शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

शहीद स्मारकाचे पालटणार रूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2018 21:18 IST

शहरातील सुभाष बागेत असलेल्या शहीद स्मारकाची दुरूस्ती व सौंदर्यीकरणाचे काम सुरू आहे. सुमारे ३५ वर्षांपूर्वी तयार करण्यात आलेल्या या स्मारकाची डागडुजी करण्याची आठवण प्रशासनाला ३५ वर्षांनंतर झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

ठळक मुद्दे३५ वर्षानंतर प्रशासन झाले मेहरबान : खऱ्या अर्थाने होत आहे सन्मान

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शहरातील सुभाष बागेत असलेल्या शहीद स्मारकाची दुरूस्ती व सौंदर्यीकरणाचे काम सुरू आहे. सुमारे ३५ वर्षांपूर्वी तयार करण्यात आलेल्या या स्मारकाची डागडुजी करण्याची आठवण प्रशासनाला ३५ वर्षांनंतर झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मात्र काही का असो ना या निमित्ताने शहीद स्मारकाचे स्वरुप पालटणार आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपले प्राण अर्पण करणाºया शहिदांच्या स्मृतींना उजाळा मिळावा, त्यांच्या स्मारकाने सदैव इतरांना प्रेरणा मिळत राहावी. यासाठी येथील सुभाष बागेत शहीद स्मारक तयार करण्यात आले. तत्कालीन मुख्यमंत्री बॅरी. ए.आर.अंतुले यांनी अवघ्या राज्यात शहीद स्मारकांचे बांधकाम करविले होते.तेव्हा भंडारा जिल्ह्यात केवळ तीनच ठिकाणी शहीद स्मारक तयार करण्यात आले. यात एका स्मारक भंडारा येथे, दुसरा स्मारक शहरातील सुभाष बागेत तर तिसरे स्मारक गोरेगाव तालुक्यातील ग्राम कुऱ्हाडी येथे शहीद जान्या-तिम्या यांच्या स्मृतित तयार करण्यात आले.सन १९८३ मध्ये बनविण्यात आलेल्या या स्मारकांना आता ३५ वर्षांचा कालावधी होत आहे. शहीदांच्या स्मृतीत बनविण्यात आलेल्या या स्मारकाकडे गेल्या ३५ वर्षांत कुणाचेही लक्ष गेले नाही.मात्र आता ३५ वर्षांनंतर अचानकच का होईना मात्र स्मारकाच्या दुरूस्ती व सौंदर्यीकरणाचे काम होत असल्याने स्मारकांचा कायापालट होणार असल्याचे चित्र आहे. सध्या शहीद स्मारकाला लागून असलेल्या सभागृहाचे छत बदलण्याच्या कामाला सुरूवात झाली आहे. यासाठी जुने छत काढण्याचे काम सुरू असून येथे नवे रंगीत छत लावले जाणार असल्याची माहिती आहे. स्मारकाच्या परिसरात सौदंर्यीकरण करण्यात येणार आहे.त्यामुळे हा परिसर आता बागेत येणाऱ्या जाणाऱ्यांचे लक्ष वेधणार आहे. विशेष म्हणजे, सुभाष बागेत असलेल्या स्मारकाचे काम सुरू असून त्याचे रूप पालटणार आहे.स्मारक परिसराची देखरेख करण्याची गरजसुभाष बागेत असलेल्या शहीद स्मारक जवळील काही स्तंभांवर शहीदांचे नाव नोंद आहे. तर त्यापासून काही अंतरावर शहीद भगतसिंह यांचा पुतळा स्थापन केला आहे. शहरातील भाजी बाजारात असलेल्या या पुतळ्याच्या देखभाल दुरुस्तीकडे नगर प्रशासनाचे दुर्लक्ष झाले होते. त्यामुळे हा पुतळा सुभाष बागेत स्थानांतरण करण्यात आले. मात्र येथे देखील तिच स्थिती असल्याने शहीदांच्या पुतळ्याची अहवेलना होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे नगर परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेवून स्मारक परिसर आणि पुतळ्याची योग्य देखभाल करण्याची गरज आहे.याची दखल घ्यागोरेगाव तालु्क्यातील ग्राम कुऱ्हाडी येथे एक स्मारक मात्र आहे. मात्र बऱ्याच वर्षांपासून त्याची सुध्दा दुरूस्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे येथील स्मारकाच्या दुरूस्तीचे काम होणेही तेवढेच गरजेचे आहे. प्रशासनाने याची दखल घेवून या स्मारकारची सुध्दा डागडूजी करण्याची मागणी होत आहे.शौचालयांचे बांधकाम होणारसुभाष बागेत सध्या शौचालयाची सोय नसल्यामुळे बागेत येणाऱ्या नागरिकांची असुविधा होते. यात महिलांची अधिक कुचंबना होते. त्यामुळे बागेत महिला-पुरूषांसाठी स्वतंत्र शौचालय बनविण्याची मागणी मागील कित्येक वर्षांपासून केली जात आहे. याची दखल घेत नगर परिषद शौचालयांचे बांधकाम करणार आहे.