शहरं
Join us  
Trending Stories
1
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
2
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
5
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
6
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
7
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
8
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
9
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
10
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
15
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
16
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
19
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
20
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे

वादळी वाऱ्यातील नुकसानग्रस्तांना लवकरच भरपाई

By admin | Updated: March 22, 2017 01:26 IST

मागील वर्षी आलेल्या वादळी वाऱ्यामुळे कित्येक शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी आमचे प्रयत्न सुरू होते.

गोंदिया : मागील वर्षी आलेल्या वादळी वाऱ्यामुळे कित्येक शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी आमचे प्रयत्न सुरू होते. आता लवकरच या नुकसानग्रस्तांना शासनाकडून योग्य ती भरपाई मिळणार असल्याचे प्रतिपादन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले. तालुक्यातील ग्राम पांढराबोडी व एकोडी येथे १.५० कोटींच्या विविध विकासकामांच्या भूमीपूजन प्रसंगी ते बोलत होते. या विकासकामांतर्गत ग्राम पाढराबोडी येथे ६० लाख रूपयांच्या निधीतून विठ्ठल-रूक्मीनी मंदिर- हिवरा मार्ग लोकार्पण, दोन लाख रूपयांच्या निधीतून ग्रामीण सिमेंट रस्ता बांधकाम, ग्राम एकोडी येथे १० लाख रूपयांच्या निधीतून एकोडी-रामपूरी रस्ता डांबरीकरण, १७ लाख रूपयांच्या निधीतून जिल्हा परिषद शाळेत दोन वर्ग खोल्यांचे बांधकाम, दलीत वस्ती सुधार योजनेंतर्गत तीन लाख रूपयांच्या निधीतून रस्ता सिमेंटीकरण, तीन लाख रूपयांच्या निधीतून रामपूरी रस्ता सिमेंटीकरण व जिल्हा निधींतर्गत २.५० लाख रूपयांच्या निधीतून रस्ता सिमेंटीकरणाचे भूमीपूजन करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा परिषदेतील कॉंँग्रेस गटनेता रमेश अंबुले, जि.प.सभापती विमल नागपूरे, सदस्य शेखर पटले, भोमराज चुलपार, पं.स.उपसभापती ओमप्रकाश भक्तवर्ती, सदस्य हरिचंद कावळे, बंटी भेलावे, निता पटले, विनिता टेंभरे, डिलेश्वरी लिल्हारे, प्रमिला करचाल, चमन बिसेन, माजी जि.प.सदस्य रमेश लिल्हारे, शकुंतला खजरे, माजी सदस्य बंडू शेंडे, मदन लिल्हारे, सरपंच निर्मला सुलाखे, उपसरपंच संजय वैद्य यांच्यासह मोठ्या संख्येत अन्य प्रतिनिधी व नागरीक उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)