शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
4
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
5
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
6
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
7
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
8
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
9
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
10
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
11
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
12
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
13
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
14
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
15
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
16
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
17
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
18
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
20
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष

दुकान बंद, व्यापार बंद, मगर भीड रास्तेपर, हा कसला लॉकडाऊन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 05:00 IST

राज्य शासनाने ‘ब्रेक द चेन’अंतर्गत ५ एप्रिलपासून नवीन निर्बंध लागू केले आहेत. यात अत्यावश्यक सेवा व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता सर्वच दुकाने ३० एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला; मात्र, हा निर्णय घेत असताना शासन आणि प्रशासनाने व्यापाऱ्यांना विश्वासात न घेताच नवीन निर्बंध लागू केले. त्यामुळे उद्योगधंदे संकटात आले असून, यावर अवलंबून असणाऱ्या हजारो कामगारांचा रोजगार बुडाला आहे.

ठळक मुद्देदुकाने सुरु करा : व्यापाऱ्यांचा सवाल, दुकानांसमोर केली व्यापाऱ्यांनी निदर्शने

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया :  ‘दुकान बंद, व्यापार बंद मगर भीड रस्तेपर’ हा कसला लॉकडाऊन आहे. यह खाेकले लॉकडाऊन का हम विरोध करते है, असे फलक हातात घेऊन शुक्रवारी (दि. ९) सकाळी गोंदिया शहरातील व्यापाऱ्यांनी शांततेच्या मार्गाने सरकारच्या धोरणाविरोधात निदर्शने केली. राज्य शासनाने ‘ब्रेक द चेन’अंतर्गत ५ एप्रिलपासून नवीन निर्बंध लागू केले आहेत. यात अत्यावश्यक सेवा व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता सर्वच दुकाने ३० एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला; मात्र, हा निर्णय घेत असताना शासन आणि प्रशासनाने व्यापाऱ्यांना विश्वासात न घेताच नवीन निर्बंध लागू केले. त्यामुळे उद्योगधंदे संकटात आले असून, यावर अवलंबून असणाऱ्या हजारो कामगारांचा रोजगार बुडाला आहे. एकीकडे शासनाने जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवली आहेत; पण दुसरीकडे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी वाढली आहे. त्यावर कुणाचेही नियंत्रण नाही. जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांमध्ये कोरोना येत नाही काय? तो काय? केवळ कपड्याच्या आणि इतर दुकान येतो, असा सवाल व्यापाऱ्यांनी उपस्थित केला. नवीन निर्बंधांमुळे व्यापारी आणि नागरिकांमध्येसुद्धा संभ्रमाचे वातावरण आहे. सरसकट दुकाने बंद ठेवण्याऐवजी काही कालावधी निश्चित करून ती पूर्ववत सुरू करण्याची परवानगी देण्यात यावी. मागील वर्षीदेखील कोरोनामुळे तब्बल तीन महिने दुकाने बंद होती. त्यामुळे अनेक व्यापारी कर्जबाजारी झाले, कामगारांचा रोजगार गेला, वीजबिल, कर्जाचे हप्ते भरण्याची समस्या निर्माण झाली. यातून कसेबसे सावरत असताना आता पुन्हा व्यवसाय बंद झाल्याने व्यापारी व यावर अवलंबून असलेले कामगारसुद्धा संकटात आले आहेत. त्यामुळे शासनाने आपल्या निर्णयावर पुन्हा विचार करून निर्बंध शिथिल करण्याची मागणी संजय जैन, आशिष मेठी, रमेश टहलानिया, अजय खंडेलवाल, गोटू जैन, राजेश लुनिया, सुनील अजमेरा, अर्जुन अजमेरा यांनी केली आहे. 

आता कर्ज काढून जगायचे काय? मागीलवर्षी कोरोनामुळे तीन ते चार महिने दुकाने बंद होती. त्यामुळे व्यापार आधीच डबघाईस आला आहे. त्यातच नवीन निर्बंध लागू करून २५ दिवस दुकाने बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले. यामुळे व्यापाऱ्यांनी देणी कशी फेडायची, कामगारांना वेतन कसे द्यायचे, आता पुन्हा कर्ज काढून जगायचे काय? असा सवाल शहरातील व्यापाऱ्यांनी उपस्थित केला.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या