शहरं
Join us  
Trending Stories
1
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
2
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
3
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
4
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
5
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
6
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
7
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
8
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
9
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
10
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
11
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
12
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
13
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर
14
'निराधार आणि बेजबाबदार'; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने सोडले मौन, काय दिले उत्तर?
15
IND vs ENG 5th Test: Gus Atkinson चा 'पंजा'! टीम इंडियानं २० धावांत गमावल्या ४ विकेट्स! अन्...
16
सेबीच्या नियमांना फाटा देऊन शेअर्सची खरेदी-विक्री, पण धोकाही मोठा! 'ग्रे मार्केट'ची Inside Story
17
Shravan Shanivar 2025: शनिवारी कसे करावे अश्वत्थ मारुती पूजन? पिंपळाच्या झाडाचीही पूजा महत्त्वाची!
18
नागरिकांची झोप उडवणाऱ्या चड्डी- बनियान टोळीला पकडण्यात पोलिसांना यश!
19
आशा भोसलेंनी पुण्यातील आलिशान फ्लॅट विकला! एकाच झटक्यात कमावले इतके कोटी, तब्बल ४२ टक्के वाढ
20
कुठल्याही देवावर विश्वास नाही, कुठलाही धर्म मानत नाही, या १० देशांमधील बहुतांश लोक आहेत नास्तिक

शेंडावासी रोहयोच्या कामापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 00:36 IST

लोकमत न्यूज नेटवर्कशेंडा (कोयलारी) : येथील ग्रामपंचायतने मागील वर्षी रोहयो अंतर्गत कामांच्या मागणीसाठी आराखडा तयार केला नाही. त्यामुळे शासनाकडून कामे मंजूर झाली नाही. परिणामी शेतकरी व शेतमजुरांनी कामाच्या शोधात इतरत्र पलायन करणे सुरू केल्याचे चित्र आहे.मजूर वर्गाला काम उपलब्ध करुन देण्याची जवाबदारी ग्रामपंचायत व यंत्रणेची असते. गाव परिसरात कोणकोणती कामे ...

ठळक मुद्देनियोजनशून्य आराखडा : मजुरांचे परराज्यांत पलायन सुरूच

लोकमत न्यूज नेटवर्कशेंडा (कोयलारी) : येथील ग्रामपंचायतने मागील वर्षी रोहयो अंतर्गत कामांच्या मागणीसाठी आराखडा तयार केला नाही. त्यामुळे शासनाकडून कामे मंजूर झाली नाही. परिणामी शेतकरी व शेतमजुरांनी कामाच्या शोधात इतरत्र पलायन करणे सुरू केल्याचे चित्र आहे.मजूर वर्गाला काम उपलब्ध करुन देण्याची जवाबदारी ग्रामपंचायत व यंत्रणेची असते. गाव परिसरात कोणकोणती कामे करता येतील याचा आराखडा एक वर्षाअगोदर शसनाकडे मंजुरीसाठी सादर करणे गरजेचे असते. परंतु येथील ग्रामपंचायतने तसे केले नसल्याने येथील मजूर वर्गाला काम उपलब्ध होवू शकले नाही. परिणामी कामापासून वंचित रहावे लागले आहे.अत्यल्प पाऊस व धानपिकावरील कीडरोगाने यंदा उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली. सिंचन प्रकल्पात पाण्याचा अल्पसाठा असल्याने उन्हाळी धानाच्या लागवडीवर निर्बंध लावले आहेत. वर्षभर संसाराचा गाडा कसा चालवावा या विवंचनेत मजूर व शेतकरी बांधव आहेत. या परिसरात शेती ह्ेच उदरनिर्वाहाचे एकमेव साधन आहे. कोणताही उद्योगधंदा नसल्याने मजुरांच्या हाताला काम मिळत नाही. त्यामुळे शेतकरी व मजुरांना एकमेकांवर अवलंबून रहावे लागते.यावर्षी रोहयोची कामे सुरु करण्यात आली नाही. शासनाच्या धोरणानुसार प्रत्येक मजुराला १०० दिवस काम मिळेल याचा गाजावाजा केला जातो. परंतु आजपर्यंतच्या इतिहासात १०० दिवस तर सोडा परंतु सतत ५० दिवस काम मिळाले नसल्याची वास्तविकता आहे.मागील नोव्हेंबर महिन्यात लघु पाटबंधारे विभागार्फत मुंढरीघाट पार दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झाली होती. त्यावेळी मजुरांना काम मिळेल अशी आशा होती. परंतु ते काम आठवडाभरही न चालता बंद करण्यात आले. त्यामुळे मजुरांच्या आशेवर विरजन पडले.लोकप्रतिनिधी व प्रशासन मजूर व शेतकºयांच्या समस्यांकडे नेहमीच दुर्लक्ष करतात. लोकप्रतिनिधी तर पाच वर्षातून एखाद्या वेळी या गावाला भेट देतात. त्यामुळे मजूर व शेतकऱ्यांच्या समस्या जिथल्या तिथेच राहतात. शासन व प्रशासनाने मजूर व शेतकऱ्यांच्या समस्या जाणून रोहयोची कामे युद्धस्तरावर सुरु करुन मजुरांचे होणारे पलायन थांबवावे अशी मागणी मजूर वर्गाकडून होत आहे.