शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा पुन्हा आंतरराष्ट्रीय अपमान! ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये बोलावून ताटकळत ठेवले
2
जीएसटी २२ सप्टेंबरला घटला, अन् टर्म इन्शुरन्सचे हप्ते कंपन्यांनी चार दिवसांनी कमी केले; कारण काय...
3
"बेबी, I Love You, जवळ ये ना..." विद्यार्थिनींना असे मेसेज पाठवणारा चैतन्यानंद मुंबईत लपलाय?
4
प्रदूषणाने धोक्याची घंटा वाजवली! कार्बन उत्सर्जनात चीन नंबर १, भारत कितव्या क्रमांकावर? आकडेवारी पाहून बसेल धक्का
5
पीएम किसान योजनेत मोठा बदल! आता 'या' शेतकऱ्यांनाही मिळणार लाभ, २१ वा हप्ता कधी?
6
Budh Gochar 2025: दसऱ्याला बाराही राशी सौभाग्याचे सोने लुटणार, बुध गोचर भाग्य पालटणार
7
माझ्याविरुद्ध तिहेरी कट, डोनाल्ड ट्रम्प का संतापले?; ‘सिक्रेट सर्व्हिस’ला चौकशीचे आदेश
8
Nashik Crime: मैत्रिणीने कॅफेमध्ये बोलावून घेतलं अन् हल्लेखोरांना केला 'मेसेज'; नाशिकमध्ये तरुणाची कॅफेमध्ये कोयत्याने हत्या
9
आता Aadhaar अपडेट करणं होणार सोपं! घरबसल्या बदलू शकता लिंक मोबाईल नंबर, केव्हापासून मिळणार सुविधा
10
नाशिक हादरलं! कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे अन् सुरक्षेचे १२ वाजवून १२ तासांत दोन खून
11
Stock Markets News: फार्मावर १००% टॅरिफ, सलग सहाव्या दिवशी शेअर बाजार घसरला; निफ्टी २४,८०० च्या खाली, फार्मा शेअर्स आपटले
12
Israel attack Yemen: इस्रायलचा येमेनवर मोठा हवाई हल्ला, राजधानी सना हादरली, हुथी बंडखोरांच्या हल्ल्यानंतर पलटवार
13
Post Office च्या 'या' स्कीममध्ये ₹१०,००० च्या गुंतवणूकीवर मिळेल ₹१,१३,६५८ चं गॅरंटीड रिटर्न, पटापट चेक करा डिटेल्स
14
रोज रात्री बॉयफ्रेंडला व्हिडीओ कॉल करायची अन् नवऱ्याच्या चुगल्या सांगायची, पण झाली अशी चूक की...
15
भारताच्या ड्रग्ज तस्करांवरील कारवाईमुळे दाऊद इब्राहिमला धक्का; आता दक्षिण आफ्रिका आणि मेक्सिकोमधील नवीन ठिकाणांचा घेतोय शोध
16
भरला संसार मोडून प्रियकरासोबत पळाली ३ मुलांची आई, जाताना पैसे अन् दागिनेही लुटून गेली; पतीची पोलिसांत धाव
17
Tariff on Pharma: डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा तडाखा! औषधांवर १०० टक्के टॅरिफ, भारतीय कंपन्यांची चिंता वाढली
18
‘मला बळीचा बकरा बनवला जातोय’ सोनम वांगचूक यांचा आरोप; केंद्रीय गृहमंत्रालयाकडून कारवाई सुरूच
19
VIRAL : पत्नीच्या चारित्र्यावर संशय आला, पती अचानक बेडरूममध्ये शिरला अन् बेड उघडताच समोर आलं भयाण वास्तव!
20
पंजाब राज्य एका हेक्टरला ५० हजार देते मग महाराष्ट्राने ८५०० का? ओमराजे निंबाळकरांचा सरकारला सवाल

महसूल अधिकाऱ्यांशी रेती माफियांची साठगाठ

By admin | Updated: November 20, 2014 22:54 IST

संपूर्ण राज्यात संतुलित पर्यावरणासाठी पाण्याची भूजल पातळी वाढावी व प्रदूषणावर आळा बसावा यासाठी सर्वच रेतीघाट शासनाने बंद केले आहेत. त्यामुळे रेती उपसा बंद होवून शासकीय व निमशासकीय

परसवाडा : संपूर्ण राज्यात संतुलित पर्यावरणासाठी पाण्याची भूजल पातळी वाढावी व प्रदूषणावर आळा बसावा यासाठी सर्वच रेतीघाट शासनाने बंद केले आहेत. त्यामुळे रेती उपसा बंद होवून शासकीय व निमशासकीय संपूर्ण कामे बंद झाली. तरीही काही ठिकाणाहून मोठे रेती माफिया टिप्परने रेतीचा अवैध उपसा करीत आहेत. त्यांना पकडण्याची अधिकाऱ्यांची हिंमत होत नाही. त्यामुळे महसूल अधिकारी व रेती माफिया यांच्यात साठगाठ असल्याची चर्चा तिरोडा तालुक्यात होत आहे.लहान ट्रॅक्टरधारक व शेतकऱ्यांवर रेती माफियांच्या इशाऱ्यावर अधिकारी कारवाई करून गुन्हे दाखल करीत असल्याचा आरोप होत आहे. तिरोडा तालुक्यातील चांदोरी (बिरोली), घाटकुरोडा, अर्जुनी, पिपरिया हे रेतीघाट भू-जल सर्व्हेक्षणानुसार पात्र असल्याचे सांगण्यात येत आहे. पण अर्जुनी व बोंडरानी घाट वन विभागात येत असल्याने अडचणीत आहेत. त्यासाठी केंद्र शासनाच्या भोपाल येथील पर्यारण विभागाकडून मंजुरी घेतल्याशिवाय लिलाव करता येत नाही. परंतु ग्रामपंचायतमध्ये ग्रामसभा न घेताच उपविभागीय अधिकारी महिरे ठराव लिहिण्यास बाह्य करीत असल्याचे काही ग्रामसेवकांचे म्हणणे आहे. ग्रामसभा जोपर्यंत निर्णय देणार नाही, तोपर्यंत त्या ठरावासाठी साधे नाहरकरत प्रमाणपत्र ग्रामसेवकाला देता येत नाही. पण चारही रेती घाटांच्या नाहरकत प्रमाणपत्रांसाठी उपविभागीय अधिकारी दबाव तंत्राचा वापर करीत आहेत, अशी माहिती गावातील नागरिक व संघटनेकडून देण्यात आली आहे. हेच अधिकारी एकीकडे कायदा व सुव्यवस्थेच्या गोष्टी करतात तर दुसरीकडे दबाव टाकत असल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. नवनिर्वाचित आमदारांनी याची दखल घेवून सामान्य जनतेला न्याय द्यावे, अशी मागणी आहे. टिप्परमुळे संपूर्ण रस्ते खराब झाले आहेत. गावात संपूर्ण खड्डे असून नदीच्या घाटावर चालता येत नाही. गावात धुळीचे साम्राज्य असते. लोकांच्या आरोग्यावर परिणाम होतो. बालके रस्त्याने जातात व भरधाव वेगाने ट्रक चालविले जाते. त्यामुळे अपघाताची शक्यता असते. ग्रामस्थांनी अनेकदा तक्रार केली, पण फायदा काहीच होत नाही.दरम्यान याबाबत उपविभागीय अधिकारी महिरे यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी सांगितले की, शासनाला महसूल मिळावा यासाठी वरिष्ठांच्या आदेशानुसार ग्रामसभेचा ठराव घेण्यासाठी सांगितले जाते. त्यात कोणतेही दबावतंत्र नसल्याचे ते म्हणाले. (वार्ताहर)