शहरं
Join us  
Trending Stories
1
बीडमध्ये खळबळ! सरकारी वकिलाने कोर्टातच संपवले आयुष्य, न्यायाधीशासह दोघांवर गुन्हा; प्रकरण काय?
2
भारतीय ड्रायव्हर्संना डोनाल्ड ट्रम्प यांचा झटका! वर्कर व्हिसा मिळणार नाही, अमेरिकेतील नोकऱ्या जाणार
3
Pune: हनी ट्रॅप प्रकरणातील प्रफुल लोढाचे आणखी एक कांड; पिंपरी पोलिसांनी केली अटक; महिलेच्या तक्रारीत काय?
4
जोधपूरला जाणारे एअर इंडियाचे विमान अचानक परतले, मुंबई विमानतळावर गोंधळ! नेमकं झालं काय?
5
'कॅस्पियन समुद्र' गायब होतोय का? पाच वर्षात ३ फूट पाणी कमी झालं; 'या' ५ देशांना धोका, कारण...
6
डी-गँगच्या 'ड्रग्ज फॅक्टरी'वर धाड, 92 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त, मुंबई-ठाण्याचंही कनेक्शन
7
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?
8
सलग ६ दिवसांच्या तेजीला ब्रेक! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटींचे नुकसान, एशियन पेंट्समध्ये सर्वाधिक आपटला
9
इथेनॉलयुक्त पेट्रोलमुळे गाड्या खराब होतात; कोण पसरवतोय गैरसमज? नितीन गडकरीनी स्पष्टच बोलले
10
Shani Amavasya 2025: शनीची वक्री चाल 'या' ५ राशींचे पुढील २ महिने करणार हाल; जाणून घ्या उपाय!
11
आता आरोग्य विमा तुमच्या आवाक्यात राहणार! कंपन्यांच्या प्रीमियम वाढीवर IRDAI घेणार मोठा निर्णय
12
"ठाकरे बंधू बोलबच्चन...; बाळासाहेबांनंतर मराठी माणसांच्या मनात एकनाथ शिंदेंचं स्थान"
13
विश्वासातील 'टाटां'च्या शेअर्सनं केलं निराश, ग्रुपच्या या शेअरनं सर्वाधिक बुडवलं
14
'कर्मचारी निलंबित होऊ शकतो, तर पंतप्रधान का नाही?', PM-CM विधेयकावरुन मोदींचा काँग्रेसवर निशाणा
15
"मी २५ वर्षाची अन् बॉयफ्रेंड ७६ वर्षाचा, तरीही खूप खुश"; इंटरनेटवर व्हायरल जोडपं, गर्लफ्रेंड म्हणते...
16
Gold Silver Price 22 August: सोनं महागलं, चांदी सुस्साट; किंमतीत ₹१४४१ ची वाढ, खरेदीपूर्वी पाहा नवे दर
17
या ₹15 पेक्षाही कमी किंमतीच्या शेअरला 5 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल! पण कारण काय?
18
ICC Women’s World Cup 2025 : ...तर नवी मुंबईतील मैदानात रंगणार वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील फायनल
19
WhatsApp वापरणाऱ्या प्रत्येकालाच 'हे' सीक्रेट सिक्युरिटी फीचर्स माहीत असायला हवेत!
20
"क्लर्कची नोकरी जाते, तर मुख्यमंत्री, पंतप्रधानांची खुर्ची का नाही?"; PM मोदी भ्रष्टाचार विरोधी विधेयकावर काय बोलले?

सात महसूल मंडळात अतिवृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 01:19 IST

जिल्ह्यात मागील तीन दिवस झालेल्या पावसामुळे नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. तर मागील चौवीस तासात ३३ पैकी ७ महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली असून ३६.६१ मि.मी.पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान हवामान विभागाने जिल्ह्यात पुढील दोन दिवस पावसाची शक्यता वर्तविली आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात तीन दिवसांच्या पावसाने नदी नाले तुडुंब : धरणाचे दरवाजे उघडले, घरांची पडझड

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात मागील तीन दिवस झालेल्या पावसामुळे नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. तर मागील चौवीस तासात ३३ पैकी ७ महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली असून ३६.६१ मि.मी.पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान हवामान विभागाने जिल्ह्यात पुढील दोन दिवस पावसाची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे पुजारीटोला धरणाचे ४, कालीसरार धरणाचे १ आणि धापेवाडा प्रकल्पाचे १९ दरवाजे उघडण्यात आले आहे. बुधवारी (दि.२९) सलग चौथ्या दिवशी पावसाने विश्रांती घेतली. त्यामुळे जिल्ह्यातील जनजीवन पूर्वपदावर आले आहे.रविवारी (दि.२६) सायंकाळपासून सुरू झालेल्या पावसाचा जोर मंगळवारी तिसऱ्या दिवशी कायम होता. त्यामुळे तिरोडा, सडक अर्जुनी व गोरगाव तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला होता. अनेक नाल्यावरील पुलावरुन एक ते दीड फुट पाणी वाहत असल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद झाली होती. मंगळवारी दिवसभर पावसाची संततधार सुरू असल्याने शहरातील खासगी शाळांनी सुटी जाहीर केली. या पावसाचा नागरिकांच्या दैनदिन कामावर सुध्दा परिणाम झाला होता. तर पावसामुळे रोवणीची कामे सुध्दा पूर्णपणे ठप्प झाले होती.तीन दिवसाच्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील ३५३ घरे ७५ गोठ्यांची पडझड झाली. त्यामुळे याचा ग्रामीण भागातील नागरिकांना सर्वाधिक फटका बसला. संततधार पावसामुळे नदी नाले भरुन वाहत असून अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील केलेली रोवणी वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तीन दिवसाच्या पावसामुळे सिंचन प्रकल्पातील पाणी साठ्यात सुध्दात समाधानकारक वाढ झाली आहे. मागील तीन चार वर्षांच्या कालावधीत प्रथमच तिरोडा तालुक्यातील बोदलकसा जलाशय ओव्हर फ्लो झाले. जिल्ह्यातील प्रमुख धरणाच्या पाणीसाठ्या सुध्दा मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे याची उन्हाळ्यातील पाणी टंचाई आणि शेतकºयांना सिंचनासाठी मदत होणार आहे.दरम्यान बुधवारी (दि.२९) सलग चौथ्या दिवशी सकाळनंतर पावसाचा जोर कमी झाला.२० टक्के विद्यार्थी परीक्षेपासून वंचित२८ आॅगस्टपासून पायाभूत चाचणी घेण्यात सुरुवात झाली आहे. परंतु मंगळवारी(दि.२८) सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने जवळपास २० टक्के विद्यार्थी शाळेत पोहचू शकले नाही.त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पायाभूत चाचणीच्या परीक्षेपासून वंचित राहावे लागले. मंगळवारच्या पेपरला मुकलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा चाचणी देण्याची संधी मिळावी अशी मागणी पालकांनी केली आहे.

टॅग्स :floodपूर