शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

सप्टेंबर महिना कोरोना ब्लास्टचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2020 05:00 IST

जिल्ह्यात २७ मार्चला पहिला कोरोना बाधित रूग्ण आढळला होता. त्यानंतर जवळपास दीड महिना एकही कोरोना बाधिताची नोंद झाली नव्हती. तर मार्च ते जुलै या पाच महिन्याच्या कालावधीत २८८ कोरोना बाधित आढळले. तर ऑगस्ट महिन्यात ११९३ कोरोना बाधितांची नोंद झाली. त्यामुळे ऑगस्ट महिना कोरोना उद्रेकाचा ठरला. त्यानंतर सप्टेंबर महिन्यापासून कोरोना बाधितांची संख्या आटोक्यात येईल असा अंदाज वर्तविला जात होता.

ठळक मुद्दे९ दिवसात १७ बाधितांचा मृत्यू : १११८ कोरोना बाधित, शहराला विळखा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : सध्या सर्वत्र कोरोना प्रादुर्भाव वाढत असून शहरी भागात वेगाने संसर्ग होत आहे. सप्टेंबर महिन्याच्या सुरूवातीपासून जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. १ ते ९ सप्टेंबर दरम्यान १७ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला असून मागील सहा महिन्यातील हा सर्वाधिक आकडा आहे. तर १११८ कोरोना बाधितांची नोंद झाली आहे.त्यामुळे सप्टेंबरमध्ये जिल्ह्यात कोरोनाचा ब्लास्ट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोरोना बाधितांच्या आकड्याचा नवा विक्रम होण्याची शक्यता आहे.जिल्ह्यात २७ मार्चला पहिला कोरोना बाधित रूग्ण आढळला होता. त्यानंतर जवळपास दीड महिना एकही कोरोना बाधिताची नोंद झाली नव्हती. तर मार्च ते जुलै या पाच महिन्याच्या कालावधीत २८८ कोरोना बाधित आढळले. तर ऑगस्ट महिन्यात ११९३ कोरोना बाधितांची नोंद झाली. त्यामुळे ऑगस्ट महिना कोरोना उद्रेकाचा ठरला. त्यानंतर सप्टेंबर महिन्यापासून कोरोना बाधितांची संख्या आटोक्यात येईल असा अंदाज वर्तविला जात होता. मात्र सप्टेंबर महिन्यात दररोज शंभर कोरोना बाधितांची भर पडत असून १ ते ९ सप्टेंबर दरम्यान १११८ कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. तर १७ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.कोरोना बाधितांच्या मृत्यूच्या आकड्यात वाढ होत असल्याने जिल्हावासीयांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढीचा वेग चौपट झाला आहे. विशेष म्हणजे सर्वाधिक कोरोना बाधित हे गोंदिया शहरात आढळले असून रुग्ण संख्या दीड हजारावर गेली आहे.त्यामुळे संपूर्ण गोंदिया शहरच कोरोनाच्या विळख्यात आल्याचे चित्र आहे. त्यामुळे शहरवासीयांना वेळीच सावध होण्याची गरज असून आरोग्य विभागाने दिलेल्या दिशा निर्देशांचे काटेकोरपणे पालन करुन स्वत:ची आणि आपल्या कुटुंबांची काळजी घेण्याची गरज आहे.दर १४ तासाला एका बाधिताचा मृत्यूकोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून मृतकांच्या संख्येत सुध्दा झपाट्याने वाढ होत आहे. नऊ दिवसात १७ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला असून दर १४ तासाला एका कोरोना बाधिताचा मृत्यू होत असल्याचे चित्र आहे.मेडिकलचा दुर्लक्षितपणा भोवतोयजिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत असल्याने चाचण्यांचे प्रमाण सुध्दा वाढले आहे. कोरोनाची चाचणी करण्यासाठी नागरिक मेडिकलमध्ये जात आहे. मात्र या ठिकाणी स्वॅब नमुने कुठे घेतले जातात, या केंद्राकडे जाण्याचा मार्ग कोणता यासंबंधी कुठलेच माहिती फलक लावण्यात आलेले नाही. त्यामुळे तपासणीसाठी जाणाऱ्या अर्धा तास चाचपडत राहावे लागते. तर स्वॅब नमुने तपासणीठी या केंद्रासमोर रांग लागत असून यात अँटीजेन टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आलेले रुग्ण सुध्दा असतात. त्यामुळे सुध्दा कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. पण याकडे मेडिकलच्या व्यवस्थापनाचे दुर्लक्ष झाले आहे.कर्मचाऱ्यांअभावी केवळ दोन तास तपासणी४कोरोनाचा संसर्ग वाढत असताना मेडिकलचा अनागोंदी कारभार सुध्दा पुढे येत आहे. मनुष्य बळाचा अभाव असल्याने मेडिकलच्या स्वॅब नमुने तपासणी केंद्रात केवळ दोन तास स्वॅब नमुने घेतले जात असल्याची माहिती आहे. स्वॅब नमुने घेणाऱ्या आठ कर्मचाऱ्यांनाच कोरोनाची लागण झाली असल्याने ही समस्या निर्माण झाली आहे. परिणामी तपासणीसाठी येणाºया अनेकांना आल्या पावलीच परत जावे लागत असल्याचे चित्र आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या