शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
2
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
3
अस्तनीतले निखारे! पहलगाम मुद्द्यावर काही भारतीयांचा पाकिस्तानला पाठिंबा! आतापर्यंत ३७ जणांना अटक
4
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
5
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
6
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
7
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
8
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
9
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
10
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
11
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
12
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
13
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
14
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
15
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
16
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
17
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
18
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
19
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
20
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार

वाहकांच्या कमतरतेमुळे उन्हाळी हंगामाचे नियोजन लांबले

By admin | Updated: March 4, 2017 00:10 IST

सुरक्षित प्रवासाचे ब्रीद घेऊन धावणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस संचालित करण्यासाठी गोंदिया व तिरोडा आगारात चालक-वाहकांची कमतरता आहे.

गोंदिया व तिरोडा आगार : शाळा बंद झाल्यावर अतिरिक्त बसेस सुरू होणार गोंदिया : सुरक्षित प्रवासाचे ब्रीद घेऊन धावणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस संचालित करण्यासाठी गोंदिया व तिरोडा आगारात चालक-वाहकांची कमतरता आहे. त्यामुळे दोन्ही आगारांचे उन्हाळी नियोजन लांबणीवर गेल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. दिवाळी व उन्हाळ्याच्या सुट्या तथा लग्नसराई यामुळे एसटीच्या प्रवासाला या दिवसांत चांगलाच प्रतिसाद मिळतो. याच कालावधीत आगारांचे उत्पन्नसुद्धा अधिक होते. अन्यथा आगारांना अधिक उत्पन्नाची मजल गाठणे कठिण जाते. उन्हाळ्यात बाहेरगावी जाणाऱ्या व बाहेरगावावरून येणाऱ्या प्रवाशांकडून एसटी प्रवासाला चांगली पसंती मिळत असल्याचे मागील अनेक वर्षांच्या आकडेवारीवरून दिसून येते. परंतु यंदा गोंदिया व तिरोडा आगारात चालक-वाहकांची पदे रिक्त असल्याने उन्हाळी नियोजन लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे शाळा बंद झाल्यावर मानव विकास कार्यक्रमांतर्गत धावणाऱ्या स्कूल बसेस व त्यांचे चालक-वाहक उपलब्ध होऊ शकतील. तेव्हाच १० ते १५ एप्रिलदरम्यान उन्हाळी हंगामासाठी अतिरिक्त बसफेऱ्या सोडल्या जातील, अशी माहिती संबंधित सूत्रांनी दिली आहे. गोंदिया आगारात एकूण ९० बसेस आहेत. त्यापैकी २८ बसेस मानव विकास कार्यक्रमाच्या असून त्या ‘स्कूल बसेस’ म्हणून धावतात. तर चालकांची १५५ व वाहकांची १५५ पदे मंजूर आहेत. मात्र प्रत्यक्ष चालक १३७ व वाहकही १३७ आहेत. त्यातच दोन वाहकांचे बदली आदेश आल्याने आता गोंदिया आगारात केवळ १३५ वाहक राहणार आहेत. मात्र सहा कर्मचारी असे आहेत जे चालक व वाहक या दोन्ही पदावरील काम सांभाळतात. शिवाय मागील अनेक वर्षांपासून वाहतूक अधिकाऱ्यांचे पद रिक्त असून तो प्रभार भंडारा जिल्ह्यातील वाहतूक अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आला आहे. तर तिरोडा आगारात एकूण बसेस ४८ असून यापैकी ७ मानव विकास कार्यक्रमाच्या स्कूल बसेस आहेत. येथे ७६ चालक कार्यरत आहेत. त्या तुलनेत वाहकांची सात पदे रिक्त असल्याने ६९ पदे कार्यरत आहेत. या प्रकारामुळे त्यांना ओव्हरटाईम करावा लागतो. प्रसंगी वाहकाची प्रकृती अस्वस्थ असली किंवा त्याने ओव्हरटाईम करण्यास नकार दिला तर मात्र फेरी रद्द करण्याची पाळी येते. चालक-वाहकांच्या पदांच्या कमतरतेचा परिणाम उन्हाळी हंगामाच्या नियोजनावर पडला असून ते लांबल्याचे समजते.(प्रतिनिधी) ग्रामीण भागात फेऱ्या वाढविण्यावर भर राज्य परिवहन महामंडळाच्या वरिष्ठ कार्यालयाकडून लांब पल्ल्यांच्या बसेस सुरू करण्यापेक्षा ग्रामीण भागात फेऱ्या वाढविण्यात याव्या, असे आदेश आगारांना देण्यात आले आहेत. त्यामुळे स्थानिक पातळीवर लांब पल्ल्यांच्या बसेस सुरू करण्याऐवजी ग्रामीण भागात फेऱ्या वाढविण्यावर भर दिला जात आहे. मात्र उन्हाळी हंगाम बघता गोंदिया आगारातून १ एप्रिलपासून एक किंवा दोन बसफेऱ्या सुरू करण्यात येतील, असे संबंधितांनी सांगितले आहे.