शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
5
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
6
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
7
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
8
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
9
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
10
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
11
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
12
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
13
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
14
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
15
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
16
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
17
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
18
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
19
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
20
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं

प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील दुकाने रात्री 9 वाजता पर्यंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2020 05:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : राज्यात होत असलेल्या अनलॉक अंतर्गत आता बहुतांश उपक्रमांना परवानगी देण्यात आली आहे. अशात प्रतिबंधित ...

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांनी काढले आदेश। अटी-शर्तींच्या अधीन राहून परवानगी

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : राज्यात होत असलेल्या अनलॉक अंतर्गत आता बहुतांश उपक्रमांना परवानगी देण्यात आली आहे. अशात प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील दुकानांना आता २ तास वाढवून देत परवानगी देण्यात आली आहे. म्हणजेच, आता या दुकानी सकाळी ९ ते रात्री ९ वाजतापर्यंत सुरू राहतील. याशिवाय अन्य उपक्रमांना अटी-शर्तींच्या अधीन राहून परवानगी देण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी दीपककुमार मीणा यांनी काढले आहे.या आदेशानुसार, गृहमंत्रालयाच्या परवानगीशिवाय आंतरराष्ट्रीय प्रवासाला बंदी राहील. जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालये व शैक्षणिक संस्था तसेच कोचींग क्लासेस ३१ऑक्टोबरपर्यंत बंद राहतील. मात्र ऑनलाईन व दूरस्थ शिक्षणाची परवानगी कायम राहणार असून या शिक्षणास प्रोत्साहन दिले जाणार आहे. शैक्षणिक संस्थेतील ५० टक्के क्षमतेने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना ऑनलाइन शिक्षण आणि संबंधित कामाकरिता एकाच वेळी उपस्थित राहण्याची परवानगी गुरूवारपासून (दि.१५) देण्यात आली आहे. मात्र आरोग्य आणि सुरक्षेच्या दृष्टीने शालेय शिक्षण विभागामार्फत आदर्श कार्यपद्धती निश्चित करण्यात येईल.राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण, औद्योगिक प्रशिक्षणास परवानगी देण्यात येणार असून हे उपक्रम गुरूवारपासून सुरू राहतील. विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रवाहातील केवळ संशोधन अभ्यासक आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षण संस्था ज्यांना प्रयोगशाळेतील प्रायोगिक कामांची आवश्यकता असेल त्यानुसार गुरूवारपासून सुरू ठेवण्याची परवानगी राहील. सर्व शासकीय व खाजगी ग्रंथालयांना शारीरिक अंतर व स्वच्छतेचे निकष पाळून गुरूवारपासून सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.मनोरंजनाकरीता बाग व उद्याने आणि सार्वजनिक मोकळ्या जागांना सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील आठवडी तसेच गुरांचे बाजार सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली असून शासनाने कोरोनासाठी निर्गमित केलेल्या सूचना-नियमांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक राहील. जिल्ह्यात रेल्वेने आगमन झालेल्या प्रवाशांची आरोग्य तपासणी करण्यात येईल व शिक्के मारण्यात येईल. संबंधित प्रवाशांना कोविड-१९ संदर्भातील सामाजिक अंतराचे व स्वच्छतेचे नियम पाळणे बंधनकारक राहील.आदेशाचे पालन न करणाऱ्या संबंधित व्यक्ती तसेच आस्थापनांवर भारतीय दंड संहिता १८६० (४५) कलम १८८ शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष दीपक कुमार मीना यांनी कळविले आहे.विवाह सोहळ्यांत ५० जणांना परवानगीकोरोनाचा प्रादुर्भाव बघता गर्दी टाळणे गरजेचे असल्याने विवाह सोहळे व वैयक्तिक कौटुंबिक कार्यक्रमांकरिता आणि संबंधित कार्यक्रमांकरिता ५० पेक्षा जास्त नागरिकांना परवानगी राहणार नाही. तसेच अंत्यसंस्काराकरिता २० पेक्षा जास्त नागरिकांची उपस्थिती असू नये असे आदेशात नमूद आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या