शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत आणि चीन रशिया-युक्रेन युद्धाला निधी देत ​​आहेत"; तेल खरेदीवरून ट्रम्प यांचा UNGA मध्ये आरोप
2
"भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे संपवली, पण कोणत्याही पंतप्रधानांनी मदत केली नाही," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
3
Asia Cup 2025 : टॉपर श्रीलंकेचा सुपर फोरमध्ये फ्लॉप शो! पाक जिंकले तरी OUT होण्याचा धोका; ते कसं?
4
PAK vs SL War of Celebration :पाक गोलंदाजाने कळ काढली; हसरंगानं त्याचा बदला घेतला, पण... (VIDEO)
5
रशिया कसं थांबवेल युक्रेन युद्ध? ट्रम्प यांनी UNGA मध्ये सांगितला अमेरिकेचा प्लॅन; पुतिन यांचं टेन्शन वाढणार!
6
पाक गोलंदाजानं केली हसरंगाची कॉपी! मग IND vs PAK मॅचचा दाखला देत इरफाननं काढली 'लायकी' (VIDEO)
7
वैभव खेडेकरांच्या BJP प्रवेशाचा मुहूर्त मिळेना; कार्यकर्त्यांसह मुंबई गाठली पण पक्षप्रवेश नाही
8
पाकिस्तानच्या जाफर एक्सप्रेसमध्ये स्फोट; ट्रेन रुळावरून घसरुन उलटली, काही तासांपूर्वीच लष्कराला करण्यात आलं होतं लक्ष्य
9
बिग सरप्राइज! थेट टीम इंडियाची कॅप्टन्सी मिळाली अन् दिनेश कार्तिक पुन्हा मैदानात उतरण्यास झाला तयार
10
लग्नानंतर वैवाहिक संबध ठेऊ शकला नाही पती, पत्नीनं नपुंसक असल्याचा आरोप करत केली 2 कोटींची मागणी अन् मग...
11
IND vs PAK: पाकिस्तानच्या 'चिल्लर पार्टी'ला हरभजनचा इशारा, म्हणाला- थोडे मोठे व्हा नि मग...
12
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
13
भारताने जिंकलेल्या १९८३ वर्ल्डकप फायनलमधील पंच डिकी बर्ड यांचे ९२व्या वर्षी निधन
14
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
15
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
16
GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?
17
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
18
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
19
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
20
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...

शेंडावासी रोहयोच्या कामापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 00:36 IST

लोकमत न्यूज नेटवर्कशेंडा (कोयलारी) : येथील ग्रामपंचायतने मागील वर्षी रोहयो अंतर्गत कामांच्या मागणीसाठी आराखडा तयार केला नाही. त्यामुळे शासनाकडून कामे मंजूर झाली नाही. परिणामी शेतकरी व शेतमजुरांनी कामाच्या शोधात इतरत्र पलायन करणे सुरू केल्याचे चित्र आहे.मजूर वर्गाला काम उपलब्ध करुन देण्याची जवाबदारी ग्रामपंचायत व यंत्रणेची असते. गाव परिसरात कोणकोणती कामे ...

ठळक मुद्देनियोजनशून्य आराखडा : मजुरांचे परराज्यांत पलायन सुरूच

लोकमत न्यूज नेटवर्कशेंडा (कोयलारी) : येथील ग्रामपंचायतने मागील वर्षी रोहयो अंतर्गत कामांच्या मागणीसाठी आराखडा तयार केला नाही. त्यामुळे शासनाकडून कामे मंजूर झाली नाही. परिणामी शेतकरी व शेतमजुरांनी कामाच्या शोधात इतरत्र पलायन करणे सुरू केल्याचे चित्र आहे.मजूर वर्गाला काम उपलब्ध करुन देण्याची जवाबदारी ग्रामपंचायत व यंत्रणेची असते. गाव परिसरात कोणकोणती कामे करता येतील याचा आराखडा एक वर्षाअगोदर शसनाकडे मंजुरीसाठी सादर करणे गरजेचे असते. परंतु येथील ग्रामपंचायतने तसे केले नसल्याने येथील मजूर वर्गाला काम उपलब्ध होवू शकले नाही. परिणामी कामापासून वंचित रहावे लागले आहे.अत्यल्प पाऊस व धानपिकावरील कीडरोगाने यंदा उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली. सिंचन प्रकल्पात पाण्याचा अल्पसाठा असल्याने उन्हाळी धानाच्या लागवडीवर निर्बंध लावले आहेत. वर्षभर संसाराचा गाडा कसा चालवावा या विवंचनेत मजूर व शेतकरी बांधव आहेत. या परिसरात शेती ह्ेच उदरनिर्वाहाचे एकमेव साधन आहे. कोणताही उद्योगधंदा नसल्याने मजुरांच्या हाताला काम मिळत नाही. त्यामुळे शेतकरी व मजुरांना एकमेकांवर अवलंबून रहावे लागते.यावर्षी रोहयोची कामे सुरु करण्यात आली नाही. शासनाच्या धोरणानुसार प्रत्येक मजुराला १०० दिवस काम मिळेल याचा गाजावाजा केला जातो. परंतु आजपर्यंतच्या इतिहासात १०० दिवस तर सोडा परंतु सतत ५० दिवस काम मिळाले नसल्याची वास्तविकता आहे.मागील नोव्हेंबर महिन्यात लघु पाटबंधारे विभागार्फत मुंढरीघाट पार दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झाली होती. त्यावेळी मजुरांना काम मिळेल अशी आशा होती. परंतु ते काम आठवडाभरही न चालता बंद करण्यात आले. त्यामुळे मजुरांच्या आशेवर विरजन पडले.लोकप्रतिनिधी व प्रशासन मजूर व शेतकºयांच्या समस्यांकडे नेहमीच दुर्लक्ष करतात. लोकप्रतिनिधी तर पाच वर्षातून एखाद्या वेळी या गावाला भेट देतात. त्यामुळे मजूर व शेतकऱ्यांच्या समस्या जिथल्या तिथेच राहतात. शासन व प्रशासनाने मजूर व शेतकऱ्यांच्या समस्या जाणून रोहयोची कामे युद्धस्तरावर सुरु करुन मजुरांचे होणारे पलायन थांबवावे अशी मागणी मजूर वर्गाकडून होत आहे.