शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
2
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
3
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
4
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
5
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
6
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
7
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
8
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
11
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
12
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
13
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
14
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजकाचा मृत्यू
19
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
20
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या

शाहू महाराज सामाजिक न्यायासाठी आदर्श - सूर्यवंशी

By admin | Updated: June 28, 2015 01:13 IST

समाजातील शोषित, पीडित, वंचित व मागास घटकांच्या कल्याणासाठी त्या काळात शाहू महाराजांनी काम केले.

गोंदिया : समाजातील शोषित, पीडित, वंचित व मागास घटकांच्या कल्याणासाठी त्या काळात शाहू महाराजांनी काम केले. त्यांच्या कल्याणासाठी महाराजांनी प्रसंगी संघर्षही केला. समाजाला न्याय मिळवून देण्याच्या दृष्टिने शाहू महाराज हे आदर्श आहे, असे विचार जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी यांनी व्यक्त केले.येथील सामाजिक न्याय भवनात शुक्रवारी आयोजित सामाजिक न्याय दिन कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गावडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी जयवंत पाडवी, दलितमित्र डॉ. जे.डी. राऊत, जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुरेश पेंदाम प्रामुख्याने उपस्थित होते. पुढे बोलताना डॉ. सुयर्वंशी यांनी, त्या काळी विषमतेचे वातावरण असताना सामाजिक न्यायाची सुरुवात शाहू महाराजांनी केली. ती त्यांनी प्रत्यक्षात देखील आणली. शासन आज सामाजिक न्यायाचे अनेक उपक्रम व योजना राबवित आहे. याचा लाभ खऱ्या अर्थाने गरजू लाभार्थ्यांना मिळाला पाहिजे. वंचित व उपेक्षीत असलेल्या समाजातील शेवटच्या घटकाला लाभ देण्याच्या दृष्टीने शाहू महाराजांची प्रेरणा घेऊन प्रत्येकाने काम करावे अशी अपेक्षाही व्यक्त केली. गाडवे यांनी, शाहू महाराजांनी समाजाच्या उन्नतीसाठी काम केले. आरक्षणाची सुरुवात देखील महाराजांच्या काळात झाली. शाहू महाराजांचा आदर्श पुढे ठेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेत आरक्षणाची तरतूद केली. शाहू महाराजांच्या विचारांवरच राज्यात विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत असल्याचे सांगीतले. पाडवी यांनी, अस्पृष्यतेचे निवारण करुन मागास घटकांना विकासाच्या प्रक्रियेत आणण्याचे काम शाहू महाराजांनी केले. त्यांच्या विचारांमुळेच मागासवर्गीय घटकांचे कल्याण होत आहे. सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांचा लाभार्थ्यांनी लाभ घेऊन आपली प्रगती साधावी असे आवाहन केले. कार्यक्रमाला विविध विभागाचे अधिकारी-कर्मचारी, स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे युवक-युवती, विविध महाविद्यालयांचे विद्यार्थी, राजीव गांधी समाजकार्य माहविद्यालयाचे विद्यार्थ उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करुन महात्मा फुले, शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रास्ताविक समाज कल्याणचे सहायक आयुक्त सुनिल जाधव यांनी मांडले. आभार जिल्हा समाज कल्याण अधिकारी पेंदाम यांनी मानले. कार्यक्रमासाठी समाज कल्याण विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)