शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

नागपंचमीला श्रावणसरी बरसल्या नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:34 IST

आमगाव : दरवर्षी नागपंचमीला पावसाची रिमझिम सुरू असते, असा आतापर्यंतचा अनुभव आहे; परंतु या नागपंचमीला श्रावणसरी बरसल्याच नाहीत. साेमवार ...

आमगाव : दरवर्षी नागपंचमीला पावसाची रिमझिम सुरू असते, असा आतापर्यंतचा अनुभव आहे; परंतु या नागपंचमीला श्रावणसरी बरसल्याच नाहीत. साेमवार (दि. ९)पासून श्रावण महिना सुरू झाला तरी अद्याप जिल्ह्यात श्रावण सरी बसरल्या नाहीत. तालुक्याला अजूनही श्रावणसरींची प्रतीक्षा आहे.

श्रावणात ऊन-पावसाचा खेळ रंगतो. ढगांच्या आडून डोकावणाऱ्या सूर्यकिरणांमुळे इंद्रधनुष्याचे मनोहर दृश्य मन मोहवून टाकते. तृणांवरील पाण्याचे बिंदू मोत्यांसारखे चकाकतात. मात्र यंदा अद्याप तरी हे सृष्टीचे असे विलोभनीय रूप पाहायला मिळालेले नाही. सर्वचजण श्रावणसरींची वाट पाहत आहेत. नागपंचमीला पावसाची झडी राहते, हा नेहमीचाच अनुभव आहे. मात्र, यंदा पावसाने दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांचे डोळे आभाळाकडे लागले आहेत. रोज आकाशात काळ्या ढगांचा समूह पाहायला मिळतो. त्यामुळे श्रावणसरींची अपेक्षाही फोल ठरते. श्रावणात धो-धाे पाऊस कोसळतो अन् काही वेळात ऊन पडते. असे दृश्य यंदाच्या श्रावण महिन्यात अजूनही डोळ्यांना दिसले नाही. बळिराजाही केव्हा वरुणराजाची कृपा होते, याचीच वाट बघत आहे; कारण जमिनीच्या कुशीतून डोके वर काढलेल्या कोंबांना जिवंत राहण्यासाठी श्रावणसरींच्या गारव्याची आवश्यकता आहे.

श्रावणमासी हर्ष मानसी

हिरवळ दाटे चोहीकडे

क्षणात येते सरसर शिरवे

क्षणात फिरुनी ऊन पडे

निसर्गकवी बालकवी यांच्या या काव्यानुसार श्रावणात पाऊस आणि ऊन लपाछपी खेळत असताना क्षणात सरसर पाऊस पडतो तर क्षणात पुन्हा पिवळे ऊन पडते; परंतु असे दृश्य या श्रावणात बघावयास मिळाले नाही. पावसाने गेल्या १५ दिवसांपासून दडी मारल्यामुळे जिल्ह्यातील सरासरी तापमान हे ३१ अंशांवर पोहोचले आहे. उकाडा असह्य होत आहे. त्यामुळे पुन्हा गार हवा हवीहवीशी वाटू लागली आहे.