शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

शाहू महाराज सामाजिक न्यायासाठी आदर्श - सूर्यवंशी

By admin | Updated: June 28, 2015 01:13 IST

समाजातील शोषित, पीडित, वंचित व मागास घटकांच्या कल्याणासाठी त्या काळात शाहू महाराजांनी काम केले.

गोंदिया : समाजातील शोषित, पीडित, वंचित व मागास घटकांच्या कल्याणासाठी त्या काळात शाहू महाराजांनी काम केले. त्यांच्या कल्याणासाठी महाराजांनी प्रसंगी संघर्षही केला. समाजाला न्याय मिळवून देण्याच्या दृष्टिने शाहू महाराज हे आदर्श आहे, असे विचार जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी यांनी व्यक्त केले.येथील सामाजिक न्याय भवनात शुक्रवारी आयोजित सामाजिक न्याय दिन कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गावडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी जयवंत पाडवी, दलितमित्र डॉ. जे.डी. राऊत, जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुरेश पेंदाम प्रामुख्याने उपस्थित होते. पुढे बोलताना डॉ. सुयर्वंशी यांनी, त्या काळी विषमतेचे वातावरण असताना सामाजिक न्यायाची सुरुवात शाहू महाराजांनी केली. ती त्यांनी प्रत्यक्षात देखील आणली. शासन आज सामाजिक न्यायाचे अनेक उपक्रम व योजना राबवित आहे. याचा लाभ खऱ्या अर्थाने गरजू लाभार्थ्यांना मिळाला पाहिजे. वंचित व उपेक्षीत असलेल्या समाजातील शेवटच्या घटकाला लाभ देण्याच्या दृष्टीने शाहू महाराजांची प्रेरणा घेऊन प्रत्येकाने काम करावे अशी अपेक्षाही व्यक्त केली. गाडवे यांनी, शाहू महाराजांनी समाजाच्या उन्नतीसाठी काम केले. आरक्षणाची सुरुवात देखील महाराजांच्या काळात झाली. शाहू महाराजांचा आदर्श पुढे ठेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेत आरक्षणाची तरतूद केली. शाहू महाराजांच्या विचारांवरच राज्यात विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत असल्याचे सांगीतले. पाडवी यांनी, अस्पृष्यतेचे निवारण करुन मागास घटकांना विकासाच्या प्रक्रियेत आणण्याचे काम शाहू महाराजांनी केले. त्यांच्या विचारांमुळेच मागासवर्गीय घटकांचे कल्याण होत आहे. सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांचा लाभार्थ्यांनी लाभ घेऊन आपली प्रगती साधावी असे आवाहन केले. कार्यक्रमाला विविध विभागाचे अधिकारी-कर्मचारी, स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे युवक-युवती, विविध महाविद्यालयांचे विद्यार्थी, राजीव गांधी समाजकार्य माहविद्यालयाचे विद्यार्थ उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करुन महात्मा फुले, शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रास्ताविक समाज कल्याणचे सहायक आयुक्त सुनिल जाधव यांनी मांडले. आभार जिल्हा समाज कल्याण अधिकारी पेंदाम यांनी मानले. कार्यक्रमासाठी समाज कल्याण विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)