शहरं
Join us  
Trending Stories
1
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
2
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
3
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
4
बॉक्सर नीरजनं विचालं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
5
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
6
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
7
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
8
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
9
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
10
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
11
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
12
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
13
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
14
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
15
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
16
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
17
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
18
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
19
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
20
क्रिश का गाना सुनेगा..? अचानक २० वर्षांनी रंगली तुफान चर्चा, 'ले बेटा' वाला Video Viral
Daily Top 2Weekly Top 5

गोंडमोहाळीचे सात सदस्य अपात्र

By admin | Updated: April 14, 2016 02:23 IST

तिरोडा तालुक्यातील गोंडमोहाळी ग्राम पंचायतीचे सरपंच, उपसरपंचासह पाच सदस्यांना अपात्र ठरविण्याचे आदेश अप्पर जिल्हाधिकारी गोंदिया यांनी दिले.

हिशेबातील दिरंगाईचा फटका : जिल्हा प्रशासनाचे आदेशपरसवाडा : तिरोडा तालुक्यातील गोंडमोहाळी ग्राम पंचायतीचे सरपंच, उपसरपंचासह पाच सदस्यांना अपात्र ठरविण्याचे आदेश अप्पर जिल्हाधिकारी गोंदिया यांनी दिले. सर्व सदस्यांना आदेशाची प्रतही पाठविली.मुंबई ग्राम पंचायत अधिनियम १९५८ च्या कलम १४ (१) ह अन्वये गोंडमोहाळी ग्राम पंचायतची सार्वत्रिक निवडणूक दि.२५/७/१५ रोजी झाली होती. दि.२७/७/१५ रोजी मतमोजणी करण्यात आली. दि.७/८/१५ ला सरपंच-उपसरपंचाची निवड झाली. यात पौर्णिमा सदनलाल वाडगाये सरपंचपदी व उपसरपंचपदी सुभाष बाबुराव कावडे यांची निवड झाली. पण सत्तेच्या गुर्मीत हिशेब देणे विसरले. ग्राम अधिनियम १९५८ कलम १४ व नुसार खर्चाचा हिशेब देणे अनिवार्य आहे. मात्र या सदस्यांनी ४५ दिवस होऊनही निवडणुकीचा हिशेब दिला नाही. याबद्दल सामाजिक कार्यकर्ते व ग्राम पंचायत सदस्य जागेश्वर निमजे आणि इतर चार लोकांनी सरपंच पौर्णिमा वडगाये, उपसरपंच सुभाष कावडे, पुष्पा बोपचे, ममता बोपचे, प्रभा राऊत, धनवंता भगत, भूमेश्वर शेंडे यांच्याविरूद्ध याचिका अप्पर जिल्हाधिकारी गोंदिया यांच्या न्यायालयात दि.१०/८/१५ ला दाखल करण्यात आली होती. निकाल लागल्यानंतर ३० दिवसाच्या आत हिशेब देणे महाराष्ट्र शासन महसुल व वनविभागाचे शासन परीपत्रक दि.२९/३०२०१२ अन्वये बंधनकारक असताना त्यात हलगर्जीपणा झाल्याचे दिसून आले. या सदस्यांनी दि.४/९/१५ रोजी हिशोब सादर केले. तहसीलदार तिरोडा यांच्याक्ून वस्तुस्थिती अहवाल मागविण्यात आला. यावर दोन्ही पक्षाकडून युक्तीवाद वकीलामार्फत पाठविण्यात आला. दोन्ही पक्षाचे तोंडी, लेखी बमाल नोंदविण्यात आले. पण गैरअर्जदार ठोस पुरावे सादर करू शकले नाही. गैरअर्जदाराची अपील खारिज अमान्य करण्यात आली. सरपंच, उपसरपंच पाच सदस्यांना सात महिन्यातच पायउतार व्हावे लागले. दुसरी याचिका सुद्धा अतिक्रमणाची टाकण्यात आली असल्याचे सामाजिक कार्यकर्ता जागेश्वर निमजे यांनी लोकमतला सांगितले आहे. प्राप्त माहितीनुसार गावातील नागरिकांनी हे प्रकरण घडण्यामागचे सत्य वस्तुस्थिती जाणऊन घेण्यासाठी ज्याला काही घेणेदेणे नाही त्यांना चर्चेदरम्यान विचारले असता त्या नागरिकांनी सांगितले की, गावाच्या राजकारणात बाहेवरील माणुस हस्तक्षेप जास्त करीत आहे. गावात सामाजिक भावना न ठेवता, विकासाची बाजु न मांडता बदल्याची भावना ठेऊन काम करीत आहे. त्यांना कामाची जाणीव नाही, सत्तापक्षाला चुकीचे मार्गदर्शन करणे हेच अंगावर आले व विरूद्ध पार्टीचे लोक नियमाचे भान ठेऊन कार्य करीत असल्याने सत्तापक्षाला अडकवत आहेत. पण आपले नाव लिहू नये या अटीवर त्यांनी गावांची आपबीती सांगितली. लोकमतने अगोदर हे प्रकरण उचलून धरले व त्यांना न्याय ही मिळाला.