शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

अभ्यास परीक्षेविनाच मिळाली शाब्बासकीची थाप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 05:00 IST

दहावीच्या निकालात यंदा नागपूर विभागात गोंदिया जिल्हा दुसऱ्या स्थानी आहे. मागील वर्षीच्या तुलनेत निकालात यंदा सुधारणा झाली आहे.  यंदाही दहावीत मुलींनीच बाजी मारली असून, ९९.९३ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. ९९.९१ टक्के मुुलगे उत्तीर्ण झाले आहेत. जिल्ह्याचा एकूण निकाल ९९.९२ टक्के लागला आहे.

ठळक मुद्देजिल्ह्याचा निकाल ९९.९२ : वेबसाईट क्रॅक झाल्याने विद्यार्थ्यांची निराशा : दहावीच्या निकालात गोंदिया विभागात दुसरा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया :   महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल शुक्रवारी (दि. १६) जाहीर करण्यात आला. यात गोंदिया जिल्ह्याचा निकाल ९९.९२ टक्के लागला असून, नागपूर विभागात गोंदिया जिल्हा दुसऱ्या स्थानी आहे. दहावीच्या निकालात यंदा मुलींनी बाजी मारली असून, ९९.९३ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. त्यामुळे नागपूर विभागात गोंदिया जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर असून, रिझल्टमध्ये गर्ल्स रॉक्स ठरल्या आहेत.कोरोनाच्या संसर्गामुळे मागील दीड वर्षांपासून शाळा बंद आहेत. त्यातच दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. तसेच नववीचे गुण आणि वर्षभराचे अंतर्गत मूल्यमापन या आधारावर दहावीचा निकाल घोषित करण्यात आला. सरसकट सर्व विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्यात आले. यंदाचा निकाल कसा जाहीर होणार, याकडे विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांचे लक्ष लागले होते. मात्र, यंदाच्या निकालाबाबत विद्यार्थ्यांमध्ये फारसा उत्साह नव्हता. निकाल पाहण्याचे संकेतस्थळ बंद असल्याने अनेक विद्यार्थ्यांचा शुक्रवारी हिरमोड झाला. दहावीच्या निकालात यंदा नागपूर विभागात गोंदिया जिल्हा दुसऱ्या स्थानी आहे. मागील वर्षीच्या तुलनेत निकालात यंदा सुधारणा झाली आहे. यंदाही दहावीत मुलींनीच बाजी मारली असून, ९९.९३ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. ९९.९१ टक्के मुुलगे उत्तीर्ण झाले आहेत. जिल्ह्याचा एकूण निकाल ९९.९२ टक्के लागला आहे.दहावीच्या परीक्षेला जिल्ह्यातील एकूण १९ हजार २७४ विद्यार्थी  बसले होते. त्यापैकी १९ हजार २६० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात ९,९६२ विद्यार्थी, तर ९,२९८ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या. ६,६६१ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले. प्रथम श्रेणीत ९,७५६, तर व्दितीय श्रेणीत २,८६० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. जिल्ह्याचा एकूण निकाल ९९.९२ टक्के लागला. मागील वर्षीच्या तुलनेत जिल्ह्याचा निकालात ४.७ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

सावित्रीच्या लेकींनी मारली बाजी- दहावीच्या निकालात मुलींनी बाजी मारत अव्वल स्थान प्राप्त केले आहे. दहावीच्या परीक्षेत ९,९६२ विद्यार्थी, तर ९,२९८ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या. मुलांच्या उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९९.९१ टक्के, तर मुलींच्या उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९९.९३ टक्के आहे. त्यामुळे दहावीच्या परीक्षेत सावित्रीच्या लेकीच सरस ठरल्या.सर्वच शाळांचा निकाल शंभर टक्के- यंदा कोरोनामुळे दहावीच्या परीक्षा रद्द झाल्याने बोर्डाने ठरवून दिलेल्या निकषानुसार मूल्यमापन करून निकाल जाहीर करण्यात आला. त्यामुळे बहुतेक शाळांचा निकाल हा शंभर टक्के लागला आहे. 

आता पालकांचे लक्ष मिशन अ‍ॅडमिशनकडे- दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आपल्या पाल्याला त्याच्या आवडत्या शाखेत प्रवेश मिळावा, यासाठी पालकांची धडपड सुरू होते. त्यामुळे निकालानंतर पालक विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी लगबग सुरू होते. मात्र, यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने प्रवेशाची प्रक्रियासुध्दा ऑनलाईन राबविली जाण्याची शक्यता आहे. 

गुणवंत विद्यार्थ्यांची निराशा- परीक्षा न घेता यंदा प्रथमच दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला. यात सर्वच विद्यार्थ्यांना सरसकट पास करण्यात आले. त्यामुळे गुणवंत व अभ्यासू विद्यार्थ्यांचा भ्रमनिरास झाली आहे. शाळेतूनच नव्हे तर जिल्हा आणि विभागातूून अव्वल येण्यासाठी अनेक विद्यार्थ्यांनी वर्षभर मेहनत घेतली. मात्र, परीक्षाच रद्द झाल्याने विद्यार्थ्यांचा हिरमोड झाला आहे. या निकालाने अव्हरेज विद्यार्थ्यांना मात्र त्यांच्यात अभ्यास न करताच पास झाल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर झळाळत होता. वेबसाईट क्रॅकने विद्यार्थी आणि शिक्षण विभागाचा हिरमोड- शुक्रवारी (दि. १६) दुपारी १ वाजता दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला. मात्र, निकालाची साईट दिवसभर उघडलीच नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांची निराशा झाली. याचा फटका शिक्षण विभागाला बसल्याने ऑनलाईन शिक्षण देण्याची भाषा करणाऱ्या शिक्षण विभागाला ऑनलाईन निकाल देण्याची व्यवस्था करता आली नाही. त्यामुळे ऑनलाईन शिक्षणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 

 

टॅग्स :SSC Resultदहावीचा निकाल