शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
6
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
7
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
8
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
9
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
10
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
11
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
12
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
13
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
14
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
15
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
16
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
17
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
18
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
19
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
20
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO

शहीद स्मारकाचे पालटणार रूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2018 21:18 IST

शहरातील सुभाष बागेत असलेल्या शहीद स्मारकाची दुरूस्ती व सौंदर्यीकरणाचे काम सुरू आहे. सुमारे ३५ वर्षांपूर्वी तयार करण्यात आलेल्या या स्मारकाची डागडुजी करण्याची आठवण प्रशासनाला ३५ वर्षांनंतर झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

ठळक मुद्दे३५ वर्षानंतर प्रशासन झाले मेहरबान : खऱ्या अर्थाने होत आहे सन्मान

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शहरातील सुभाष बागेत असलेल्या शहीद स्मारकाची दुरूस्ती व सौंदर्यीकरणाचे काम सुरू आहे. सुमारे ३५ वर्षांपूर्वी तयार करण्यात आलेल्या या स्मारकाची डागडुजी करण्याची आठवण प्रशासनाला ३५ वर्षांनंतर झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मात्र काही का असो ना या निमित्ताने शहीद स्मारकाचे स्वरुप पालटणार आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपले प्राण अर्पण करणाºया शहिदांच्या स्मृतींना उजाळा मिळावा, त्यांच्या स्मारकाने सदैव इतरांना प्रेरणा मिळत राहावी. यासाठी येथील सुभाष बागेत शहीद स्मारक तयार करण्यात आले. तत्कालीन मुख्यमंत्री बॅरी. ए.आर.अंतुले यांनी अवघ्या राज्यात शहीद स्मारकांचे बांधकाम करविले होते.तेव्हा भंडारा जिल्ह्यात केवळ तीनच ठिकाणी शहीद स्मारक तयार करण्यात आले. यात एका स्मारक भंडारा येथे, दुसरा स्मारक शहरातील सुभाष बागेत तर तिसरे स्मारक गोरेगाव तालुक्यातील ग्राम कुऱ्हाडी येथे शहीद जान्या-तिम्या यांच्या स्मृतित तयार करण्यात आले.सन १९८३ मध्ये बनविण्यात आलेल्या या स्मारकांना आता ३५ वर्षांचा कालावधी होत आहे. शहीदांच्या स्मृतीत बनविण्यात आलेल्या या स्मारकाकडे गेल्या ३५ वर्षांत कुणाचेही लक्ष गेले नाही.मात्र आता ३५ वर्षांनंतर अचानकच का होईना मात्र स्मारकाच्या दुरूस्ती व सौंदर्यीकरणाचे काम होत असल्याने स्मारकांचा कायापालट होणार असल्याचे चित्र आहे. सध्या शहीद स्मारकाला लागून असलेल्या सभागृहाचे छत बदलण्याच्या कामाला सुरूवात झाली आहे. यासाठी जुने छत काढण्याचे काम सुरू असून येथे नवे रंगीत छत लावले जाणार असल्याची माहिती आहे. स्मारकाच्या परिसरात सौदंर्यीकरण करण्यात येणार आहे.त्यामुळे हा परिसर आता बागेत येणाऱ्या जाणाऱ्यांचे लक्ष वेधणार आहे. विशेष म्हणजे, सुभाष बागेत असलेल्या स्मारकाचे काम सुरू असून त्याचे रूप पालटणार आहे.स्मारक परिसराची देखरेख करण्याची गरजसुभाष बागेत असलेल्या शहीद स्मारक जवळील काही स्तंभांवर शहीदांचे नाव नोंद आहे. तर त्यापासून काही अंतरावर शहीद भगतसिंह यांचा पुतळा स्थापन केला आहे. शहरातील भाजी बाजारात असलेल्या या पुतळ्याच्या देखभाल दुरुस्तीकडे नगर प्रशासनाचे दुर्लक्ष झाले होते. त्यामुळे हा पुतळा सुभाष बागेत स्थानांतरण करण्यात आले. मात्र येथे देखील तिच स्थिती असल्याने शहीदांच्या पुतळ्याची अहवेलना होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे नगर परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेवून स्मारक परिसर आणि पुतळ्याची योग्य देखभाल करण्याची गरज आहे.याची दखल घ्यागोरेगाव तालु्क्यातील ग्राम कुऱ्हाडी येथे एक स्मारक मात्र आहे. मात्र बऱ्याच वर्षांपासून त्याची सुध्दा दुरूस्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे येथील स्मारकाच्या दुरूस्तीचे काम होणेही तेवढेच गरजेचे आहे. प्रशासनाने याची दखल घेवून या स्मारकारची सुध्दा डागडूजी करण्याची मागणी होत आहे.शौचालयांचे बांधकाम होणारसुभाष बागेत सध्या शौचालयाची सोय नसल्यामुळे बागेत येणाऱ्या नागरिकांची असुविधा होते. यात महिलांची अधिक कुचंबना होते. त्यामुळे बागेत महिला-पुरूषांसाठी स्वतंत्र शौचालय बनविण्याची मागणी मागील कित्येक वर्षांपासून केली जात आहे. याची दखल घेत नगर परिषद शौचालयांचे बांधकाम करणार आहे.