शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
6
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
7
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
9
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
10
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
11
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
12
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
13
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
14
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
15
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
16
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
17
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
18
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
19
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

वाहतुकीच्या शिस्तीचा बोजवारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2017 21:41 IST

वाहतूक नियंत्रण शाखेने उशीरा का होईना शहरातील वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावण्याचा प्रयत्न केला. त्याची अंमलबजावणी देखील सुरू केली.

ठळक मुद्देवन साईड पार्किंगकडे दुर्लक्ष : बाजारातील वाहतुकीची कोंडी कायम

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : वाहतूक नियंत्रण शाखेने उशीरा का होईना शहरातील वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावण्याचा प्रयत्न केला. त्याची अंमलबजावणी देखील सुरू केली. मात्र संबंधीत विभागाचे याकडे दुर्लक्ष झाल्याने तीन दिवसांतच शहरातील वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे चित्र आहे.शहरातील गोरेलाल चौक, गांधी प्रतिमा, नेहरु चौक, चांदणी चौक आणि दुर्गा चौक या परिसरात बाजारपेठ असल्याने मार्गावर सतत वाहनांची वर्दळ असते. तसेच गोरेलाल चौककडूनच रेल्वे स्थानकाकडे ये-जा करणाºया प्रवाशांची वर्दळ असते. शहरातील मुख्य मार्गावर काहींनी अतिक्रमण केले आहे. परिणामी शहरातील रस्ते अरुंद झाले आहे. शहरातील वाहनांच्या संख्येत दरवर्षी मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. वाहनांची वाढती संख्या आणि अरुंद रस्ते यामुळे या चौकांमध्ये दर तासाला वाहतुकीची कोंडी होत असल्याचे चित्र बघायला मिळते.परिणामी अपघातांच्या संख्येत सुद्धा वाढ झाली आहे. वाहतुकीच्या कोंडीमुळे अनेकदा वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागतो. शहरातील वाहतुकीची समस्या ही आजची नसून गेल्या सात-आठ वर्षांपासून आहे. पण यावर आजवर तोडगा काढण्यात आला नव्हता. मात्र नगर परिषद, जिल्हा प्रशासन आणि वाहतूक नियंत्रण शाखेने पंधरा दिवसांपूर्वी एकत्र येत शहरातील वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी या प्रमुख मार्गांवर सकाळी १० ते रात्री ८ वेळेत जड आणि चारचाकी वाहनांना प्रवेशबंदी लागू केली. त्याची सूचना सुद्धा दवंडी देऊन दिली.वाहतुकीच्या कोंडीवर तोडगा काढण्यासाठी वन वे पार्किंग आणि सम आणि विषमचा नागपुरचा प्रयोग राबविला. यामुळे गेले दोन दिवस शहरातील वाहतूक व्यवस्थेत सुधारणा झाल्याचे चित्र होते. शहरवासीयांनीही हे चित्र असेच कायम राहिले तर वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागणार नसल्याने पोलीस विभागाच्या पुढाकाराचे कौतुक केले. मात्र तिसºयाच दिवशी शहरातील वाहतुकीची शिस्त पुन्हा बिघडल्याचे चित्र आहे. प्रवेशबंदी असलेल्या मार्गावरुन चारचाकी वाहने सर्रासपणे धावत आहे. त्यामुळे तीन दिवसांतच वाहतुकीचा बोजवारा उडाल्याचे चित्र आहे.कठोर भूमिकेची गरजवाहतुक नियंत्रण शाखेने बºयाच वर्षांनंतर शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी पाऊल उचले आहे. ते कौतुकास्पद असले तरी जोपर्यंत वाहतुकीच्या नियमांचे उल्लघंन करणाºयांवर कारवाई करण्यासाठी कठोर पाऊल उचलत नाही. तोपर्यंत शहरातील वाहतूक व्यवस्थेला शिस्त लागणे कठीण आहे.सम-विषमचा प्रयोग फसलाशहरातील वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावण्यासाठी वाहतुक नियंत्रण शाखेतर्फे सम-विषमचा प्रयोग राबविण्यात आला. यातंर्गत आठवड्यातील काही दिवस एका बाजुला तर काही दिवस रस्त्याच्या दुसºया बाजुला पार्किंग करण्याचा प्रयोग राबविला. मात्र याचे देखील तिसºयाच दिवशी उल्लघंन केले जात आहे.डझनभर वाहतूक नियंत्रण शिपायांची नियुक्तीवाहतूक व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी आणि वाहनचालकांना शिस्त लावण्यासाठी चौकांचोकांत वाहतूक नियंत्रण शाखा व पोलीस ठाण्यांतील शिपायांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या डोळ्यात देखत रस्त्याच्या दुतर्फा वाहने उभी केली जात असताना आणि चारचाकी जात असताना त्यांच्यावर कुठलीच कारवाई केली जात नसल्याचे चित्र आहे.