शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
2
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?
3
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
4
Lamborghini Accident: भरधाव लॅम्बोर्गिनी दुभाजकावर धडकली; कोस्टल रोडवरील अपघातात, कोण चालवत होतं कार?
5
हुंड्यासाठी जावयाची क्रूरता! जमिनीसाठी पत्नीची केली हत्या, सासऱ्यालाही दिला विजेचा झटका
6
चिमुकली आई... आई... करत राहिली, लिव्ह इन पार्टनरने गर्लफ्रेंडच्या मुलीची हत्या केली  
7
Navratri 2025: नवरात्र हा शक्ती उपासनेचा काळ, दुर्गा सप्तशती ग्रंथ वाचनाने कोणते लाभ होतात?
8
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
9
ऐकावं ते नवलच! शोधून शोधून थकली पण सापडलाच नाही नवरा; मग स्वत:शीच केलं लग्न अन्...
10
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तानचे संघ पुन्हा एकदा भिडणार? समजून घ्या IND vs PAKचे गणित
11
मनसे-शिवसेना युतीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; कोण किती जागा लढवणार? समोर आली माहिती
12
VIRAL VIDEO: चीनमधली खूप रील्स पाहिली असतील, पण भारतातील एअरपोर्टवर फूड डिलिव्हरी करणारा रोबो पाहिलात का?
13
Mumbai: सचिन तेंडुलकरच्या हस्ते दादरच्या शिवाजी पार्क जिमखान्याचे लोकार्पण!
14
Navratri 2025: नवरात्रीच्या पहिल्या दिवशी करूया स्मरण आणि मानसपूजन देवी शैलपुत्रीचे!
15
दुर्दैवी अंत! ज्याच्या इशाऱ्यावर 'वाघ' उठबस करायचा, त्याच मालकाला वाघाने टेन्शनमध्ये शिकार बनवलं
16
पाकिस्तानी सैन्याने त्यांच्याच देशात हवाई हल्ला केला, महिला मुलांसह ३० नागरिकांचा मृत्यू
17
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवली; जालन्यातील घटना
18
"हो आम्ही पालक झालो आहोत", अखेर भूषणने उलगडलं केतकीसोबतच्या 'त्या' फोटोचं गुपित
19
पराभव दिसू लागताच पाकिस्तानी प्रेक्षक पळू लागले, भारतीय तरुणीने भर स्टेडियममध्ये डिवचले, म्हणाली...  

वाहतुकीच्या शिस्तीचा बोजवारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2017 21:41 IST

वाहतूक नियंत्रण शाखेने उशीरा का होईना शहरातील वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावण्याचा प्रयत्न केला. त्याची अंमलबजावणी देखील सुरू केली.

ठळक मुद्देवन साईड पार्किंगकडे दुर्लक्ष : बाजारातील वाहतुकीची कोंडी कायम

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : वाहतूक नियंत्रण शाखेने उशीरा का होईना शहरातील वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावण्याचा प्रयत्न केला. त्याची अंमलबजावणी देखील सुरू केली. मात्र संबंधीत विभागाचे याकडे दुर्लक्ष झाल्याने तीन दिवसांतच शहरातील वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे चित्र आहे.शहरातील गोरेलाल चौक, गांधी प्रतिमा, नेहरु चौक, चांदणी चौक आणि दुर्गा चौक या परिसरात बाजारपेठ असल्याने मार्गावर सतत वाहनांची वर्दळ असते. तसेच गोरेलाल चौककडूनच रेल्वे स्थानकाकडे ये-जा करणाºया प्रवाशांची वर्दळ असते. शहरातील मुख्य मार्गावर काहींनी अतिक्रमण केले आहे. परिणामी शहरातील रस्ते अरुंद झाले आहे. शहरातील वाहनांच्या संख्येत दरवर्षी मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. वाहनांची वाढती संख्या आणि अरुंद रस्ते यामुळे या चौकांमध्ये दर तासाला वाहतुकीची कोंडी होत असल्याचे चित्र बघायला मिळते.परिणामी अपघातांच्या संख्येत सुद्धा वाढ झाली आहे. वाहतुकीच्या कोंडीमुळे अनेकदा वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागतो. शहरातील वाहतुकीची समस्या ही आजची नसून गेल्या सात-आठ वर्षांपासून आहे. पण यावर आजवर तोडगा काढण्यात आला नव्हता. मात्र नगर परिषद, जिल्हा प्रशासन आणि वाहतूक नियंत्रण शाखेने पंधरा दिवसांपूर्वी एकत्र येत शहरातील वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी या प्रमुख मार्गांवर सकाळी १० ते रात्री ८ वेळेत जड आणि चारचाकी वाहनांना प्रवेशबंदी लागू केली. त्याची सूचना सुद्धा दवंडी देऊन दिली.वाहतुकीच्या कोंडीवर तोडगा काढण्यासाठी वन वे पार्किंग आणि सम आणि विषमचा नागपुरचा प्रयोग राबविला. यामुळे गेले दोन दिवस शहरातील वाहतूक व्यवस्थेत सुधारणा झाल्याचे चित्र होते. शहरवासीयांनीही हे चित्र असेच कायम राहिले तर वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागणार नसल्याने पोलीस विभागाच्या पुढाकाराचे कौतुक केले. मात्र तिसºयाच दिवशी शहरातील वाहतुकीची शिस्त पुन्हा बिघडल्याचे चित्र आहे. प्रवेशबंदी असलेल्या मार्गावरुन चारचाकी वाहने सर्रासपणे धावत आहे. त्यामुळे तीन दिवसांतच वाहतुकीचा बोजवारा उडाल्याचे चित्र आहे.कठोर भूमिकेची गरजवाहतुक नियंत्रण शाखेने बºयाच वर्षांनंतर शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी पाऊल उचले आहे. ते कौतुकास्पद असले तरी जोपर्यंत वाहतुकीच्या नियमांचे उल्लघंन करणाºयांवर कारवाई करण्यासाठी कठोर पाऊल उचलत नाही. तोपर्यंत शहरातील वाहतूक व्यवस्थेला शिस्त लागणे कठीण आहे.सम-विषमचा प्रयोग फसलाशहरातील वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावण्यासाठी वाहतुक नियंत्रण शाखेतर्फे सम-विषमचा प्रयोग राबविण्यात आला. यातंर्गत आठवड्यातील काही दिवस एका बाजुला तर काही दिवस रस्त्याच्या दुसºया बाजुला पार्किंग करण्याचा प्रयोग राबविला. मात्र याचे देखील तिसºयाच दिवशी उल्लघंन केले जात आहे.डझनभर वाहतूक नियंत्रण शिपायांची नियुक्तीवाहतूक व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी आणि वाहनचालकांना शिस्त लावण्यासाठी चौकांचोकांत वाहतूक नियंत्रण शाखा व पोलीस ठाण्यांतील शिपायांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या डोळ्यात देखत रस्त्याच्या दुतर्फा वाहने उभी केली जात असताना आणि चारचाकी जात असताना त्यांच्यावर कुठलीच कारवाई केली जात नसल्याचे चित्र आहे.