दिसून येत आहे. संजय गांधी व श्रावण बाळ योजनेचे मानधन न मिळाल्यामुळे लाभार्थ्यांवर उपासमारीचे संकट ओढावले आहे. निराधारांना आधार देण्यासाठी श्रावण बाळ व संजय गांधी निराधार योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. मात्र, या योजनांचा लाभ लाभार्थ्यांना वेळेवर मिळत नसेल तर त्या योजना कार्यान्वित करून काय उपयोग, असा प्रश्न लाभार्थ्यांना पडला आहे. लाभार्थ्यांना मानधन न मिळाल्याने आपला स्वाभिमान विसरून भीक मागून पोट भरण्याची वेळ आली आहे. याकडे तहसीलदारांनी स्वत: लक्ष देऊन त्या लाभार्थ्यांचे गेल्या ६ महिन्यांपासून अडलेले मानधन त्वरित त्यांच्या बँक खात्यात पाठविण्याची कार्यवाही करावी, अशी मागणी लाभार्थ्यांनी केली आहे.