शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
3
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
4
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
5
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
6
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
7
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
8
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
9
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
10
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
11
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
12
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
13
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
14
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
15
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
16
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
17
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
18
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
19
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

पिण्याच्या पाण्याची भीषण समस्या

By admin | Updated: March 9, 2017 00:41 IST

पंचायत समिती सडक अर्जुनी व कन्हारपायली ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या पातरगोटा येथे पिण्याच्या पाण्याची भीषण समस्या निर्माण झाली आहे.

प्रशासनाचे दुर्लक्ष : पातरगोटा येथे बोअरवेलची मागणी शेंडा (कोयलारी) : पंचायत समिती सडक अर्जुनी व कन्हारपायली ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या पातरगोटा येथे पिण्याच्या पाण्याची भीषण समस्या निर्माण झाली आहे. याची माहिती जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी व पाणी पुरवठा विभागाच्या मुख्य अभियंत्याला गावकऱ्यांच्या सह्यानिशी लेखी निवेदनातून देण्यात आली. मात्र त्याची दखल आजपावेतो घेण्यात आली नाही. त्यामुळे गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्याच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. कन्हारपायली पासून २ किमी अंतरावर असलेल्या पातरगोटा येथे ३० ते ३५ घरांचे आदिवासी समाजाचे लोक पिढ्यानपिढ्यापासून वास्तव्यास आहेत. पातरगोटा हे गाव आदिवासीबहुल असून अतिदुर्गम नक्षल क्षेत्रात मोडते. त्या गावात फक्त एकच बोअरवेल आहे. त्यामुळे गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत नाही. एक किमी अंतरावरुन शेतातील विहिरींचे पाणी आणूण तहान भागवावी लागते. पाणी समस्या दूर करण्यासाठी गावकऱ्यांनी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पाणी पुरवठा विभागाचे मुख्य अभियंता व ग्रामपंचायतकडे वारंवार कैफियत मांडली, तरीही दुर्लक्ष करण्यात आले. पिण्याचे पाणी, रस्ते व वीज या मानवाच्या मुलभूत गरजा असून त्याची पूर्तता करणे प्रशासनाचे आद्यकर्तव्य आहे. असे असताना त्याकडे दुर्लक्ष केल्या जाते, ही शोकांतिका आहे. अखेर गावकऱ्यांनी या क्षेत्राचे जि.प. सदस्य सरिता कापगते यांना निवेदन देऊन पिण्याच्या पाण्याची समस्या मांडली. यावर त्यांनी तातडीने पातरगोटा गावाला भेट देवून पाणी समस्या जाणून घेतली व लवकरच बोअरवेलची मागणी करुन पाणी समस्या दूर केल्या जाईल, असे आश्वासन गावकऱ्यांना दिले. (वार्ताहर)